Friday, March 9, 2018

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार?




खा. गोपाळ शेट्टींचं मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहावर प्रश्नचिन्ह--

सत्ताधारी पक्षाच्या मुंबईच्या एका खासदारांनी आंतरजातीय विवाहाला विरोध करणारं खाजगी विधेयक लोकसभेत मांडलंय.  त्यांनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुलींनी आईवडीलांच्या पसंतीनुसारच विवाह केला पाहिजे. ते ठरवतील त्याच्याशी लग्न करायचं तर मुलीचं वय18 चालेल.मात्र जर मुलींना स्वतंत्रपणे, आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं असलं, आपल्या आवडीनिवडीनुसार लग्न करायचं असलं तर मात्र लग्नाचं कायदेशीर वय वाढवून 21 वर्षे करावं.

प्रेमविवाहांबद्दल ते किती तुच्छतेनं बोलत होते.

मुलं - मुली 18 वय पुर्ण करताच मतदार होतात. राज्याचं नी देशाचं सरकार निवडतात.
पण लग्नासाठी मात्र मुलीचंही वय 21 हवं असं म्हणणार्‍या या खासदारांना निवडून देऊन चुक तर केली नाही ना?
त्यांच्या अकलेचं खोबरं झालंय का?

आता खाणं पिणं, लेणं नेसणं याबरोबरच आमचं लग्नाचंही स्वातंत्र्य यांना हिरावून घ्यायचंय.

काय चाललंय काय?
कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार  कोण ठरवणार?

युवकहो, तुम्हाला हे मान्य आहे?

-प्रा.हरी नरके

..........................

[संदर्भ- एबीपी माझा वाहिनीवरील बातमी व खासदार महोदयांचा बाईट]
http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-legal-consultant-rama-saroday-on-girls-age-issue-519599
नवी दिल्ली : पालकांच्या संमतीशिवाय मुलींच्या लग्नाचं वय 21 करा : भाजप खासदार गोपाळ शेट्टी
Updated 08 Mar 2018 08:48 PM
महिला दिनादिवशीच मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.आई-वडिलांच्या समंतीशिवाय लग्न करायचं असल्यास मुलींसाठी ...]

No comments:

Post a Comment