Monday, April 3, 2017

केशवराव विचारे यांच्या भाषणांतून

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वैचारिक स्कूल्स आहेत. नानाविध विचारधारा आहेत.
विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी ही अशीच दोन स्कूल्स.
त्यांच्यात कायम वाद व्हायचे.
एकदा विश्वामित्र म्हणाले, " ज्ञान ही अशी प्रभावी शक्ती आहे की ती कोणीही कायमची दाबून ठेवू शकत नाही. हे चंद्र चांदण्यांनी भरलेलं उघडं आभाळसुद्धा ज्ञानार्जनाचं कितीतरी मोठं माध्यम आहे. आता हे कोणाला झाकता येईल का?"
वसिष्ठ म्हणाले, "सोप्पंय. त्या प्रत्येक ग्रहतार्‍याला देवादिकांची नावं द्यायची. त्यांच्या नित्यपुजा, व्रतवैक्ल्यं यात सगळ्यांना गुंतवून टाकायचं, कोणाची बिशाद आहे विचार वगैरे तापदायक गोष्टींकडे जाण्याची?"
केशवराव विचारे यांच्या भाषणांतून--

No comments:

Post a Comment