Saturday, December 16, 2017

सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना?


"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"- सोनिया गांधी
-प्रा.हरी नरके
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही नेमकी माहिती तुम्हाला कशी कळली?"
फोटोशेजारच्या टेबलवर असलेले कॅलेंडर, घड्याळ आणि टेबलावरचा टाइम्स ऑफ इंडीयाचा अंक त्यांना दाखवताच त्यांनी अगदी जवळून त्याचे बारकाईने निरीक्षण केले.
सावित्रीबाईंचे छायाचित्र बघून त्या म्हणाल्या, "सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? त्यांच्या डोळ्यातले तेज बघा. त्यांच्या चेहर्‍यावरची प्रसन्नता आणि त्यातला गोडवा बघा. जोतीराव खुपच लकी असले पाहिजेत, त्यांना अशी धाडशी, प्रतिभावान आणि कर्तबगार पत्नी मिळाली."
त्या दोघांचे एकत्रित तैलचित्र बघितल्यावर त्या म्हणाल्या, "प्रोफेसर, मला त्यांच्या सहजीवनाबद्दल तपशीलवार अधिक माहिती सांगा."
त्यांचे लग्न बालपणात झाले होते, जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरात शिक्षण दिले, ही माहिती ऎकताना त्या सहजपणे म्हणाल्या, "किती रोमॅंटिक ना?"
जोतीरावांना लोकांनी महात्मा ही पदवी दिली हे ऎकताच त्या म्हणाल्या, "जोतीराव महानच होते. पण सावित्रीबाईंचाही असाच गौरव झाला असेल ना?"
"नाही झाला," असं मी म्हटल्यावर त्या हळहळल्या.
त्यांनी विचारलं, "त्यांनाही समाजाने का बरं अशी एखादी पदवी नाही दिली?"
मी निरूत्तर होतो. त्याच म्हणाल्या, " असो, आजतर त्यांना आपण राष्ट्रमाता मानतोय!" 
त्या दोघांनी 50 वर्षे संसार केला हे ऎकल्यावर त्या म्हणाल्या, " गोल्डन हाफ सेंच्युरी! सिंपली ग्रेट." त्याक्षणी त्या काहीशा भावूक झाल्यासारख्या दिसल्या. पण लगेच त्या सावरल्या.
सावित्रीबाईंच्या प्रत्येक कामाबद्दल त्या समरसून माहिती घेत होत्या.
शेवटी त्यांनी शेरेबुकात लिहिले, " आज आपण थरारून गेलो आहोत. महात्मा गांधींनी ज्यांना खरा महात्मा म्हटले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले, त्या महापुरूषाचे जीवनकार्य समजावून घेताना मला अभिमान वाटला. सावित्रीबाई या भारतीय स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचं सहजीवन कृतार्थ होतं. या प्रतिभावंत जोडप्याला माझे विनम्र अभिवादन!"
आम्ही त्यांना भॆट दिलेला दोघांचा पुतळा आणि त्यांच्यावरची पुस्तकं गाडीत ठेवलीयत ना? याची निघताना त्यांनी पीएकडे आवर्जून चौकशी केली.
मुख्यमंत्र्यांना त्या म्हणाल्या, "माझ्या पुढच्या महाराष्ट्र भेटीत मला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या घरी जायचंय. माझ्या कार्यक्रमात ते नक्की घ्या."
मला म्हणाल्या, "त्या दोघांच्या घरात जाऊन मला त्यांची आणखी माहिती समजून घ्यायला आवडेल. थॅंक्स अ लॉट प्रोफेसर!"
त्या प्रदर्शनाला पंतप्रधान अटलजी आणि उपराष्ट्रपती व अन्य मान्यवरांनीही भेटी दिल्या. मी त्यांनाही माहिती सांगितली पण त्या भेटी धावत्या आणि केवळ औपचारिक होत्या. त्यात फक्त शिष्टाचार होता. खोलवरची आत्मियता होती असं वाटलं नाही. त्या प्रदर्शनात खर्‍या अर्थानं मनापासून रमल्या त्या एकट्या सोनियाजीच!
-प्रा.हरी नरके

Sunday, December 10, 2017

24 years on, OBC workforce in Centre still short of Mandal mark

http://www.thehindu.com/news/national/24-years-on-obc-workforce-in-centre-still-short-of-mandal-mark/article21382491.ece 24 years on, OBC workforce in Centre still short of Mandal mark - D. Suresh Kumar As of January 2017, the number across cadres is far below the mandated 27% At a time when President Ram Nath Kovind has appointed a five-member commission to examine sub-categorisation of Other Backward Classes (OBCs) “to achieve greater social justice,” a reality check shows that representation of OBCs in the workforce in Central Government offices falls far short of achieving the 27% quota recommended by the Mandal Commission. Data furnished under the Right to Information (RTI) Act by 24 of the 35 Union Ministries, 25 of the 37 Central departments and various constitutional bodies reveal that 24 years since the implementation of the Mandal Commission recommendations, across various groups of employees, the OBCs have not optimally benefited from it. According to the Union Ministry for Personnel, Public Grievances and Pensions, the reservation for OBCs is being implemented from September 8, 1993. Replies provided under the RTI Act by the Department of Personnel and Training (DoPT) show that as on January 1, 2017, only 17% of the Group A officers in the 24 Ministries belong to the OBCs. The representation among the Group B officers is even lower at 14%. Likewise, only 11% of the Group C employees are from the OBCs and in Group D, the figure is 10%. Incidentally, in July last year, Union Minister of State for Personnel Jitendra Singh informed the Lok Sabha that as on January 1, 2014, OBC representation in 71 Ministries/Departments was 19.28%. A reason, he cited, for the shortfall in meeting the Mandal Commission mandate was that OBC candidates appointed up to 1993 (when reservation kicked in) were not included for counting their representation. Besides, he said, there is generally a time gap between occurrence of vacancies and filling them as recruitment is a time-consuming process. Cut to the present: in the cumulative staffing position of the 24 Ministries, 25 departments (out of 37) and eight constitutional bodies (such as the PMO, the President’s Secretariat and the ECI), which provided information under the RTI Act — 14% of Group A officers are from the OBCs. The figures for Group B, C and D employees are 15%, 17% and 18% respectively. In some cases, the under representation of OBCs is glaring. For instance, in the Cabinet Secretariat, which has 64 Group A officers, not one is from the OBCs, whereas 60 belong to the Open Competition (OC) category and four are from the Scheduled Castes. In the Ministry of Information and Broadcasting, only 25 of the 503 Group A officers belong to the OBCs. In 2015, the representation of Group A OBC officers was only 10.71% and Group B officers 7.18% across 12 ministries, 10 departments and five constitutional bodies which furnished information under the RTI Act then. In 2013, OBCs constituted 9.43% of the Group A officers in 55 Central Government agencies. “These figures don’t tell the entire story because among the 11 ministries which refused to provide employee data under the RTI Act this year are the Railways, Defence, Home and Finance, which are large recruiters. The bigger ministries account for 91.25% of the central government jobs. Whereas the data provided by the 24 ministries account for only 8.75% of the total jobs. If you go by the March 2011 Census of Central Government Employees, the Railways has 13,28,199 regular employees and we don’t have the community-based employee data for it,” points out Dr. E.Muralidharan, a Chennai-based activist, who filed the application under the RTI Act. In real terms, as against an estimated 31 lakh Central Government employees, the data pertains to only 2,71,375 employees, he added. In 2015 when he had sought details of OBC employees, as many as 40 ministries and 48 departments refused to part with the information. “An Office Memorandum (O.M. -No.43011/10./2002-Estt.Res) dated December 19, 2003 issued by the Ministry of Personnel, Public Grievances and Pensions makes it mandatory for each Ministry/Department to send a report regarding representation of SCs, STs and OBCs in services. But this is followed in breach,” rued the IIT Madras alumnus. Dr. Muralidharan recalled that in June 2013, the Ministry of Personnel had issued a detailed memorandum (No. 36038/1(i)/2013 Estt.Res), on measures to be taken to fill up backlog vacancies reserved for SCs/STs/OBCs “at the earliest” monitored at the “highest level”. The memorandum had identified certain reasons for non-filling up of reserved vacancies such as lack of finishing skills - English fluency or interview skills - and scarcity of qualified reserved category persons. Among the recommendations given by the Ministry was that the Departments concerned may take a decision within six months on launching a special recruitment drive providing certain relaxations so that the vacancies may be filled up. It had further said that finishing training be imparted for reserved category candidates. Another recommendation was to constitute a committee with representations from the Ministry of Social Justice and Empowerment, Tribal Affairs, major ministries like Railways and Home Affairs to find out specific reasons for backlog in filling up of vacancies and suggest measures to enhance the employability of reserved category candidates. “The memorandum of June 2013 directed all ministries / departments to take follow up action on the decision taken by the Government and sent quarterly progress reports on implementing the recommendations to the Ministry of Personnel,” the RTI Act applicant said. Subsequently, the Union Minister of State for Personnel Jitendra Singh informed Parliament that based on the recommendations of a committee headed by the Secretary, Ministry of Social Justice & Empowerment, time bound action plan for filling up backlog reserved vacancies was intimated to all Departments/Ministries on November 11, 2014 for filling up such vacancies by August 2016. This Action Plan included study of reasons for non-filling of backlog reserved vacancies, review of prescribed standards, if required; conducting Special Recruitment Drive and conducting pre-recruitment training programmes. “If the Action Plan was put into motion, we wouldn’t have had the kind of poor representation for OBCs (as of January 1, 2017), as the details furnished under the RTI Act show,” contended Dr. Muralidharan. S.K. Kharventhan, former member National Commission for Backward Classes, said among the reasons for under-representation of OBCs is non-filling of backlog vacancies and non-implementation of the communal roster system for filling vacancies. “As per Supreme Court judgment, they should follow only a post-based roster system. But in many departments only vacancy-based communal roster system is followed,” he alleged. K. Danasekar, secretary general, All India Confederation of OBC Employees’ Welfare Associations, said, “Some two-three years ago, of the 83 Deputy Secretary level officers in Central Government only three were from OBCs and five belonged to the SC/STs.” According to him, only OBC candidates who enter government service at the age of 23 or so eventually qualify to get promoted as Deputy Secretary or Under Secretary. “Many enter the service when they are 30 and therefore retire below the rank of Deputy Secretary. That is why the OBC representation will be higher in Group C and D category of employees and not in Group A or B,” he said. Mr. Danasekar added that in the Finance Ministry, the OBC representation in Group A is likely to be better. “Usually in the UPSC examination, many from the OBCs qualify for the Indian Revenue Service, which is lower in order of preference as opposed to the IFS, IAS and IPS,” he explained. Meanwhile, Dr Muralidharan is critical of the attempt to introduce sub-categorisation among OBCs. “Presently the OBCs constitute the largest group among in India. By constituting a committee to explore sub-categorisation, the government is trying to divide the OBCs,” he said. National employment social problems The Hindu, Sunday,10 Dec.2017, pg.1 ...............................

Sunday, December 3, 2017

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनावरील सेन्सॉरशीपची 61 वर्षे ---


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आंबेडकरवाद्यांनी का गाळली?
बी.आर.आंबेडकर- मी बुद्धाकडे कसा वळलो?
"मला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे- मी इतके उच्चस्तरीय शिक्षण कसे काय घेतले? दुसरा प्रश्न म्हणजे- बुद्ध धम्माकडे माझा कल कसा काय झुकला? हे प्रश्न मला विचारले जातात, कारण मी ज्या समाजात जन्मलो तो भारतात ‘अस्पृश्य’ मानला जातो. ही प्रस्तावना पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जागा नव्हे. पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास या प्रस्तावनेची जागा उपयोगी ठरू शकेल.
या प्रश्नाचे थेट उत्तर असे की, बुद्धांचा धम्म हा सर्वोत्तम आहे असे मी मानतो. अन्य कुणाही धर्माशी त्याची तुलनाच होऊ शकणार नाही. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल, तर त्याला स्वीकारार्ह असा एकच धर्म म्हणजे बुद्धांचा धर्म. हा जो विश्वास मी व्यक्त करतो आहे, तो गेल्या पस्तीस वर्षांत सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केल्याने दृढ झालेला आहे.
मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसा वळलो याची हकिगत आणखी निराळी. ती जाणून घेणे वाचकांना आवडेल असे वाटते. ती हकिगत येथे सांगतो.
माझे वडील सैन्यात अधिकारी होते, तरी त्याचबरोबर ते एक धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला करडय़ा शिस्तीत वाढविले. वय जरी कमी असले तरी तेव्हाही मला वडिलांच्या धार्मिक जीवनाचरणात काही अंतर्विरोध जाणवत असत. माझ्या वडिलांचे वडील हे जरी रामानंदी होते, तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे जरी त्यांचा विश्वास मूर्तिपूजेवर नसला, तरीही ते अर्थात आमच्यासाठी म्हणून गणपतीपूजन करीत असत, हे मला आवडत नसे. पंथाच्या ग्रंथांचे त्यांचे वाचन होतेच. असे असले तरीही मी आणि माझे थोरले बंधू यांनी आमच्या बहिणी तसेच जमलेल्या अन्य मंडळींना रामायण आणि महाभारतातील काही भाग दररोज रात्री निजण्यास जाण्यापूर्वी वाचून दाखविलाच पाहिजे, यासाठी वडील आम्हास भाग पाडत असत. हा क्रम अनेकानेक वर्षे सुरू राहिलेला होता.
इंग्रजी चौथ्या इयत्तेची परीक्षा मी उत्तीर्ण झालो, त्या वर्षी माझ्या समाजातील लोकांना माझ्या अभिनंदनासाठी एक जाहीर सभा आयोजित करावी असे वाटत होते. अन्य समाजांतील तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीच्या मानाने हा (इंग्रजी चौथी उत्तीर्ण) काही साजरा करावा असा प्रसंग नव्हता. पण एवढय़ा पातळीला पोहोचलेला आमच्या समाजातील मी पहिलाच मुलगा आहे, अशी या सभेच्या आयोजकांची भावना होती. त्यांना तेव्हा असे वाटत होते, की मी केवढी मोठी उंची गाठली आहे. ही मंडळी वडिलांकडे त्यांची संमती मागण्यासाठी गेली. असले काही केल्यास मुलगा शेफारेल म्हणून वडिलांनी परवानगी स्पष्टपणे नाकारली. परीक्षाच तर पास झाला, आणखी काय मोठे केले त्याने? (असे वडिलांचे म्हणणे.) हा प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच विरस झाला. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. माझ्या वडिलांचे वैयक्तिक मित्र दादा केळूसकर (कृष्णाजी अर्जुन केळूसकर) यांना भेटून या मंडळींनी दादांना मधे पडण्याची विनंती केली. दादांनी ती मान्यही केली. दादांशी भवती- न भवती झाल्यानंतर वडील बधले आणि ती सभा झाली. दादा केळूसकर अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळातील साहित्यिक. त्यांचे भाषण झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धांच्या जीवनावर त्यांनी ‘बडोदे सयाजीराव प्राच्यविद्या माले’साठी (बरोडा सयाजीराव ओरिएण्टल सीरिज) लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत दिली. मी मोठय़ा कुतूहलाने ते पुस्तक वाचले आणि त्यामुळे हलून गेलो. फार प्रभावित झालो.
बौद्ध वाङ्मयाशी आमचा परिचय वडिलांनीच का नाही करून दिला, असा प्रश्न मला पडू लागला. हा प्रश्न माझ्या वडिलांनाही विचारण्याचा निर्धार मी केला. एके दिवशी तो कृतीतही आणला. मी (त्यावेळी) माझ्या वडिलांना विचारले, की ब्राह्मण-क्षत्रियादी उच्च जातींचेच गोडवे गाऊन शूद्र-अस्पृश्यांच्या अधोगतीच्या कथाच वारंवार सांगणारे रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथ वाचण्यावर ते का भर देतात? हा प्रश्न माझ्या वडिलांना आवडला नाही. ते एवढेच म्हणाले, ‘‘तू असले मूर्ख प्रश्न विचारूच नयेस. तुम्ही अद्याप मुलगे आहात (लहान आहात). तेव्हा सांगितले तेवढे तुम्ही ऐकले पाहिजे.’’ माझे वडील म्हणजे जणू रोमन पितृसत्ताधीश (पॅट्रिआर्क) होते. आणि पितृसत्तेच्या सर्वोच्च धाकाचा (पॅट्रिआ प्रोटेस्टास) अंमल आम्हा मुलांवर त्यांनी चालविला होता. मीच एकटा काय तो काहीशी मोकळीक घेऊन त्यांच्याशी बोलू लागलो होतो. आणि तोही एवढय़ाच कारणाने, की माझी आई माझ्या लहानपणीच दिवंगत झाल्याने आत्याच्या देखरेखीखाली मी वाढलो होतो. मग  काही काळाने मी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी नक्कीच माझ्या वडिलांनी मला उत्तर देण्याची तयारी केलेली होती. ते म्हणाले, ‘‘ मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचण्यास का सांगतो याचे कारण (असे) आहे- आपण अस्पृश्यांमधील आहोत आणि म्हणून तुला त्याचा न्यूनगंड येईल, तो वाढू शकेल, हे स्वाभाविक आहे. रामायण आणि महाभारताचे महत्त्व (मूल्य) यात आहे की, ते ग्रंथ हा न्यूनगंड काढून टाकतात. द्रोण आणि कर्ण यांच्याकडे पाहा. ती लहान माणसे; पण कोठल्या उंचीला पोहोचली होती! वाल्मिकीकडे पाहा. तो मूळचा कोळी होता. पण तो रामायणाचा ग्रंथकर्ता झाला. अशा प्रकारे न्यूनगंड नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचावयास सांगतो.’’ माझ्या वडिलांच्या म्हणण्यात जोम आहे, हे मला दिसत होते. पण माझे समाधान नव्हते झाले. मी वडिलांना सांगितले की, मला महाभारतातील कोणतीच पात्रे आवडत नाहीत. मी म्हणालो, ‘‘मला भीष्म आणि द्रोणच काय, पण महाभारतातील कृष्णसुद्धा मनाला पटत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी (ठरतात, कारण)- त्यांनी सांगितले एक आणि केले दुसरेच. कृष्णाचाही लबाडीवर विश्वास होता. त्याचे जीवनचरित्र लबाडय़ांनी भरलेले आहे. तितकीच अढी मला रामाबद्दलही आहे. शूर्पणखा प्रकरणात, वाली-सुग्रीव प्रकरणात  त्यांचे वर्तन पाहा. सीतेशीही ते अमानुष वागले.’’ ..यावर माझे वडील शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. बंड झालेले आहे, याची कल्पना त्यांना आलेली होती.
अशा प्रकारे मी दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकाच्या साह्याने बुद्धाकडे वळलो. लहान वयातच बुद्धाकडे वळलो तरी रित्या मनाने वळलो नव्हतो. मला काही पाश्र्वभूमी होती. आणि बुद्धांच्या कथा मला माहीत झाल्यानंतर त्यांची (या पाश्र्वभूमीशी) तुलना करणे, त्यातील विरोधाभास पाहणे हे मला अगदी शक्य होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांत मी रस घेऊ लागण्याची सुरुवात ही अशी आहे.
हे पुस्तक (द बुद्ध अँड हिज धम्म)  लिहिण्याची प्रबळ इच्छा का झाली, याची आरंभकथा निराळी आहे. कलकत्त्याच्या (तत्कालीन उच्चार) ‘महाबोधी सोसायटीज् जर्नल’च्या संपादकांनी १९५१ सालच्या त्यांच्या वैशाख अंकासाठी मला एक लेख लिहावयास सांगितले. या लेखात मी असे म्हटले होते की, विज्ञानजागृती झालेल्या समाजाने स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म असून, तसे न झाल्यास ऱ्हास होऊ शकतो. मी असेही म्हटले होते की, आधुनिक जगाने स्वतस वाचविण्यासाठी (शांति आणि उन्नतीसाठी) स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे. (लेखात असेही म्हटले होते की,) बुद्ध धम्माची वाटचाल धीम्या गतीने होते याचे कारण असे की, या धर्माचे वाङ्मय इतके अधिक आहे की कुणाला ते संपूर्ण वाचणे अशक्य वाटावे. या धर्माला ख्रिस्तीधर्मीयांच्या ‘बायबल’सारखा एकच एक ग्रंथ नाही, ही यामागील (प्रसारामागील) मोठी अडचण ठरते आहे. या लेखानंतर मला अनेकांनी पत्राने वा तोंडी असे सांगितले की, असा एखादा ग्रंथ तुम्हीच लिहा. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हे कार्य हाती घेतले.
टीका होण्याआधीच (भात्यातील बाण काढून घेण्यासाठी) मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या पुस्तकात मूळचे माझे असे काही नाही. हे संकलन आहे. असेम्ब्ली प्लांट म्हणा. अनेक परींच्या ग्रंथांमधून या पुस्तकासाठी साधने जमविली आहेत. अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित’ ग्रंथाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. यातील काव्य हे निर्विवाद उत्कृष्ट आहे. काही प्रसंगांच्या वर्णनासाठी तर मी त्यातील भाषेची  (इंग्रजीमध्ये) उसनवारी केली आहे.
माझे मूळ काम जर या पुस्तकात काही असेल तर ते एवढेच की, मी मुद्दय़ांची क्रमवार, संगतवार मांडणी केली आहे आणि त्यात सुलभता व स्पष्टता यावी याकडे पाहिले आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना काही बाबी डोकेदुखीसारख्या वाटतील, त्यांबद्दल मी पुस्तकाच्या विषयप्रवेशात (इंट्रोडक्शन) लिहिलेले आहे.
मला या कामी मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणे आता उरले आहे. साकरुली गावचे श्री. नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द- जिल्हा होशियारपूर, पंजाब येथील राहणारे प्रकाश चंद यांनी माझे हस्तलिखित ‘टाइप’ करून दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत:  नानकचंद रत्तू यांनी प्रसंगी स्वतच्या ढासळत्या प्रकृतीचीही काळजी न करता, तसेच आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ माझ्यावरील प्रेमापोटी हे काम केले. त्यांच्या श्रमाचे मोल करता येणार नाही.
मी या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हापासून आजारी असून आताही आजारीच आहे. या गेल्या पाच वर्षांच्या काळात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा तर माझी परिस्थिती अशी होती की डॉक्टर माझ्याशी जणू मालवत्या ज्योतीशी बोलावे तसे बोलत. या मालवत्या ज्योतीला पुनप्र्रकाशित करण्याचे कार्य माझी पत्नी तसेच माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे होऊ शकले. मी त्यांचा सर्वथैव आभारी आहे. त्यांनीच मला हे कार्य तडीस नेण्यात मदत केली आहे. संपूर्ण पुस्तकाच्या मुद्रितशोधनात विशेष रस घेणारे श्री. एम. बी. चिटणीस यांचेही आभार.
मी हेही सांगू इच्छितो की, हे पुस्तक तीन पुस्तकांपैकी एक असून त्या तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माच्या योग्य आकलनास मदत होईल. अन्य दोन पुस्तके (१) ‘बुद्ध व कार्ल मार्क्‍स’ आणि (२) ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ अशी आहेत. त्यांपैकी काही भाग लिहून झाले असून, तीही लवकरच प्रकाशित होतील."
– बी. आर. आंबेडकर
अनुवाद : अभिजीत ताम्हणे https://www.loksatta.com/lekha-news/the-buddha-and-his-dhamma-dr-b-r-ambedkar-1594868/
.................................
https://www.loksatta.com/lokrang/मुखपृष्ठ » लोकसत्ता-लोकरंग रविवार, दि. 3 डिसेंबर, 2017, पृ.1
.................................
‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला अखेरचा ग्रंथ. त्यास 61 वर्षे होत आहेत. सरकारने पुनर्प्रकाशित केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या समग्र खंडांमध्येही त्याचा अंतर्भाव आहे. डॉ. आंबेडकरांनी या ग्रंथास लिहिलेली प्रस्तावना या ग्रंथात समाविष्ट केलेली नाही. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ती प्रसिद्ध करीत आहोत..
..........................
{ ही प्रस्तावना नागपुरच्या समता सैनिक दलाने 1993 मध्ये प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात [ अनुवादक-प्रा.देवीदास घोडेस्वार ] छापलेली आहे- प्रा.हरी नरके }
..........................
उपोद्घाताची कथा..
‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा इंग्रजी ग्रंथ त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली प्रकाशित केला. त्यात ‘उपोद्घात’ म्हणून डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला मजकूर पहिल्या आवृत्तीत छापला नव्हता.
१९९२ साली महाराष्ट्र शासनाने आंबेडकर वाङ्मयाचा ११ वा खंड म्हणून हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला. त्यातही डॉ. आंबेडकरांच्या हातचा उपोद्घात समाविष्ट केलेला नाही. पण भगवानदास यांनी सप्टेंबर १९८० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘रेअर प्रीफेसेस’ या इंग्रजी पुस्तिकेत १५ मार्च १९५६ या तारखेस डॉ. आंबेडकरांनी तयार केलेला उपोद्घात छापलेला आढळतो. उपोद्घाताच्या या पहिल्या मसुद्यात डॉ. आंबेडकरांनी ५ एप्रिल १९५६ रोजी काही दुरूस्त्या केल्या. ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास आधी डॉ. आंबेडकरांनी काही किरकोळ दुरूस्त्या करून मसुद्यास अंतिम रूप दिले. डॉ. आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांनी आत्मकथेत हा उपोद्घात छापलेला आहे. (‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’- सविता आंबेडकर- १९९०.. पृ. २७९-२८३)
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भदंत आनंद कौसल्यायन दिल्लीतील डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानी गेले तेव्हा मेजावर ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथाचा डॉ. आंबेडकरांनी दुरूस्त केलेला उपोद्घात (भूमिका) त्यांना आढळला. (‘बोधि-द्रुम के कुछ पन्ने’- भदंत आनंद कौसल्यायन.. १९८६, पृ. ४८)

डॉ. आंबेडकरांनी हस्ताक्षरात दुरूस्त केलेला मूळ इंग्रजी उपोद्घात उपलब्ध असतानाही डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सूत्रधारांनी तो पहिल्या आवृत्तीत आणि नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच हिंदी व मराठी अनुवादातही छापला नाही.
डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आणि डॉ. आंबेडकरांचे एकुलते एक पुत्र यशवंत ऊर्फ भय्यासाहेब यांच्यामधील गृहकलह वाढीस लागला. डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच त्यांचा पुत्र आणि त्याची सावत्र आई यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. ‘डॉ. आंबेडकरांचे आकस्मिक निधन झाले ते त्यांच्यावर विषप्रयोग केला गेल्यामुळे..’ असे आरोप केले जाऊ लागले. हा आरोप म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या भक्तगणांपैकी एका गटाने पद्धतशीररीत्या डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकरांविरुद्ध चालवलेल्या मोहिमेचा भाग होता. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू नैसर्गिक होता किंवा नाही, याविषयी संसदेतही प्रश्न विचारण्यात आल्यामुळे भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी केली. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू विषप्रयोगामुळे किंवा कटकारस्थानामुळे झाला नसून तो नैसर्गिक होता, असा या चौकशी अहवालाचा निष्कर्ष होता.
ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर डॉ. आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेला उपोद्घात ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथात समाविष्ट करण्याऐवजी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष न्या. आर. आर. भोळे यांनी पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत त्यातील एक-दोन परिच्छेदांचा आधार घेऊन बाकी महत्त्वाचा मजकूर का गाळला असावा, याचे काहीसे स्पष्टीकरण देता येते.
मूळ इंग्रजी उपोद्घातामध्ये ऋणनिर्देश करताना डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, ‘या ग्रंथाच्या लेखनाचे काम सुरू केले तेव्हा मी आजारी होतो आणि आजही आजारीच आहे. गेल्या पाच वर्षांत माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झालेले आहेत. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती, की ‘मालवती प्राणज्योत’ अशा शब्दांत माझ्याबद्दल डॉक्टर बोलत असत. ही मालवती प्राणज्योत आजतागायत तेवत राहिली ती माझी पत्नी व डॉ. मालवणकर यांच्या कौशल्यामुळे. डॉ. मालवणकर माझ्यावर वैद्यकीय उपचार करीत असतात. माझी पत्नी व डॉ. मालवणकर या दोघांचाही मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनीच मला ग्रंथलेखनाचे काम पूर्ण करण्यास मदत केली.’
डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आंबेडकर यांच्या आठवणींनुसार, ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे निधन झाले त्याआधी काही तासच अगोदर डॉ. आंबेडकरांनी टंकलिखित उपोद्घातात भर घातली होती.. तीही त्यांच्या हस्ताक्षरात. गृहकलह लक्षात घेता डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला उपोद्घात १९५७ सालच्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट केला गेला असता तरच ते नवल ठरले असते. मात्र, चौकशी अहवालाचे निष्कर्ष जाहीर झाल्यावरही तो उपोद्घात नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच अनुवादात छापला गेला नाही हे गैरच झाले असे अभ्यासकांना वाटते.
- पद्माकर कांबळे | Updated: December 3, 2017 1:15 AM
........................

Saturday, December 2, 2017

कोपर्डी आणि खर्डा- जिल्हा एकच, न्यायाचं काय?


नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या मुलीवर झालेले अत्याचार भयंकरच होते. चीड आणणारेच होते.
दोषींना कडक शिक्षा व्हायलाच हवी होती. तशी ती झाली. फाशीचा जल्लोष सर्वदूर करण्यात आला. योग्यच झाले अशी भावना सर्वत्र उमटली.
नगर जिल्ह्यातील खर्डा, नितीन आगे हत्या प्रकरणातले सगळे आरोपी मात्र निर्दोष सुटले, याची हळहळ काही मोजक्यांनाच वाटली.
नगर जिल्ह्यातले हेरंब कुलकर्णी कळवळले. इतर चारदोन लिहू बोलू लागले.
मला वाटते दिवंगत नितीन आगेचे अनेक गुन्हे होते.

* नितीननं बहुसंख्याक जातीत जन्म का घेतला नाही?
1. नितीनने दलित जातीत जन्माला येऊन एका सवर्ण मुलीवर प्रेम केले. तीही प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीतली. त्यानं प्रेम करण्यापुर्वी जात बघून प्रेम करायला हवे होते. जिवंत असलेल्या संभाव्य नितीन आगेंनी याची नोंद घ्यावी.
2. नितीनने बहुधा स्वत: आत्महत्त्या केली असावी. आणि निर्दोष अशा गरिब मुलांवर हत्येचा नाहक आरोप लादण्यात आला असावा. ते सर्व सुटले ते "योग्यच" झाले. त्यांनीच आता नितीनच्या आईवडीलांवरच बदनामीची फिर्याद दाखल करावी. चांगली अद्दल घडायला हवी त्यांना.
3. सगळेच साक्षीदार फिरले.
त्यांना बिच्यार्‍यांना त्या गावात आणि महाराष्ट्रात राहायचंय ना?
यापुढे महाराष्ट्रात राहायचे असेल किंवा निवडून यायचे असेल तर प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीला दुखावण्याची हिम्मत कोणताही राजकारणी करणंच शक्य नाही.

4. पोलीस त्यांचे. सरकार त्यांचे. सत्तेतील बी टीमही त्यांची. सगळेच साहेब त्यांचे. अशावेळी नितीन आगेसाठी नाहक अश्रू कोण गाळणार? आमची संवेदनाच जिथं जातीय झालीय, तिथं कोणी कोणासाठी रडावं, लढावं, बोलावं, लिहावं, वाईटपणा घ्यावा?
5. दिवंत राष्ट्रवादी आर.आर. आबापाटील तेव्हा गृहमंत्री होते. ते म्हणाले होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमू. उज्ज्वल निकमांची नियुक्ती करू.
प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
कारण गोष्ट राजकीय समीकरणात उलटी होती. तसं करायचं तर स्वजातीयांना दुखवावे लागले असते. अशी पॉलीटिकली करेक्ट नसलेली गोष्ट कोणतेही साहेब घडूच देणार नाहीत.

6. भांडारकर हल्ला प्रकरणातील 72 जणही निर्दोष सुटले. ही 4 जानेवारी 2004 ची घटना घडली तेव्हाही आबाच गृहमंत्री होते.
इथे तर भांडारकर संस्थेतलेच साक्षीदार फिरले. जणू आरोपींनाच सामील झाले. भांडारकरमधल्याच लोकांनी बहुधा हल्ल्याचं नाटक करून निर्दोष ब्रिगेडींना नाहक गुंतवलेले असणार.खरंतर या 72 जणांनी भांडारकरवर बदनामीचा दावा लावायला हवा.
काय करणार, पुन्हा पुन्हा जानेवारी 1948 परवडत नसते मालक.

7. लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकच राज्य करत असतात. त्यांच्या मेहरबानीवर तुम्ही आम्ही जगत असतो. त्यांना दुखवले की तुमचा दाभोळकर, पानसरे होणं अटळच असतं.
8. नितीन आगेप्रकरणी आता मा. महाकवी आणि केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले म्हणतात, हायकोर्टात लढू.
हायकोर्टात साक्षीपुरावे होत नसतात.
जिथे सगळेच साक्षीदार फिरले तिथे हायकोर्ट तरी काय करणार?

8. जेसिका लाल प्रकरणात वेगळे घडले होते कारण तेव्हा जनताच रस्त्यावर आली होती. नितीनसाठी "आगे" कोणी यावं?
जिवावर उदार होऊन साक्ष द्या म्हणणं सोपं. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यावर समजतं मालक. जातीय दहशत किती भयानक असते.

9. माध्यमे- वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांबाद्दल लिहित नाही. त्यांनाही वाचक/टीआरपीची मजबुरी आहे. तेही शेवटी नोकरदार आहेत.त्यांनाही त्यांचे संसार, मुलंबाळं आहेत.
10. सगळ्या वाहिन्यांवरच्या चर्चा बघा. दलित, ओबीसी, आरक्षण असले काही विषय असतील तरच औषधापुरते त्या त्या समाजघटकातले प्रतिनिधी चर्चेला बोलावले जातात.
एरवी बाकी तमाम सगळ्या विषयांमध्ये "तज्ञांना" बोलावले जाते. तेथे पाहिजे जातीचे.
हे तज्ञ सध्या तरी दोनतीनच जातीत जन्मलेले आहेत हा निव्वळ योगायोग आहे. त्याला ते तरी काय करणार?
11. जिथे आम्ही आमच्या महान संतांचे उल्लेख करतानाही नावामागे त्यांच्या जाती लावतो. उदा. सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखा मेळा, नामदेव, [संत नामदेव यांच्या नावामागे जातीचा थेट उल्लेख नसला तरी याच नावाची शिंपी समाजाची एक पोटजात आहे....]......
फक्त दोनतीन जातीतले संत याला अपवाद असतात. कारण ते सर्वांचेच असतात. बाकीचे संत मात्र त्या त्या जातीचे असतात.

12. चालयचंच. उत्तमच आहे म्हणा. कधीकाळी याच महाराष्ट्राचा मला अतिशय अभिमान वाटायचा. आता फक्त, दहशत, उबग आणि खेद. आपल्याच राज्यात आपण गुलाम असल्याची खंत.

13. या देशात बळी हा माणूस होता यापेक्षा त्याची जात महत्वाची असते. नितीन आगे दलित असला तरी तो हिंदू मातंग या जातीचा. राज्यात सत्ता हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण तमाम हिंदुत्ववादी पक्ष-संघटना नितीनच्या हत्त्येवर मिठाची गुळणी धरून आहेत. कारण सरळ आहे. बहुसंख्याक जातीचे हिंदू विरूद्ध अल्पसंख्याक जातीचे हिंदू असा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा सत्तेसाठी बहुसंख्याक महत्वाचे. न्याय, निती, सत्य हे काय कामाचे? 
हरी नरके, नितीन आगे प्रकरणावर तुम्ही का लिहित नाही अशी फे.बु.वरून वारंवार विचारणा व्हायला लागली म्हणून मग स्पष्टच लिहिले.

14. दु:खाची गोष्ट म्हणजे फेबुवरच्या अनेक प्रतिभावंतांना उपरोधही कळत नाही.
-प्रा.हरी नरके

Wednesday, November 29, 2017

महात्मा फुले आणि तळेगाव ढमढेरे







14 जून 1887 रोजी महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि.पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून एक ऎतिहासिक सामाजिक लढा दिला होता.
न्हावी,धनगर, कुणबी,महार,मांग भंगी आणि माळी समाजातील महिलांनी शिबूबाई विठोबा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन नारायण काशिबा कर्‍हेकर या नाभिक बांधवाच्या कन्येचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं लावलं.
या लग्नांची 5 वैशिष्ट्ये म्हणजे, हुंड्याला नकार, लग्नात अवाजवी खर्च न करणे, मानपानाच्या खर्चात बचत करून ती रक्कम शाळांना देणगी देणं, लग्न कोणत्याही जातीचं असलं तरी गावातल्या महार भगिनीने लग्नमंडपात उपस्थित राहून नवरदेवास ओवाळणे आणि लग्नाला भटजीला न बोलावणे.
त्यामुळे आपली दक्षिणा बुडाली म्हणून तळेगाव, कासारी, तांबूळ ओढा या गावांमधील सीताराम यशवंत भवाळकर आणि लखोबा गोपाळ कुलकर्णी यांनी अशा सत्यशोधक लग्नांना विरोध केला. दुलेराव सटवाजी पिंगळे यांना धमकावण्यात आले. एका देवऋष्याची मदत घेऊन महिलांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.
अशा वेळी स्वत: महात्मा फुले तेथे गेले आणि त्यांनी सर्व महिला व अलुते, बलुते, दलित यांची एकी घडवून ही लग्नं यशस्वी केली. या भागात सत्यशोधक विवाहांची चळवळ उभी राहिली.
या संघर्षाबाबतचा तपशीलवार वृत्तांत स्वत: महात्मा फुले यांनीच 2 भागात जून आणि जुलै 1887 च्या "दीनबंधू" मध्ये प्रकाशित केला.
महात्मा फुले व सावित्रीबाई तळेगावात एक शाळाही चालवित असत.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे याच गावचे.
31 वर्षांपुर्वी 1986 साली गावच्या जत्रेत मला कारभारी किसनभाऊ भुजबळ यांनी भाषणाला बोलावले.
माझ्या भाषणात मी हा इतिहास सांगितला. गावात जोतीरावांचे स्मारक करावे अशी विनंती केली.
त्यामुळे गावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराचे नामकरण महात्मा फुले परिसर करण्यात आले. आवारात जोतीरावांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
जत्रेतले तमाशे, कुस्त्या, बैलगाडा शर्यती यातील अफाट खर्चात बचत करून शाळा आणि महाविद्यालयाला मदत दिली जावी, गरिब,हुशार मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाला यातून मदत करावी ह्या सुचनाही अंशत: अमलात आल्या.
गेली 12 वर्षे सोनाई व्याख्यानमालेत राज्यातील नामवंत वक्ते बोलावण्याची प्रथा आपण निर्माण करू शकलो. प्रथमच व्याख्यानमालांची संस्कृती उभी राहू लागली.
पिकतं तिथं विकत नाही अशी म्हण या गावानं चक्क खोटी ठरवली.
माझं भाषण गावात व्हावं म्हणून खुपदा निमंत्रणं आली. पण मी जाऊ शकलो नाही.
यावर्षी 28 नोव्हेंबरला मी आलंच पाहिजे असा ग्रामस्थांचा व कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह होता.
कालच्या व्याख्यानाला तुफान गर्दी लोटली होती.
मुख्य म्हणजे भाषणानंतर तात्काळ त्याचे काही परिणामही दिसले.
महेश बापू ढमढेरे यांनी गावात "शेतकर्‍यांचा आसूड" या महाग्रंथाचे सामुदायिक वाचन करू अशी घोषणा केली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरतीताई भुजबळ यांनी गावातल्या महिलांना एकत्र आणून गावात दारूबंदी करू अशी घोषणा केली. माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी फुल्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असा शब्द जाहीरपणे दिला.
या कार्यक्रमाला महिला, तरूण आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 वर्षांनी का होईना गाव कूस बदलतोय.
शेवटी सामाजिक परिवर्तनाची आपली अशी एक गती असते! वेग असतो.
-प्रा.हरी नरके

Wednesday, November 22, 2017

Dr Rakhmabai Save-Raut Googl's Tributes

Sincere Tributes to Dr. Rukhmabai Raut,
India's first practicing woman Doctor.
Rukhmabai had studied in London School of Medicine in 1889.Today is her 153rd Birth Anniversary.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत,रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
यांना 153 व्या जयंतीनिमित्त गुगलची आदरांजली-
जन्म-22नोव्हेंबर1864  - मृत्यू-25डिसेंबर1955

आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर - डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती
-भारत ज्यांना विसरलेला आहे.
सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

What an incredible lady


Prerna Tambay - Anandi Gopal Joshi qualify as first Indian lady doctor. However, she never practised medicine due to her premature death just after returning back from America. Rukhmabai Save-Raut was a child bride who wanted to study and she refused to stay with her husband. She was sharply aware that if she went to her in-laws she would not be able to study. Her husband, Dadaji filled petition against her. She agreed to go to jail but refused to give up her dream. At the age of 25 she went to England to do her MD. She practised medicine in Mumbai and in Surat, till the end of her life. What an incredible lady, she deserves her due and loads of respect. Today we celebrate her 153 birth anniversary.- प्रेरणा तांबे-लंडन

Tuesday, November 21, 2017

मी महंमद खान शपथेवर सांगतो की---


महंमद आमिर खान जुन्या दिल्लीतील गरीब कुटुंबातील मुलगा.
दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणार्‍या आपल्या मोठया बहिणीला भेटायला गेला. दिल्लीतील गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात.
देशप्रेमापोटी अजाणतेपणे तो होकार देतो.
कराचीत तिथल्या पोलीसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हातानं दिल्लीला परततो.
दिल्ली पोलीस त्याचं अपहरण करतात.
गुप्तहेर यंत्रणा त्याचा अतोनात छळ करतात.
त्याच्यावर तब्बल 19 खोटे खटले भरले जातात. त्याला अतिरेकी ठरवले जाते.
खोटे साक्षीदार उभे केले जातात. बनावट पुरावे तयार केले जातात.
चौदा वर्षे त्याला कच्च्या कैदेत तुरूंगात काढावे लागतात.
त्याचे वडील कोर्टात हेलपाटे मारून थकतात. मरून जातात. आईही थकते. अर्धांगवायूनं आजारी पडते. मरते.
अखेर त्याची 17 केसेसमधून निर्दोष सुटका होते. दोन खटले अद्यापही रेंगाळलेत.

पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो,"मी पुर्णपणे मुक्त नसलो, तरी तुरुंगातही नाहीये. अन्यायाविरूद्ध लढतोय आणि आपल्यापैकी आणखी काही लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या या लढ्यात सहभागी झाले, तर आपण समाज बदलू शकतो."
एक निरपराध तरूणाची वयाच्या अवघ्या 20 वर्षांपासून तुरुंगवासानं सुरू होणारी ही लढत आज पस्तीशीच्या टप्प्यावर पोचलीय.
एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन-
राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती सप्टेंबर 2017, पृष्ठे 156,किंमत रू.180/-
-प्रा.हरी नरके

Saturday, November 18, 2017

22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-


आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती- आज भारत त्यांना विसरलेला आहे.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
जन्म- 22 नोव्हेंबर, 1864 मृत्यू- 25 डिसेंबर, 1955

सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

Friday, November 10, 2017

पोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय -



"महाराज, पोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय, डोक्यावर कायतरी परीणाम झालेला असणार. जालीम इलाज करा."
माझी आई देवऋषीला सांगत होते.
देवऋषी म्हणाले, "पोराला लागीर झालंया. मसणवट्यातनं जाताना बाधा झालीया."
पाचवीत आम्हाला भानुदास कोंडीबा गाडे नावाचे शिक्षक इंग्रजी विषय शिकवायचे. ते समर्पित शिक्षक होते. ते भान हरपून विषयात आणि मुलांमध्ये रमायचे. ते बारामतीजवळच्या चोपडजचे असल्यानं त्यांची भाषा आम्हा पुणेकरांना थोडी गमतीची वाटायची. आमच्या वर्गात साधना गांधी नावाची एक मुलगी होती. तिचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या काळात मोठी रॉकेल टंचाई असायची. तर एके दिवशी सर भर वर्गात तिला म्हणाले,"गांधी तुझ्यात रॉकेल अस्तंय काय?" सगळा वर्ग हसला.
ते दररोज 5 नवे इंग्रजी शब्द शिकवायचे आणि जे विद्यार्थी त्या शब्दांचे स्पेलिंग पाठ करून येतील त्यांना स्वखर्चानं पेन, पेन्सील, खोडरबर भेट द्यायचे. दररोज आपल्याला पहिलं बक्षीस मिळावं म्हणून मी घरीदारी सतत धोसरा घेऊन स्पेलिंग पाठांतर मोहीमेवर असायचो.
देवऋषी महाराजांनी सांगितलेली उपाययोजना फारच तापदायक होती. आई दररोज भल्या पहाटे मला उठवायची. डिसेंबरमधली कडक थंडी.
नदीवर जाऊन त्या कडक थंडीत आंघोळ करायची, मग ओलेत्या कपड्यांनी मसणवट्याशेजारच्या पिंपळाला 101 फेर्‍या मारायच्या.
पहिल्या नी शेवटच्या फेरीत पिंपळाला उडीद वहायचे. असं हे सव्वा महिना रोज चालू होतं.
मला खुप राग यायचा. पण आई हातात छडी घेऊन स्वत: सुपरव्हिजन करायची.
तिला मी इंग्रजी स्पेलिंग पाठ करतोय हे पटायचंच नाही.
आमच्या झोपडीशेजारी एकुण तीन स्मशानं होती. त्यातल्या पारशांच्या स्मशानात मी नोकरी करीत असल्यानं मला तिकडची भिती वाटायची नाही. शेजारच्या हिंदू नी बाजूच्या मुस्लीम स्मशानात जाताना मात्र थोडी भिती वाटायची. त्यावर उपाय म्हणुन मी मला येत असलेली सगळी स्तोत्रं म्हणायचो.
शेवटी स्वत: गाडेसरांनी घरी येऊन आईची समजूत घातली. त्यावर आईचं म्हणणं, " गुर्जी, तुम्ही म्हणताय तर ठीकच असंल. पण मी म्हणते, असली कोंगाड कोंगाड भाषा आपण शिकावीच कशाला?"
- प्रा. हरी नरके
फोटो- नातीसोबत आई [प्रमिती]-1993

Thursday, November 9, 2017

फेसबुकमुळे निघाली दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती


"डॉ.रखमाबाई : एक आर्त" या पुस्तकाबद्दल दोन महिन्यांपुर्वी मी टाकलेल्या एक पोस्टने बघताबघता ग्रंथ चळवळीचे रूप घेतले नी त्याचे थेट फलित आज वाचकांच्या हातात पडले आहे.
1982 सालचे हे चरित्र गेली तीन दशके उपलब्ध नव्हते. डॉ.रखमाबाई सावे या देशातील पहिल्या महिला डॅाक्टर ज्यांनी वयाच्या 91 वर्षांपर्यंत रूग्णसेवा केली. डॉ.रखमाबाईंपुर्वी आनंदीबाई जोशी डॅाक्टर झाल्या होत्या खर्‍या परंतु त्या भारतात परत आल्या नी आजारी पडल्या व त्यांचे लगेच अकाली निधन झाले.त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत. त्यांना वैद्यकीय सेवाच करता आली नाही.
वैद्यक क्षेत्रातील आणि विशेषत: महिला डॅाक्टर्सना या पुस्तकामुळे एक नवी उर्जा मिळेल.
पुस्तकाचे मूळ प्रकाशक असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं अस्मिता मोहिते फे.बु.पोस्ट वाचून त्वरीत पुढे आल्या नी 350 प्रती आगावू नोंदल्या गेल्यास आपण या ग्रंथाची विशेष आवृत्ती काढू अशी त्यांनी घोषणा केली.
आगावू नोंदणीचे आवाहन करताच कवी अजय कांडर यांनी पहिली प्रत नोंदवली. कमलताई विचारे, विजय मराठे आणि इतर अनेकजण पुढे आले नी प्रत्येकाने 1 ते 100 अशा संख्येने पुस्तकांचे पैसे भरून नोंदणी केली गेली.
ज्यांनी ज्यांनी आगाऊ नोंदणी केलीय त्यांना आजपासून घरपोच प्रती मिळायला सुरूवात झालीय. मूळ 375 रूपये किमतीचे हे पुस्तक पोस्टेज खर्चासह रूपये तीनशेला आगाऊ नोंदणी करणारांना मिळतेय.
काही मोजक्या प्रतीच उपलब्ध आहेत. जे त्वरित पैसे भरतील त्यांना त्या मिळू शकतील.
काही मित्रांनी बॅंकेत पैसे तर भरलेत मात्र प्रकाशन संस्थेचे श्री गोपीनाथ मयेकर यांना आपला नाव - पत्ता कळवलेला नाही, त्यांनी तो त्वरीत कळवावा ही विनंती. म्हणजे त्यांना प्रती घरपोच मिळतील.
-प्रा.हरी नरके
बुकींगसाठी खालील बॅंकखात्यावर आपण एका प्रतीचे पोस्टेजसह 300 रूपये पाठवू शकता.
POPULAR PRAKASHAN PVT. LTD.
Axis Bank, Fort Branch, Mumbai
Current Account number 004010300021933
Type of account : OCC
IFSC : UTIB0000004
पैसे जमा केल्यावर ☎ 022-23530303 / 09029893938 (Contact person : Gopinath Mayekar) वर फोन करून आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर कळवावा म्हणजे प्रती पाठवणं सोईचं होईल.
'पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.' नावाने चेकसुद्धा पाठवू शकता.
पत्ता :
पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.
३०१ महालक्ष्मी चेंबर्स
२२ भुलाभाई देसाई रोड
मुंबई ४०००२६

आईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -





माझे वडील मी खूप लहान असताना गेले. पुढचं आमचं सगळं आईनंच केलं.
आई आम्हा चिल्यापिल्यांसाठी रात्रंदिवस राबायची. मोलमजुरी करायची, ती निरक्षर होती.
कष्टाला वाघीण, तापट स्वभावाची, व्यसनांबद्दल कमालीची चिड असणारी.
एकदा मोठ्या भावानं मित्रांच्या संगतीत दोन घोट घेतले.
आईला कळल्यावर ती इतकी संतापली की तिनं सलग दहा दिवस अन्नसत्त्याग्रह केला.
परिणामी आम्हा भावंडांना आयुष्यात कसलंही व्यसन जडलं नाही.
त्या दिवसांची आठवण म्हणून पुढं दरवर्षी ती दहा दिवस उपास करायची.
निळूभाऊ फुले खलनायकाची कामं करतात म्हणून त्यांच्यावर तिचा फार राग होता. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा ती त्यांच्यावर फार भडकली होती. त्यांना चिडून बोलली होती.
एकदा स्वत: भाऊंनीच तिला शुटींग पाहायला नेलं नी ते कसं खोटं असतं, नाटक असतं याची तिची खात्री पटवली. मग ती भाऊंची फॅन झाली.
हातपाय धट्टेकट्टे असताना आपल्याला मृत्यू यावा अशी तिची प्रबळ इच्छा होती आणि ती वयाच्या 85 व्या वर्षी गेली तीही चालताबोलतानाच.
तिला जाऊन 12 वर्षे झाली.

जाताना ती तिची शेवटची इच्छा सांगून गेली, मोलकरणीचं काम करून, मोलमजुरी करून तिनं आयुष्यभरात काही छोटेछोटे दागिने केले होते, ते मोडा, नी महाराष्ट्रातल्या 10 सामाजिक नी शैक्षणिक संस्थाना ती रक्कम भेट द्या. निळूभाऊंच्या हस्ते हा कार्यक्रम करावा अशी तिची  इच्छा होती.
निळूभाऊ त्यासाठी आमच्या गावी तळेगाव ढमढेरेला आले.
हजारो लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला.
आम्ही भावंडांनी तिच्या नावानं गावात एक व्याख्यानमाला सुरू केलीय. आजवर अनेक नामवंत त्या व्याख्यानमालेला आवर्जून आलेत.
त्याच कार्यालयात परवा [सोमवार, दि.13 रोजी,] या सोनाई व्याख्यानमालेत लेखक, समीक्षक नी विचारवंत संजय भास्कर जोशींचं व्याख्यान होईल.
ती गेली तेव्हा मी नेहमीप्रमाणे एका सामाजिक कार्यक्रमाला विदर्भात गेलोतो.
कळल्यावर आलो तोवर अंत्यसंस्कार झालेले होते. येताना रस्त्यात सतत डोळे भरून यायचे.
माझे अतिशय आवडते लेखक चारूता सागर यांची वाट ही कथा मला अतिशय भावलेली.
आजारी आईच्या शेवटच्या भेटीला निघालेल्या लेकीची परवड चित्रित करणारी. चटका लावणारी. डोळ्यातून पाणी काढणारी.
ते पुस्तक एका मित्रानं माझ्याकडून वाचायला नेलं नी हरवलं. त्या कथासंग्रहाचं नावच काही केल्या मला आठवत नव्हतं. जणू मेमरी इरेझ झालेली.
आईच्या अंत्यविधीला निघालो असताना प्रवासात ती कथा मला आठवली आणि अनेक वर्षे विस्मृतीत गेलेलं कथासंग्रहाचं नाव अचानक आठवलं. "नागीण"
माझा मित्र भीमराव गोपनारायण याची "सर्वा" या कवितासंग्रहातली एक दोनोळी माझ्या आईचीच भावना सांगते जणू.
"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते."
- प्रा.हरी नरके

Tuesday, November 7, 2017

नोटाबाणी








इंदोर, दि. 8 नोव्हेंबर 2016 -
सायंकाळी बातम्या बघण्या-ऎकण्यासाठी हॉटेलच्या रूममधला टिव्ही लावला तर सुतकी चेहर्‍याने घातलेली मित्रो, अशी हाक ऎकू आली. आता भारत-पाक युद्ध घोषित होणार म्हणून काळजी वाटायला लागली. पोटात धडकीच भरली ना!
बघतो तर काय? झाली ना नोटाबंदीची घोषणा.
प्रवासात मोजकेच पैसे बरोबर आणलेले. तेही ठेवायला सोयीचं व्हावं म्हणून 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये. आता काय करायचं?
आधल्याच दिवशी इंदोरच्या पुस्तक दुकानात जाऊन बरीच हिंदी पुस्तकं घेण्यासाठी ऑर्डर दिलेली. उद्या दुकानाला सुट्टीय. परवा या. आणून ठेवतो असं दुकानदार म्हणालेला. मनासारखी पुस्तक मिळणार म्हणून आनंद झालेला.
दुसर्‍या दिवशी गेलो तर दुकानदारानं सगळी पुस्तकं आणलेली होती. पण तो म्हणाला, 1000, 500 च्या नोटा "महज एक कागज का टुकडा" असल्यानं चालणार नाहीत.
त्यामुळे हातातोंडाशी असलेली पुस्तकं न घेताच परत फिरावं लागलं.
संगिताला इंदोरमध्ये महेश्वरी साड्या, कपडे, नमकीन, मिठाई अशी कायकाय खरेदी करायची होती, कागज का तुकडा काय कामाचा? सबब खरेदी कॅन्सल.
इंदोरला जाऊनसुद्धा काहीही न घेता आम्ही हात हलवत परत आलो.
मेहरबानी परतीच्या तिकीटांचं रिझर्वेशन आधीच झालं होतं म्हणून परत तरी येता आलं. नाही तर राहावं लागलं असतं इंदोरातच.
एकच आनंद होता की आता भारतात सुवर्णयुग येणार. अमीर लोकांची चैन की निंद हराम की होणार. गरीबाची मात्र चांदी होणार.
आणि तसंच झालं. सगळ्यांचे अच्छे दिन सुरू झाले.
बघता बघता गरीब मालामाल झाले.
श्रीमंत पार भिकारी झाले.
लाखो - करोडोंचा काळा पैसा बाहेर आला.
भारताचा जीडीपी दोन हजार वर्षात प्रथमच 25% वर गेला.
नवे रोजगार इतके जास्त निर्माण झाले की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी संपुर्ण बेरोजगारी प्रथमच दूर झाली.
100 टक्के भारतीय श्रीमंत झाले.सारा भारत एका रात्रीत डिजीटल झाल्यानं कार्ड पेमेंटवर कमिशन कमावता येऊ लागले. कामधंदा न करता पैसे कमावण्याचा घरबसल्या नवा मार्ग उपलब्ध झाला. अगदी सरकारी कंपन्याही [महा.विद्युत निर्मिती आणि पारेशन] कार्ड पेमेंट केले तर आजही त्या रकमेवर कमिशन घेतात. धन्य धन्य सरकार.
दुसर्‍या दिवसापासून ए.टी.एम. वर हवे तेव्हढे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.
देशात रांगा म्हणून कुठेच नाहीत.
बॅंक कर्मचार्‍यांना तर कामच शिल्लक राहिलं नाही.
सगळा काळा पैसा संपल्यानं देशभर आनंदी आनंद पसरलेला.
असा महान राज्यकर्ता या आधीच आम्हाला का मिळाला नाही असं जो तो एक दुसर्‍यांना विचारू लागला.
पाडवा, दिवाळी, दसरा, आणखी कायकाय एकदमच साजरं करू लागला.120 जणांना रांगेतून मोक्ष मिळाला. आणीबाणीमुळे इंदिराबाईंना जावे लागले होते तसे या नोटाबाणीसाठी कोणाला घालवणार?
तर मित्रो, आजच्या दिवशी वर्षश्राद्ध घालायचं तर काय करता येईल?
आपण तमाम भारतीय आजच्या आपल्या राष्ट्रीय पुण्यतिथीदिनी
सामुदायिक आत्महत्त्या केल्याची आठवण म्हणून
सर्व मिळून दोन मिनिटं उभं राहून स्वत:लाच श्रद्धांजली वाहू या का?
-प्रा. हरी नरके
...........................

Sunday, October 22, 2017

तुम्ही समुद्रातच उडी मारली असती-

सर, एक वाईट बातमी आहे. तुमच्या मुंबईच्या बहिणीला अपघात झालाय. त्यांची तब्बेत गंभीर आहे. तुम्हाला मुंबईला घेऊन जायला आमचं हेलीकॉप्टर आलेलं आहे. तुम्हाला तातडीनं निघायला हवं.
अरे बापरे. काय सांगताय? ती माझी एकुलती एक आणि लाडकी बहीण आहे. तुम्हाला ही बातमी कशी आणि कधी कळली?
2 तासापुर्वी दिल्लीच्या आमच्या मुख्यालयातून आम्हाला मेसेज आला. कुणीतरी तुमच्या दिल्ली ऑफिसला कळवलं. त्यांनी तो निरोप आमच्या कार्यालयाला दिला.
अरे, पण तुम्हाला दोन तासांपुर्वी कळलेली बातमी तुम्ही मला लगेच का सांगितली नाहीत?
सर, आपण, दूर समुद्रात आहोत. हेलीकॉप्टर इथे पोचायला दोन तास लागतात. बातमी कळल्याबरोबर आम्ही वरिष्ठांच्या अनुमतीनं तुमच्यासाठी हेलीकॉप्टरची व्यवस्था केली.
हेलीकॉप्टर यायच्या आधी तुम्हाला बातमी सांगितली असती तर तुम्ही समुद्रातच उडी मारली असती.
ओ, थॅंक्स.
मी मुंबईला पोचलो आणि तिथून टॅक्सी करून त्वरीत पुण्याच्या रुबी हॉस्पीटलला आलोय. आता मधुची तब्बेत कशीय? डॅाक्टर काय म्हणताहेत? विजय मला विचारत होता.
चला आपण डॅाक्टरांनाच विचारू या.
सिरियस हेड ईंज्युरी आहे. त्या सध्या कोमात आहेत. सर्व ट्रीटमेंट चालूय. 48 ते 72 तास आपल्याला वेट करावं लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल. लेट्स होप फॉर गुड.
मधुचा भाऊ विजय माझे आभार मानत होता. तो टाइम्स ऑफ इंडीयाच्या दिल्ली कार्यालयात पॉलिटिकल एडीटर होता.
संरक्षण मंत्र्यांनी देशातल्या आम्हा निवडक पत्रकारांना एक सिक्रेट मिशन दाखवण्यासाठी समुद्रात नेलं होतं.
हा अपघात नेमका झाला कसा?
खरंतर मलाही नीट माहित नाही. काल रात्री 2 वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, अपुर्व आणि मधुला लोणावळ्याजवळ गंभीर अपघात झालाय असा मला पोलीस कंट्रोल रूमचा फोन आला होता. पोलीस त्यांना घेऊन ससूनला निघालेत. माझा ड्रायव्हर नेमका आज गावी गेलाय. तू तुझी स्कूटर घेऊन लगेच आलास तर आपण ससूनला जाऊ.
मी येतो. मला पिंपरीहून तुझ्याकडे पोचायला अर्धा तास लागेल. तू तयार राहा.
मरणाची थंडी होती. गडबडीत मी स्वेटर घालायला विसरलो. स्कूटरवर गार वारा भनान लागत होता. नाकाडोळ्यातून पाणी येत होतं.
मी अर्ध्या तासात तिच्या बंगल्यावर पोचलो. ती तयारच होती. आम्ही ससूनला गेलो. अपुर्वला किरकोळ जखमा होत्या. मधू मात्र कोमात होती. ससूनचा व्हेंटीलेअर नेहमीप्रमाणेच बंद होता.
आम्ही त्यांना ससूनमधून रूबीला शिफ्ट करायचं ठरवलं. अ‍ॅंब्युलन्स तयारच होती. व्हीआयपी केस असल्यानं पोलीस अधिकारी जातीनं राबत होते. अपुर्व मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला. तो त्यांचा ओएसडी होता. पुर्वी सामाजिक चळवळीतून आलेला, नव्या दमाचा लेखक पण सध्या राजकारणात सक्रीय असलेला.
आयसीयुमध्ये डॅाक्टर साठे भेटल्या. त्या माझ्या ओळखीच्या होत्या. त्यांनी तातडीनं ट्रीटमेंट सुरू केली.
काही वेळानं आम्ही तिघं बाहेर आलो. अपुर्वनं सिगारेट पेटवली.
अपुर्व, अपघात कसा झाला? आम्ही विचारलं.
आम्ही तुझ्याकडून जेवून निघालो तेव्हा रात्रीचे 12 वाजलेले. आमचा दोघांचा डोळा लागला होता. हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकवर आमची वेगात असलेली कार धडकली असावी. सुदैवानं ड्रायव्हर शुद्धीत होता. त्यानं गाडीतल्या वायरलेसवरून पोलीस कंट्रोलला कळवून अ‍ॅंब्युलन्स मागवली. एव्हढ्या रात्री कोणाला कळवणार? म्हणून तुलाच फोन केला. बरं झालं, तुम्ही दोघं लगेच आलात, अपुर्व म्हणाला.
तो ट्रॉमामध्ये होता. बर्‍याच वेळानं तो सावरला. मला म्हणाला, हरी, प्लीज एक काम कर. वर्षावर फोन करून सीएमना कळव.
मी म्हटलं, अरे इतक्या रात्री ते झोपलेले असतील. झोपमोड केली म्हणुन चिडतील.
नाही चिडणार. अरे एव्हढे दिवस त्यांच्यासाठी मिडीया आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट करतोय. रात्रंदिवस राबतोय. तू बिनधास्त फोन कर.
मी घाबरत घाबरत पीसीओवरून वर्षा बंगल्यावर फोन केला. पहिल्याच रिंगला उचलला गेला.
जयहिंद, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून ड्युटी ऑफिसर कामठे बोलतोय.
मी काम सांगितलं. ते म्हणाले, सर, सीएम झोपलेत. पण बघतो.
स्वत: सीएम दोनच मिनिटात लाईनवर आले. अपुर्वला अपघात झालाय? कसाय तो?
सर, तो बराय. पण त्याच्यासोबतची महिला पत्रकार मधु गंभीर जखमी आहे.
काही काळजी करू नका. दहा मिनिटात पुण्याचे जिल्हाधिकारी तिथे पोचतील. डॅाक्टरांना सांगा, पैशांची चिंता करू नका. बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट द्या.
खरंच 10 मिनिटात कलेक्टर आले. ते मला ओळखत होते. त्यांनी आल्याआल्या सुत्रं हातात घेतली. पोलीस अधिकार्‍यांना सांगून सिक्युरिटी वाढवली. अपुर्वने दिलेल्या सर्व फोननंबरवर निरोप पोचवले.
तासाभरात एका इंग्रजी आणि एका हिंदी पेपरचे संपादकही दस्तुरखुद्द पोचले. सकाळी सीएमचे पुतणे भेटायला आले. संध्याकळी साहेब येतील असा त्यांनी निरोप दिला.
36 तासांनी मधू शुद्धीवर आली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.एव्हाना मधुचे इतर नातेवाईकही पोचले होते. अपुर्वची पत्नीही आली.
वर्तमानपत्रात या अपघाताच्या मिठमसाला लावलेल्या उलटसुलट बातम्या यायला लागल्या तेव्हा अपुर्वची पत्नी रडायला लागली.
तरी मी त्याला सांगत होते, तिच्या नादाला लागू नकोस. पण तो ऎकेल तर ना? ती माझ्यापेक्षा जास्त तरूण आहे ना!
माझ्या माहितीप्रमाणे अपुर्व चांगला माणूस होता. निदान माझ्या मैत्रिणीचं तरी तसं खात्रीलायक म्हणणं होतं. ती महिला चळवळीत सक्रीय होती.
मंत्रालय वार्ताहर संघाचे सदस्य मात्र मला भेटून खोदूनखोदून माहिती विचारीत होते. मी माझ्याकडच्या अपुर्व माहितीच्या आधारे किल्ला लढवत होतो.
अपुर्वही स्व:ता दूर राहून सगळ्या तोफेच्या तोंडी मलाच देत होता.
सलग 48 तास मी झोपलो नव्हतो. आंघोळ नाही, झोप नाही, धड जेवनही नाही यामुळं खुप थकवा आलेला होता. एके दिवशी रुबी हॉस्पिटलवर पोलीसांची धावपळ वाढली. अपुर्वला भेटायला विरोधी पक्षातले सर्वोच्च नेते आलेले.
ते म्हणाले, " अरे काय हे अपुर्व? सीएमसोबत राहतोस नी चुकीच्या ठिकाणी धडका मारतोस. तुझा सीएम बघ, सावज टप्प्यात आल्याशिवाय कधीच चाप दाबत  नाही. धडक कधी आणि कुठे मारायची ते त्याच्याकडून शिकून घे. अरे, व्यंगचित्रात काय किंवा चित्रात काय ब्रश चुकीच्या ठिकाणी सटकला तर चित्राची माती होते. अचुक नेम महत्वाचा. तुझा सीएम तसा भला माणूस आहे. पण दिल्लीला असलेलं मैद्याचं पोतं त्याला या खुर्चीवर जास्त दिवस टिकू देणार नाही बघ." मी त्या ग्लॅमर असलेल्या, करिष्मा असलेल्या विरोधी पक्षातल्या सर्वोच्च राजकीय नेत्यांच्या शेजारी उभा राहून त्यांचं हे बोलणं ऎकत होतो.
फार भारावून गेलो होतो. अपुर्वमुळं ते इतक्या जवळून आपल्याला बघायला मिळाले. एकुण अपुर्व हा तंतोतंत भला माणूस म्हणायचा.
मधुचा भाऊ नी मुंबईच्या हिंदी पेपरचे संपादक मात्र मला एका बाजूला घेऊन सांगत होते, हरी, अपुर्व चांगला माणूस नाहीय. लबाड आहे. सीएमची सगळी टेबलाखालची डिल्स तोच सांभाळतो. पेट्या आणि खोकी यांची रसद मिडीया आणि राजकीय नेत्यांना पोचवतो. त्यानं मधुला जाळ्यात पकडलंय. ती लहान आहे. तिला याची, त्याच्या बोलण्याची, चित्रांची, कवितांची भुरळ पडलीय. तू याच्यापासून दूर राहा.
मला कळत नव्हतं, कोणाचं खरं मानावं?
मधु-अपुर्वसोबत मी आठ दिवस हॉस्पीटलमध्येच होतो.
माझी महिला चळवळीतली मैत्रिण मात्र येऊन जाऊन असायची.
त्या दोघांना डिस्चार्ज मिळाला. अपुर्वची बायको, माझ्याशी शेकहॅंड करीत म्हणाली, हरी, तू खुप धावपळ केलीस. थॅंक्स. मुंबैला आलास तर आमच्या घरी चेंबूरला नक्की ये.
माझ्या कामात मी ते निमंत्रण विसरूनही गेलो.
मुंबईचे पत्रकार मात्र हा अपघातच होता की मधुला मारण्याचा प्लॅन होता, मधू गरोदर आहे काय? याचा छडा लावण्यासाठी अधून मधून
मला फोन करायचे. मी मला माहित असलेल्या गोष्टी त्यांना सांगत त्यांच्याशी वाद घालायचो.
वाटायचं, एखाद्या सज्जन माणसाला किती छळतात हे पत्रकार!
एकदा मंत्रालयात गेलो असताना, सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाशेजारी अपुर्वच्या नावाचा बोर्ड दिसला. त्याच्या तब्बेतीची चौकशी करावी म्हणून आत गेलो.
पीए म्हणाला, बसा, विचारतो.
त्यानं इंटरकॉंमवरून मी भेटायला आल्याची माहिती अपुर्वला दिली.
मला म्हणाला, साह्यबांनी तुम्हाला बसायला सांगितलय.
मी अर्धा तास बसलो तरी आतनं बोलावणं येईना.
आत कसली मिटींग चालूय का?
नाही. साहेब एकटेच बसलेत. साह्यबांना लोणावळ्याला अपघात झाला तेव्हा नरकेसर, तुम्हीच हॉस्पीटलमध्ये सगळी धावपळ करीत होता ना? मी ओळखलं तुम्हाला. जा तुम्ही आत, मात्र मी सांगितलं, असं सांगू नका.
मी दरवाजावर टकटक केलं. परवानगी विचारून आत गेलो.
अपुर्वच्या कपाळावर आठ्या होत्या. तो नाराजीनं म्हणाला, काय काम होतं?
मी म्हटलं, इकडे आलो होतो, तुमचा बोर्ड बघितला. म्हटलं, तब्बेतीचं विचारावं, म्हणून सहजच आलोतो.
कामाचं बोला हो, कामाशिवाय कोणीही असं येत नसतं.
मी म्हटलं खरंच काही काम नव्हतं.
तो म्हणाला, ठीकय. निघा मग. मी खुप बिझी आहे.
-प्रा.हरी नरके
काही व्यक्तींची नावं बदललेली आहेत. बाकी पात्रे,घटना,प्रसंग,प्रवृत्ती काल्पनिक वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.

Thursday, October 19, 2017

निखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून-

ऋतुरंगच्या दिवाळी अंकात "आमचं सहजीवन" या सदरात निखिल वागळेंचा सुकून हा लेख आहे.
अक्षरच्या दिवाळी अंकात त्यांनी "माझ्या खिशातला राजीनामा" हा लेख लिहिलेला आहे.
आय.बी.एन.लोकमत ही वाहीनी सुरू करण्यापासून ती नावारूपाला आणण्यात वागळेंचा मोठा वाटा. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आले आणि पाच दिवसात या वाहिनीची मालकी असलेला माध्यमसमुह मुकेश अंबानींनी विकत घेतला. त्यानंतर राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळेंना आपली पदे सोडावी लागली. त्याबाबत पडद्यावर झळकणार्‍या या माणसांच्या बाबतीत पडद्यामागे नेमके काय घडले याचे वागळेव्हर्जन या लेखात वाचायला मिळते.
इलेक्ट्रॉनिक वाहीन्यांचं हे कॉर्पोरेट जग नेमकं कसं चालतं? तिथल्या पत्रकारांना खरंच काही स्वातंत्र्य असतं का? पैशांच्या जोरावर मालकलोक्स टेबलावरून नी टेबलाखालून कायकाय व्यवहार करतात? तिथल्या संपादकांना कोणत्या तडजोडी कराव्या लागतात? असे आणि इतर अनेक प्रश्न आपल्या मनात कायम असतात. त्यातल्या काहींची उत्तरं या लेखात मिळतील.
वागळे हे माध्यमांमधले अमिताभसारखे अ‍ॅंग्रीयंगमन. तशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मानणारा आणि त्यांचा तिरस्कार करणारा असा दोन्ही बाजूंना मोठाच जनसमुदाय आहे. पत्रकारांमध्ये त्यांना रोलमॉडेल मानणारे अनेक तरूण आहेत. ते यशस्वी व्यवस्थापक आहेत. मराठीतले नामवंत वक्ते आहेत. वागळेंकडे जबरदस्त जिगर आहे. कल्पकता नी प्रतिभा आहे. त्यांच्याकडे अशा जमेच्या बाजू खुपच आहेत. त्या अर्थानं वागळे दणकट पत्रकार आहेत.
बघा फक्त आयबीएन लोकमत ही त्यांची घोषणा, ही टॅगलाईन भारी वाटत असली तरी इतरांकडेही काही चांगलं असू शकतं हेच ते विसरून गेले होते काय? एका मोठ्या पत्रकाराचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा बनली होती काय?
वागळेंना आपण तिरसट असल्याचा अभिमान आहे असं ते या लेखात सुचित करतात.
वागळे अ‍ॅन्कर म्हणून आधी भारी होते, पण नंतर ते न्यायधिश बनू लागले. अनेकांशी ते खुनशीपणानं वागू लागले.
वागळेंना मी किमान 40 वर्षे जवळून ओळखतो. ते दिनांक साप्ताहिकात काम करीत होते तेव्हापासूनचा हा परिचय आहे. त्यांचा महानगरचा सुवर्णकाळ आणि कर्जबाजारी होण्याचा काळ असे दोन्ही मी पाहिलेत. आय.बी.एन. लोकमत वाहिनी सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून मी त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम केला होता. त्यानंतर शेकडो वेळा त्यांच्यासोबत चर्चेत मी सहभागी झालोय. आमचे मित्र असणारे वागळे आणि वाहिनीचे संपादक असलेले वागळे या दोन संपुर्ण वेगळ्या व्यक्ती असत. नंतरनंतर आजचा सवालमध्ये सतत प्रचंड आरडाओरडा करणे, प्रसंगी दादागिरी करणे, संतापल्याचा उत्तम अभिनय करणे, समोरच्याला अनेकदा बोलूच न देणे असले पत्रकारीतेत न बसणारे हातखंडे ते वापरू लागले. स्वत:ची एक दहशत निर्माण करण्यावर त्यांचा भर राहिला. टी.आर.पी.साठी आपण काहीही तडजोडी केल्या नाहीत, मालकांचे दबाव कायम झुगारले असं वागळे लेखात सांगत असले नी त्यांच्यावरचे सारे आरोप ते नाकारीत असले तरी अनेकदा ते श्रेष्ठ तडजोडी करीत असत हे गुपित जवळच्यांना माहित आहे. शिवसेना, ठाकरे, राणे, भु्जबळ ह्यांचे आणि वागळेंचे अतिव "सलोख्याचे" संबंध राहिलेत हे सारा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्र स्वच्छ करण्याचं पेटंट एकहाती घेतलेल्या सनातनी छावणीतल्या एका बाईंना वागळे इतकं फुटेज देत की वागळे आता जरा दमानी घ्या असं म्हणायची पाळी आली होती. 
इतरांना कायम झोडपणारे, कस्पटासमान तुच्छ मानणारे वागळे सत्ताधारी जात संघटनांशी मात्र कसं नमून वागायचे, त्यांच्याशी जुळवून घ्यायचे त्याचे पुरावे देता येतील.
वागळे धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांना सामाजिक दृष्टी आहे. ते टीमकडून अनेक चांगले उपक्रम नी प्रसंगी उद्योगही यशस्वीपणे करून घ्यायचे. त्यांचा सवाल आणि ग्रेट भेट हे कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय होते. सामाजिक चळवळीतील लोकांना वागळेंचा आधार वाटतो.
पण या वागळ्यांच्या आवडी-नावडी कमालीच्या टोकदार प्रसंगी अतिरेकी असतात.
आयबीएनचे बस्तान उत्तम बसल्यानंतर वागळेंची देहबोली कमालीची बदलली. उग्र झाली. भाषा भडक नी अरेरावीची झाली. त्यांच्या वागण्यात बेदरकारपणा येत गेला. हे यश डोक्यात जाणे नव्हते काय? वागळेंना न आवडणारी दुसरी बाजू म्हणून काही असू शकते हेच ते नाकारू लागले होते. आपली खुर्ची त्यांना चढली, आपण म्हणजेच मिडीया, आपण म्हणजेच देश या अर्णवी वळणाकडे ते झुकू लागले. वागळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती काय?
अण्णा हजारे आणि वागळे ही उत्तुंग माणसं आहेत. पण त्यांना दोघांना ते एकटे सोडून बाकी सारे जग भ्रष्टच आहे याची खात्रीच वाटत असते.
वागळेंचे सल्लागार आणि प्रतिभावंत नाटककार विजय तेंडूलकर यांनी डॉ. य.दि.फडके, अरूण साधू व मी वसईला भाऊ पाध्ये यांना आम्ही भेटायला गेलेलो असताना वागळेंच्या स्वभावाचे नेमके आकलन मांडले होते. आज तेंडूलकर, फडके आणि साधू तिघेही आपल्यात नाहीत. अशावेळी ते त्यांचे खाजगीतले बोलणे इथे लिहिणे उचित होणार नाही.वागळेंच्या सवाल कार्यक्रमात प्रेक्षकांच्या एसेमेसची टक्केवारी सांगितली जात असे. टक्केवारीचा हा प्रकार म्हणजे एक निखळ विनोदी कार्यक्रम असे. वागळेंचे मत ज्या बाजूचे असेल त्याच मतांचे एसेमेस जास्त येत असत हा केवळ योगायोग असणार. नेमके किती एसेमेस आले ते मात्र कधीही सांगितले जात नसे. टक्केवारी फसवी असू शकते. अगम्य असू शकते. हेही प्रकरण ही बुवाबाजी होती की वस्तुस्थिती हे केवळ वागळेच जाणोत.
वागळ्यांच्या महानगर आणि आयबीएन लोकमतवर अनेक हिंसक हल्ले झाले, त्याचे पुढे काय झाले? त्याचा निकाल लागेपर्यंत वागळेंनी त्याचा पाठपुरावा केला काय? या हल्ल्यांचा खप वाढवण्यासाठी, टी.आर.पी.साठी, आपण किती लढाऊ पत्रकार आहोत ह्याची आक्रमकपणे जाहीरात करण्यासाठी उपयोग करून घेण्यात आला काय?
प्रश्न अनेक आहेत.
वागळेंचे हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. विशेषत: त्यांच्या पत्नीवरचा मीना कर्णिक यांच्यावरचा सुकून हा लेख जास्त महत्वाचा आहे. काही प्रमाणात आत्मपरीक्षण करणाराही आहे. सर्वांनी हे दोन्ही लेख अवश्य वाचावेत.
-प्रा. हरी नरके

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं?


आम्हाला शाळेत गोखलेसर गीता शिकवायचे.एकदा ते म्हणाले, मुलांनो सांगा, संजय उवाच नं सुरू होणारी गीता संजयानं आपलं प्रतिकूल मत देताच का संपली?
आम्हाला कोणालाच उत्तर देता आलं नाही.

सर म्हणाले, गीता कुठे संपते? संजय म्हणाला, "तर धृतराष्ट्रा, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ती बाजू [पांडवांची बाजू] जिंकणार असं माझं मत आहे."

मग काय झालं?

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर केलं.
" लेका, मीठ खातोस कौरवांचं नी विजय चिंततोस पांडवांना?"
त्याचा दुसरा भयंकर गुन्हा म्हणजे धृतराष्ट्रानं संजयाला ड्युटी काय सांगितली होती, तर तिकडे रणांगणावर काय चाललंय ते तेव्हढं सांगायचं. हा लेकाचा स्वत:ची मतं सांगायला लागला. तेव्हा गीता संपताना काय धडा शिकवते मुलांनो? आपण नोकरीत असताना, आपल्या मालकानं विचारलेलं नसताना, आपलं मत सांगू नये, अनाहुत सल्ला देऊ नये, खरं असलं तरी मालकाविरूद्ध बोलू नये! मात्र लगे हात उदात्तीकरण करीत राहावं."

गीतेच्या या शिकवणुकीचा फायदा आजचे सगळेच लोक्स अगदी कौरव पांडवही घेत असतात.

राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान मोलाचंच आहे. पण त्याचा दामदुप्पट परतावाही त्यांना जनतेनं एकहाती 50 वर्षे सत्ता देऊन केलेला आहे. मुद्दा एव्हढाच आहे की यशाचे मानकरी आपण असलात तर दुर्गतीचे अपश्रेयही तुम्हालाच घ्यावे लागेल ना? तुमच्या यांव केलं नी त्यांव केलं ह्या मार्केटिंगचा उबग आलाय. 80 टक्के समाजकारण नी 20% राजकारण हा तुमचा दावा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही 24 बाय 365 केलंत ते  फक्त 200 टक्के राजकारण. तुमची दुसरी बाजूही कळू द्या ना जनतेला!
नरूभाऊ दाभोळकरांची अमाणूस हत्त्या झाली. तुम्ही पुण्यावर लादलेला पोळ गुन्ह्याचा तपास करायचं सोडून प्लॅंचेट लावत बसला होता. सलग 15 वर्षे गृहखाते तुमच्या हातात असूनही गुन्हेगार तुम्ही शोधलेच नाहीत. परिणामी आणखी तीन हत्त्या झाल्या.

मालक, कोणाकोणाची जात सार्वजनिक व्यासपीठावर उद्धरतात, प्राचीन साहित्य नी संशोधन संस्था जाळणारांचं औरंगाबादच्या अ.भा.म.साहित्य संमेलनात जाहीर समर्थन करतात, एखाद्याचं इतिहासलेखन पटत नसेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्काराचे आपल्या चंपकांमार्फत वाभाडॆ काढतात, केव्हढी ही सहिष्णुता! केव्हढं हे निकोप अभिव्यक्तीचं प्रेम.

टिकाकार आणि विरोधकांकडे बघायची मालकांची दृष्टी इतकी व्यापक की अग्रलेख लिहिला म्हणून कुमार केतकरांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या जिवलग स्वपक्षीयांना ह्यांनी शब्दानं किरकोळ विरोध करीत पण कृतीनं मात्र पक्षात बढती दिली, यालाच म्हणतात लेखन स्वातंत्र्याबद्दलचा आदर!

एका शाळकरी मुलीनं एका नेत्याबद्दल फेसबुकवर काय लिहिलं तर यांच्याच राज्यात तिला ताबडतोब अटक करण्यात आली, तिच्या मदतीसाठी यांनी सेल काढला होता काय? ती स्वजातीय-स्वचाकरीतली असती तर विचार केलाही असता म्हणा.

एक संपुर्ण समाज दंगली घडवून जाळून किंवा कापून मारा असं पुस्तक लिहिणारांचे सत्कार हे मालक स्विकारतात आणि त्यांनीच आजवर खरा इतिहास महाराष्ट्राला शिकवला असा ताम्रपटही त्यांना  बहाल करतात, किती ही वैचारिक सहिष्णुता!

हजारो निरपराध्यांचं धार्मिक हत्त्याकांड करणारांना यांनी आपली सत्ता वापरून संरक्षण पुरवलं असा आरोप यांच्यावर अनेकदा झालाय. त्याची गुरूदक्षिणा ते खातायत.

यांची सेक्युलरनिष्ठा इतकी पक्की की निवडणुकीचे निकालही लागले नव्हते तर हे सच्च्या "सेक्युलरांना!" सत्तेसाठी पाठींबा देऊन मोकळे झाले.

अशा साक्षात दंतकथाच असलेल्या इतिहासपुरूषांचं जे उदात्तीकरण करणार नाहीत ते केवळ B/W चित्रण करणारेच म्हटले पाहिजेत. हाच आवाज आहे अवघ्या महाराष्ट्राचा!
- प्रा.हरी नरके

Wednesday, October 18, 2017

दारू नी जुगारात सगळं गेलं-


खोपोलीला एसटी बस चहाला थांबली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यात अमाप खड्डे असल्यानं बहुतेक पॅसेंजरांची हाडं एव्हाना खिळखिळी झालेली होती. ते 1991 मधले दिवाळीचे दिवस होते. थकलेले प्रवासी खाली उतरले. दिवाळीच्या सुट्ट्या चालू असल्यानं गाडीला बरीच गर्दी होती. चहा पिताना माझ्या लक्षात आलं, समोरचा एक माणूस पुन्हापुन्हा माझ्याकडे बघत होता. मलाही त्याचा चेहरा परिचयाचा वाटत होता. पण नाव काही आठवत नव्हतं. त्याच्या चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढलेले होते. डोक्यावरचे केस अनेक महिने कापलेले नसावेत. त्याला तेलही लावलेले नसणार. मळलेला पायजमा, अंगातला शर्ट बर्‍याच ठिकाणी फाटलेला. एकूण अवतार कळकट्ट होता. त्यानं माझ्याजवळ येऊन थेट विचारलं, " काय मग ओळखलं का मला? अरे हरी, मी अण्णा. मुंढव्याच्या शाळेत आपण एका वर्गात होतो." आणि मला त्याची ओळख पटली. हा अण्णा एका बागायतदार कुटुंबातला होता. श्रीमंत असामी. त्याचं आजचं हे दारिद्र्य आणि आजार्‍यासारखा दीनवाणा चेहरा बघून मला कळवळायला झालं.
त्याच्या पेरूच्या बागांमध्ये आम्ही शनिवारी दुपारी शाळा सुटली की जाऊन पोटभर पेरू खायचो. त्याच्या फुलांच्याही बागा होत्या. तेव्हा मोगरा, गुलाब, झेंडू, तेरडा, गुलछडी तोडायच्या कामावर त्याच्याकडे अनेक मजूर असायचे. मीसुद्धा एखाद्या रविवारी सकाळी त्याच्या शेतात जाऊन रोजानं मोगरा तोडायचो. अनेक मुलं, बायका तिकडं काम करीत असत. दररोज किमान  चारपाच पोती मोगरा नी ही फुलं टेंपो किंवा ट्रकनं पुण्याच्या मार्केटला पाठवली जायची. मला मोगर्‍याचा तो घणदाट सुगंध फार आवडायचा. टोपलीभर मोगरा तोडला की त्याचे वीस पैसे मिळायचे. एकेकाळचा हा लक्षाधीश मित्र आज वीसेक वर्षांनी भेटला तो अशा विपन्नावस्थेत.
आमच्या दोघांच्या चहाचे पैसे मी दिले आणि आम्ही दोघेही बसमध्ये येऊन बसलो. त्याला ही गरीबी कशी काय आली हे मला त्याला विचारायचं होतं. पण तो मलाच कायकाय विचारत होता. त्यात हा प्रश्न विचारायचं जमतच नव्हतं.
मध्ये थोडी सापट सापडताच मी त्याला विचारलं, इकडं कुठं गेला होतास?
तो म्हणाला, आजारी असल्यानं ट्रीटमेंटसाठी टाटा हास्पीटलला गेलो होतो. मी चरकलो. इतक्या तरूण वयात त्याला कॅन्सर झाला असणार. खुपच वाईट वाटलं. माझ्याशी बोलत असताना
तो सारखा एस.टी.च्या सामान ठेवलेल्या जागेकडे बघायचा. त्या सामानाकडे, विशेषत: एका फाटक्या पोत्याकडं तो अधूनमधून बघतोय हे माझ्या लक्षात आलं. त्या पोत्याला बराच चिखल लागलेला दिसत होता. बोचकं चांगलं मोठं होतं. त्यात कायय एव्हढं? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, माझे काही कपडे, औषधं आणि दिवाळीसाठी मुलांना घेतलेले फटाके नी थोडासा खाऊ आहे.
अण्णा, तुझी आर्थिक परिस्थिती तर चांगली होती रे, मग असं अचानक काय झालं?
तो, म्हणाला, काय विचारू नकोस. दारू नी जुगारात सगळं गेलं.
पुणे स्टेशनला एस.टी. पोचल्यावर आम्ही एसटीतनं उतरलो. त्यानं ते कळकट्ट बोचकं घेतलं नी तो मला हळू आवाजात म्हणाला, तू कुठं राहतोस. मी म्हटलं, कोथरूडला. तो म्हणाला मला खराडीला जायचंय. थोडं उलटं पडेल पण मी तुला सोडतो. मला काय कळेना, हा फाटका माणुस रिक्षानं जाणार आणि तेही मला कोथरूडला सोडुन त्याला परत पुणे स्टेशनला यावं लागणार. कारण नसताना रिक्षाचा खर्च वाढणार. मी म्हटलं, अरे नको. मला डायरेक्ट बस आहे. तू त्रास घेऊ नकोस अण्णा.
तू कसा जाणारेस? बसनं की रिक्षानं?
तो म्हणाला, पार्कींगमध्ये माझा ड्रायव्हर गाडी घेऊन आलेला असेल.
मी चकीत झालो. ड्रायव्हर, गाडी, मी ऎकतच राहिलो.
म्हटलं, लेका चेष्टा करतोस काय रे? तो म्हणाला, चल तुला गाडीत बसल्यावर सगळं खरं सांगतो.
त्याची टोयोटा घेऊन त्याचा ड्रायव्हर समोरच आला. आम्ही दोघं बसलो. ते पोतं अण्णानं जपून शेजारच्या सीटवर ठेवलं. मी म्हटलं, हे काय हिंदी सिनेमासारखं चाललंय तुझं?
तो म्हणाला, मी आजारीबिजारी काही नाहीये. दारूला मी शिवतही नाही नी जुगाराचा तर प्रश्नच नाही.
अरे, आपली सगळं फुलं आपण डायरेक्ट बॉम्बे मार्केटला पाठवतो. मी महिन्यातून एकदा वसुलीला जातो. टोटल कलेक्षन सातआठ लाखाचं अस्तंय. फाटके कपडे, वाढवलेली दाढी,केस, चिखलाचं पोतं हे बोचकं हे सारं नाटक करावं लागतंय बाबा. मागे एकदा टोयोटानं पैसे घेऊन येताना घाटात एका टोळीनं अडवून लुटलं. तेव्हापासून मी एसटीनंच मुंबईला जातोयेतो. पोत्यामुळं नी या फाटक्या मळक्या कपड्यांमुळं कोणालापण डाऊट येत नाही.
मला सांग, मी तुला हे सांगेपर्यंत तुला तरी डाऊट आला होता का? की अण्णा सात लाख रूपये या बोचक्यातून घेऊन चाललाय म्हणून?
मी म्हणलं, लगा पण माझी फिरकी घ्यायची काय गरज होती?
तो हसला नी म्हणला, बाबा, आजुबाजुचे पॅसेंजर ऎकत असतात आपलं बोलणं. फुगीरी लय म्हागात पडतीया. गरिबीनं राह्यलं की सेफ अस्तंय. येडा बनके पेढा खानेका. क्या? आणि त्यानं त्याच्या फाटक्या पायजम्याच्या खिशातनं पिस्तूल काढून माझ्या हातात दिलं. ते भलतंच वजनदार होतं.
-प्रा. हरी नरके

सांगण्यासारखं एव्हढंच आहे-

दिवाळी अंकाबद्दल -
"या दिवाळी अंकाचा कागद उत्तम आहे. छपाई मोहरेदार आहे. सजावट आणि इतर निर्मितीमुल्यं दर्जेदार आहेत. तसं या दिवाळी अंकाबद्दल सांगण्यासारखं एव्हढंच आहे." एका मोठ्या दैनिकाचे संपादक टेल्कोच्या कलासागर दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. गंमत म्हणजे त्यांनी मारलेला हा टोला लक्षात न आल्यानं आमच्या अधिकार्‍यांनी त्यावर जोरदार टाळ्या वाजवल्या.
टेल्कोच्या वतीनं दरवर्षी दिवाळी अंक काढला जायचा. त्याचा प्रकाशन सोहळा भपक्यात साजरा केला जायचा. मोठमोठ्या लेखक,संपादक, नेत्यांना प्रकाशन समारंभाला निमंत्रित केलं जायचं. आमचे काही उत्साही अधिकारी आणि कामगार यांच्या हौशी लेखनाचा त्या अंकात समावेश असायचा. पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला पु.ल. आलेले. नेहमीप्रमाणेच त्यांचं भाषण अप्रतिम झालं. या उपक्रमाचं कौतुक करून ते बोलले ते जे. आर.डी. टाटा, टाटा संस्कृती, लिलाताई आणि सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल. मी तेव्हा टेल्को होस्टेलमध्ये राहत होतो. पुलंनी आपल्या भाषणात स्वरूपाताई नी माझा अतिशय गौरवानं उल्लेख केलेला. त्यामुळे मॅनेजमेंटमधल्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा आमच्याकडे बघायचा दृष्टीकोन 180 कोनात बदलला.
हा अंक पहिलटकरणीच्या बाळंतपणासारख्या कौतुक सोहळ्यात तयार व्हायचा. एखादा चांगला लेख, दोनचार बरे आणि उरलेले कचरा असे साहित्य त्यात असायचे. त्याचं कारण संपादक चौकडीचं मुळात साहित्यभान शाळकरी होतं. एखादा बरा वाचक आणि उरलेले केवळ अधिकारी असल्यानं संपादक बनलेले असायचे. ते चतुर असल्यानं त्यांना आमची आठवण प्रकाशनाला मोठा लेखक,संपादक,अभिनेता बोलवतानाच यायची. बाकी आमच्यासारख्या इतरांना संपादकीय टिमचे दरवाजे कायम बंद असायचे.
आमचे एक एच.आर. मॅनेजर अतिशय चापलूस होते.त्यांची एक सवय होती. दरवेळी प्रस्तावना करताना ते एक किस्सा सांगायचे. म्हणजे ते प्रमुख पाहुण्यांना सांगायचे बघा, तुम्ही आमच्या कामगारात प्रचंड लोकप्रिय आहात. कालपरवाच एका कामगाराला तुमचं पुस्तक मशीनवर वाचताना सुपरवायझरनं पकडलं. एरवी आम्ही त्याला मेमो दिला असता पण तो तुमचं पुस्तक वाचतासल्यानं आम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही. प्रमुख वक्ते जाम खुष व्हायचे.
अर्थात दरवेळी चालून जाणारी ही खेळी एकदा त्यांना चांगलीच भोवली. माधव गडकर्‍यांना त्यांनी हा हातखंडा किस्सा सांगितल्यावर माधवराव म्हणाले, अरे वा, काय सांगताय? मला त्या कामगाराला भेटायचंय.
धावाधाव करून युनिफॉर्ममधला एक कामगार हजर केला गेला. माधवराव चहा घेताघेता त्याच्याशी अतिशय आपुलकीनं बोलले. कामगार, अधिकारी खुष झाले. माधवराव गाडीत बसले. नी माधवरावांनी त्याला जवळ बोलावलं. म्हणाले, आभारीए. या एकदा लोकसत्तेत. बाय द वे माझ्या त्या पुस्तकाचं नाव काय होतं?
कामगार गडबडला. तोवर तो पढवलेला कामगार माधव गडकर्‍यांच्या पुस्तकाचं नाव विसरून गेला होता. तो नेटानं म्हणाला, "एकच प्याला!" माधवराव हसले. म्हणाले, छानय. चालू द्या तुमचं! एकच प्यालाचे लेखक राम गणेश गडकरी 1920 ला स्वर्गात गेले बरं का!"
एकदा तर आणखीच गम्मत झाली. हा किस्सा कार्यक्रमात सांगून झाला. प्रमुख वक्ते काही खुष झालेले दिसले नाहीत. त्याचं कारण एच.आर. साहेबांना नंतर कळलं. वक्ते आपल्या  भाषणात म्हणाले, तुमचे कामगार माझं पुस्तक वाचतात म्हणजे थोरच असले पाहिजेत. फक्त बारीक अडचण एव्हढीच आहे की माझं एकही पुस्तक प्रसिद्ध झालेलं नाही."
टेल्कोत लिलाताई मुळगावकरांमुळे दर महिन्याला रक्तदान शिबीर व्हायचं. आमचे शेकडो कामगार दर चारसहा महिन्यांनी रक्तदान करायचे. पुल गंमतीनं लिलाताईंना रक्तपिपासू बाई म्हणायचे. लिलाताईंनी आमच्यात रक्तदान संस्कृती रूजवली.
माझ्याकडं नियमित रक्तदान केल्यानं पुण्यातल्या तिन्ही रक्तपेढ्यांची कार्डं होती. नात्यात, ओळखीत कोणालाही रक्ताची गरज पडली की आम्ही धावून जायचो.
एकदा माझ्या वहीनींचा फार मोठा अपघात झाला. खुप रक्त गेलं होतं. शिवाजीनगरच्या हर्डीकर हॉस्पीटलमध्ये त्यांना भरती केलेलं होतं. रक्त भरावं लागेल असं डॅाक्टरांनी सांगितलं. आमच्या नातेवाईकात तोवर रक्तदानाबद्दल प्रचंड भिती होती. मी म्हणलं, तुम्ही माझ्यावर सोडा. पण वहिनींच्या रक्तगटाचं दोन रक्तपेढ्यात शॉर्टेज होतं. के.ई.एम.वाले म्हणाले, रक्त मिळेल पण तुम्ही कार्ड असलं तरी रक्तदान करा नी ही बाटली घेऊन जा.
मी दिवसभर पहिली पाळी करून मग हडपसरवरून सायकलनं के.ई.एम.ला गेलो. रक्तदान केलं. त्यांनी दिलेला चहा प्यायलो पण घाई असल्यानं बिस्कीटं खिशात ठेवली नंतर खाऊ म्हणून. सायकल मारत हर्डीकरला पोचलो. सायकल लावताना थोडंसं गरगरल्यासारखं वाटायला लागलं. रक्ताची बाटली डॅाक्टरांच्या हातात देताना मी कोसळलो. मला तिथंच अ‍ॅडमिट करावं लागलं. शुद्धीवर आल्यावर मी डॅाक्टरांना विचारलं, ती रक्ताची बाटली माझ्या हातून पडून फुटली काहो? ते म्हणाले, " नाही. बाटली माझ्या हातात दिल्यावरच तू पडलास. काय झालं होतं? काही आजार आहे का? चक्कर का आली? तुझी शुद्धच गेली होती. जेवला नव्हतास का?"
मी सगळा प्रकार सांगितल्यावर ते म्हणाले, " रक्तदान केल्यावर असं सायकलींग करू नये बाबा. थोडक्यात वाचलास. दवाखाण्यात होतास म्हणून आम्ही इमर्जन्शी ट्रीटमेंट देऊ शकलो. रस्त्यात पडला असतास आणि मागून येणार्‍या एखाद्या वाहनाखाली......"
- प्रा. हरी नरके

प्रमोद मांडे- एक समर्पित संशोधक


टेल्कोच्या नोकरीतनं मला जी अतिशय अस्सल बावन्नकशी आणि अव्वल प्रतिभावंत माणसं मिळाली त्यात प्रमोदचं स्थान पहिलं होतं. प्रमोदचं जाणं माझ्यासाठी आरपार दु:खद आहे.
प्रमोद 24 तास 365 दिवस गडकिल्ल्यांमध्ये, आकाश दर्शनात आणि इतिहास संशोधनात रमलेला असायचा. आम्ही 21 वर्षे टेल्कोत एकत्र काढली. प्रमोद भीडभाड न ठेवणारा नी अतिशय स्पष्टवक्ता होता. कमालीचा मनस्वी. एखाद्याला स्विकारलं तर त्याच्यावर जीव ऒवाळून टाकायचा. चिडला तर मात्र मग खैर नाही. कोणतीही गोष्ट हात राखून करणं त्याला साफ नामंजूर होतं. आम्ही कंपनीत आठ तासाच्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकत्र गप्पा मारत असू. वाचन, गप्पा, अखंड भ्रमंती हे जगणे. जेवायला जातायेताना तर आम्ही हमखास बरोबर असू. आम्ही दोघेही मुळचे वेल्डर कम गॅस कटर. त्यामुळंच बहुधा इतिहास नी वर्तमान हा भविष्याशी जोडायचा छंद दोघांनाही होता. तो आधी सोमवारात 15 ऑगष्ट चौकात एका खोलीत राहायचा.मी खुपदा त्याच्या घरी जायचो.
प्रमोद पहिल्यांदा शिवसैनिक होता. त्याच्या अतिव आग्रहाखातर मी एकदा त्याच्याबरोबर दसर्‍याला शिवाजी पार्कवरच्या शिवसेनेच्या मेळाव्यातले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऎकायला सुद्धा गेलो होतो. छत्रपती शिवाजी राजे नी बाळासाहेब हे त्याचे विक पॉईंट.
तो अजमेरा कॉलनीत राहायला आला तेव्हा माझ्या अगदी शेजारच्याच इमारतीत राहायचा. तो नियमितपणे घरी सामना घ्यायचा. एकदा त्याच्या घरी गेलो असताना सामना दिसला नाही. मी म्हटलं कारे बंद केलास की काय सामना? म्हणाला,हो रे. दोन दोन पेपर परवडत नाहीत.
म्हटलं, दोन दोन कशाला घ्यायला हवेत?
तो म्हणला, अरे बाबा, आजकाल सामनातल्या बातम्या खर्‍या की खोट्या ते शोधायला दुसरा पेपर घ्यावा लागतो ना, त्यापेक्षा डायरेक्ट दुसराच घेतलेला काय वाईट?
प्रमोद तसा अतिशय फटकळ. शिवसेनेच्या गारूडातून लवकरच तो बाहेर पडला. शिवरायांच्या प्रेमात मात्र कायम आकंठ बुडालेला राहिला.
18 डिसेंबर 2016 ला त्याच्या वाढदिवसाला मी त्याच्या फेसबुकवर लिहिलं. त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला किती मनापासून आनंद झाला. तो त्यानं व्यक्तही केला. तो मला "माझा प्राचीन काळापासूनचा मित्र " असं म्हणायचा.
मी लिहिलं होतं, 
"प्रमोद मांडेसर,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
जीवेत शरद: शतम!
एक जबरदस्त उत्साही आणि समर्पित माणूस आहेत मांडेसर. लय भारी.
मी त्यांना गेली 38 वर्षे ओळखतो.
तुमच्या बरोबर टेल्कोत शेकडो वेळा मारलेल्या गप्पा आज आठवतात.
सर, तुमच्या स्कुटरवर मागे बसून म.सा.प. निवडणुकीत केलेला प्रचार,प्रवास आठवतो.
करपे वाडा, 15 ऑगष्ट चौक ते अजमेरा कॉलनी येथील त्यांच्या घरी झालेल्या असंख्य भेटी स्मरतात.
बालगंधर्व कला दालनातील त्यांची शहीदांवरील प्रदर्शनं, अभ्यासपुर्ण भाषणं, जोरकस युक्तीवाद यांचा मला लाभ झालाय.
माझ्या अनेक कार्यक्रमांना, भाषणांना आवर्जून उपस्थित राहून त्यांनी दिलेली दाद मला बळ देऊन गेलीय.
किल्ले, ट्रेकिंग, शिवराय, सह्याद्री, तारांगण आदींचे चालतेबोलते विद्यापिठ म्हणजे मांडे सर. त्यांचे लेखन संदर्भमुल्य असलेले भरिव लेखन आहे.
त्यांच्याबरोबर एका साध्याश: ट्रेकला मला यायचंय, अशी इच्छा मी व्यक्त केल्यावर त्यांनी मला ट्रेकला नेले. पावसाळा, अमावस्येची भीषण रात्र, सह्याद्री, जमीन निसरडी आणि माझा पहिला ट्रेक सरांसोबत. लिंगाणा!
केवळ अविस्मरणीय.
चालताना साधारणपणे अडीच हजार वेळा घसरून आपटलो.
पुढची सहा महिने दररोज रात्री झोपलो की लिंगाण्यावरून मी खाली दरीत पडतोय अशी स्वप्नं मला पडत होती.
माझा आयुष्यातला तो पहिला ट्रेक
आणि अर्थातच शेवटचा. [ गंमत सोडा ]
मित्रा, यशवंत झालास, किर्तीवंत झालास. आणखी मोठा हो.
असा मित्र मला मिळाला, ज्याचा मला अभिमान वाटतो."
तेव्हा माहित नव्हतं, हा गडी आपल्याला असं मध्येच सोडून जाणार आहे.
मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. माझा मतदारसंघ खुप मोठा होता. प्रमोद अनेकदा त्याची स्कूटर काढायचा आणि मग त्याच्यासोबत मी प्रचाराला जायचो. मतदारांना भेटून तो ह्याला मत द्यायचं बरं का असं आग्रहानं सांगायचा. त्याचे शेकडो फॅन्स होते. एक माजी खासदार त्याचे चाहते होते. ते पहिलवान होते. स्टार्चचं धोतर, टोपी, कोल्हापुरी चपला, गंधाचा टिळा असा जोरदार मामला. या प्रचारादरम्यान त्यांची अचानक भेट झाली. प्रमोदनं त्यांची माझी ओळख करून दिली. निवडणुक म्हणताच ते म्हणाले, " तुम्ही एक काम करा. मतदारांची मला एक लिस्ट द्या. आपुण त्यांना उचलून डायरेक्ट आमच्या साखर कारखाण्याच्या गेस्ट हाऊसवर नायतर एखाद्या रिसॉर्टवर नेऊन ठेऊ. नरकेसर, काय काळजी करायची नाय. मांडेसाहेबांचे तुम्ही मित्र म्हणल्यावर म्या समदं इलेक्शान हातात घेतो मायला. आपल्याला लई अनुबाव हाय."
प्रमोद म्हणाला, " नाय नाय, तुम्ही यात पडू नका. हे वेगळं प्रकरण आहे. अशानं मामला बिघडून जाईल सगळा." ते नाराज झाले. म्हणाले, " काय राव. परचेसिंग नाय, टेंडर नाय, बजेट नाय असल्या फुसक्या इलेक्षणला तुम्ही लोकांनी उभारलाच कशाला?"
तो माझ्या भाषणांना आवर्जून यायचा. शिवाजी मराठामधल्या एका भाषणात मी शिवरायांच्या काही पत्रांवर बोललो होतो. महाराजांच्या एका पत्रात त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला कसे खडसावले होते त्याचा महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे त्याची चर्चा केली होती.
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" असं महाराज सुनावतात हे संदर्भासहीत मी स्पष्ट केलं.
कार्यक्रम संपल्यावर प्रमोद मला म्हणाला, हरी, तू दिलेला संदर्भ बरोबर आहे. पण तुमच्याबाबतीत तुम्ही केवळ ब्राह्मण आहात म्हणून मी कसलीही सवलत देणार नाही, मुलाहिजा, पर्वा करणार नाही असं महाराज का म्हणतात? कारण त्याकाळात सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मण म्हणून विशेष वागणूक मिळत असणार असं तुला वाटत नाही का?"
त्याचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायचं. तो जातीपातीच्या भावनेला मूठमाती दिलेला फार मोठ्या जिंदादिल मनाचा माणूस होता. वक्ता नी इतिहासकार होता.
प्रमोदनं लिहिलेली सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत-
1. स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका,
2. गडकिल्ले महाराष्ट्राचे,
3. स्वातंत्र्य संग्रामातील समिधा,
4. स्वातंत्र्य संग्रामातील अंगार,
5. सह्याद्रीतील रत्न भांडार,
6. 111 क्रांतिकारकांचे संक्षिप्त जीवन.
प्रमोदचं वक्तृत्व अमोघ होतं. त्यानं हजारो भाषणं दिली.
अभ्यासकांची,ट्रेकर्सची, गडकिल्ले प्रेमींची पिढी घडवली. त्याला उत्तम स्मरणशक्ती लाभलेली होती. अर्थात सतत किल्ल्यांवर फिरण्यात आणि सह्याद्रीच्या भटकंतीत त्याच्या शरीराची खुप आबाळ झाली. तो बेदरकार असायचा. गडकिल्ले हाच श्वास होता.
माझी मुलगी प्रमिती लहान असताना एकदा प्रमोदसोबत सिंहगडावरील एका मोहिमेत सहभागी झाली होती. प्रमोदनं दाखवलेला किल्ला, रात्री घडवलेलं तारांगण दर्शन, त्याचं चित्रशैलीतलं इतिहास कथन यानं ती इतकी भारावून गेली की तिला त्या कार्यक्रमाच्या आठवणी एव्हढी वर्षे उलटून गेली तरी आजही लख्ख आहेत.
प्रमोद, लगा, तू फार मोठ्या ट्रेकला एकटाच पुढं निघून गेलास हे काय तू बरोबर केलेलं नाय गड्या! हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाय!
- प्रा.हरी नरके

Sunday, October 15, 2017

चांदोबा

शाळेशेजारच्या कटींग सलूनमध्ये सकाळ,प्रभात,केसरी ही वर्तमानपत्रं यायची. पहिली दुसरीत असताना मी मोठ्यानं वाचायचो. ते काका स्वत: निरक्षर होते, पण गिर्‍हाईकांसाठी ते पेपर घ्यायचे.मी मोठ्यानं वाचत असल्यानं त्यांनाही बातम्या समजायच्या.एखाद्या दिवशी मी गेलो नाही तर ते चौकशी करायचे. एकदा ते म्हणाले, असं करू, तू दररोज येऊन दुपारच्या सुट्टीत मला पेपर वाचून दाखवायचा त्याच्या बदल्यात मी तु्झ्या कटींगचे पैसे घेणार नाही. हे अगदी भारी जमलं. कटींगच्या वाचलेल्या पैशातून मी चांदोबा घ्यायचो. एका रद्दीच्या दुकानात जुने चांदोबा वजनावर मिळायचे. तिथे काही जुनी पुस्तकंही मिळायची.राजपुत्र ठकसेन, हिमपरी आणि सात बुटके, शेपटीचा शाप, विक्रम आणि वेताळ असली तेव्हा विकत घेतलेली पुस्तकं छान कव्हर घालून त्यावर नाव, सही करून ठेवलेली. दीपावलीचा पहिला दिवाळी अंक तिथेच मी विकत घेतला. आजही तो जपून ठेवलेला आहे. ग्रंथालयांना पुस्तकदुकानात सवलत मिळते म्हणून चौथीत असताना मी घरातल्या ग्रंथसंग्रहाला अभिनव ग्रंथालय असं नाव दिलं. त्याचा एक रबरी शिक्का बनवून घेतला. त्यातून खरेदी केलेला पहिला समग्र लेखक म्हणजे राम गणेश गडकरी. नारायण पेठेतल्या रम्यकथा प्रकाशनाच्या मेहेंदळेंनी तेव्हा आगावू नोंदणी केल्यास हा संच निम्म्या किंमतीत दिला होता.
तर हा गडकरी संच खरेदी करायचा म्हणून नेहमीच्या दोन नोकर्‍यांव्यतिरिक्त जादा काम काय करता येईल याचा शोध चालू होता. आजुबाजूच्या शेतांच्या बांधावर मस्त गवत वाढलेलं असायचं. एकदा माझी मावशी आमच्याकडं आलेली असताना तिला म्हणलं, येतेस का आपण गवताचे भारे कापून नेऊन बाजारात विकूया. भरपूर कमाई होईल.ती आली. तिचा भारा मोठा असल्यानं त्याचे बारा आणे आले. माझा अगदीच लिंबूटिंबू असल्यानं चार आणे आले. आता हे पैसे साठवायचे आणि नारायण पेठेत जाऊन गडकरी समग्र संच घ्यायचा. घरी गाडग्या मडक्यांची उतरंड असायची.त्यात कडधान्यं आणि इतर कायकाय ठेवलेलं असायचं. मी त्यातल्या मधल्या गाडग्यात पैसे साठवायचो.
तर घरी आल्यावर आईला मोठ्या कौतुकानं सांगितलं, गवताचे पैसे आल्याचं. तिला गडकरी कोण हे काय माहित नव्हतं,पण पुस्तकं लिहितो म्हणजे असेल कोणीतरी मोठा माणूस. तिला ते चार आण्याचं नाणं दाखवावं म्हणून चड्डीच्या दोन्ही खिशात शोधलं. शर्टाचा खिसा उलटा करून बघितला. चार आणे काही सापडेनात.मला खूप रडू यायला लागलं. मावशी म्हणाली, जाऊ दे,रडू नकोस. हे माझ्याकडचे घे. पण मला माझ्याच कमाईचे चार आणे हवे होते. मी परतपरत शोधत राहिलो.
परत पैसे हरवल्याचा प्रचंड संताप आला.विनोदी प्रकार म्हणजे, चार आणे ते काय पण मी त्यासाठी वेडापिसा होऊन घराच्या भिंतीवर स्वत:चं डोकं आपटलं. चांगलंच टेंगूळ आलं. पण एक फायदा झाला. डोकं आपटतच डोक्यावरची टोपी खाली पडली आणि चार आण्याचं नाणं खानकन आवाज करीत टोपीतून बाहेर आलं.
सापडले, सापडले, माझे चार आणे सापडले, म्हणून किती उड्या मारल्या असतील त्याची गणतीच नाही.
पहिलीत असताना बालभारतीचं पुस्तक नव्वद पैशांना मिळायचं.आईनं एक रूपया दिला होता. उरलेले 10 पैसे जपून आण म्हणुन बजावलं होतं.
मी ते 10 पैसे खुप जपून ठेवले होते.
शेवटचा तास खेळाचा होता. शाळेच्या वाळूच्या ढिगावर आम्ही पोरांनी एव्हढ्या उड्या मारल्या, कायकाय खेळ केले की तास संपल्यावर लक्षात आलं आपले 10 पैसे गायब झालेत. वाळूत खुप शोधलं, पण उपयोग झाला नाही. त्यादिवशी खुप रडलो. आईनंही खुप मारलं.
पैसे हरवल्याची आठवण कायम राहावी यासाठी स्वत:ला शिक्षा करायची म्हणून खेळात माझं मन रमेनासं झालं.
तिथून पुढं इतर मुलं खेळत असायची तेव्हा मी वाचत बसायचो. 1969 साली त्या दिवशी खेळणं जे बंद झालं ते कायमचं. त्यानंतर मी कधीही कसलाही खेळ खेळलो नाही. मला कोणताही खेळ येत नाही. अगदी गोट्या, विटीदांडू, लंगडी, कबड्डी, खोखो, क्रिकेट कोणताही नाही.
-प्रा.हरी नरके