Monday, April 3, 2017

मोठेपणा

लोक ग्लासभर पाणी घेतात आणि घोटभर पिऊन उरलेलं टाकून देतात. काहीजण नको एव्हढं अन्न ताटात वाढून घेतात, चव घेऊन उरलेलं फेकून देतात.
तुम्ही हवं तेव्हढं जरूर खा, प्या. मात्र अन्न किंवा पाणी वाया घालवणं हा मला तरी अपराध वाटतो.
माझा एक मित्र मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठीत अशा पंचतारांकीत हाटेलात अधिकारी आहे.
तो सांगत होता, त्यांच्याकडे एका उद्योगपतींची व्हेज बिर्यानीची 100 किलोंची मागणी होती.
मी म्हटलं, "घरी एखादी मोठी पार्टी आयोजित केलेली असेल त्यांनी."
तो म्हणाला, " नाही. ते नेहमीचे 100 किलो बिर्यानी मागवतात."
मी म्हटलं, "हो, त्यांच्या 25 की 27 मजली बंगल्यातील नोकरचाकरांना देत असतील. मी वाचलंय की त्यांच्या या बंगल्यात 500 की 600 नोकर आहेत."
तो म्हणाला," नाही. देशातल्या सर्वाधिक मोठ्या उद्योगपतींच्या प्रतिष्ठेला साजेशी आर्डर असावी म्हणून ते 100 किलो मागवतात. कुटुंबातले 4/5 जण जेव्हढी ह्वी तेव्हढी खातात आणि उरलेली नोकरांना किंवा इतर कोणालाही न देता ते बंदोबस्तात नेऊन कचराकुंडीत टाकतात. प्रतिष्ठा म्हणतात याला भाऊ, आहात कुठे तुम्ही? त्यांचं म्हणे असं म्हणणं आहे की आम्ही वाया घालवतो, तुम्ही का जळताय? पैसे तर आम्ही भरतोय ना?"

No comments:

Post a Comment