Tuesday, December 13, 2016

वर्गातले विद्यार्थी मला बोलूच देत नाहीत

विद्यापिठातले एक सहकारी प्राध्यापक भेटले. म्हटलं, "सर, बर्‍याच दिवसात आला नाहीत विभागात?"
म्हणाले, "कसा येणार? माझ्या वर्गातले विद्यार्थी मला बोलूच देत नाहीत!" 

"काय सांगता काय? पण तुम्ही विभागात आले तर प्रश्न येईल ना बोलू देण्या ना देण्याचा?"

" कुलगुरू तर तुमचेच पाहुणे आहेत ना? त्यांच्याकडे का नाही तक्रार करीत? शिवाय तुम्हीच विभागप्रमुख आहात. तुमचे सगळे सहकारीही तुमच्याच बाजुचे आहेत. मग अडचण काय आहे?"

"असं बघा, ही सगळी नापास पोरं आहेत. ती मला शिकवूच देत नाहीत. म्हणून मी विद्यापिठात येतच नाही. सरळ घराजवळच्या बालवाडीत जाऊन शिकवतो."

"सर, पण तुम्हाला पगार विद्यापिठ देतं की बालवाडीवाले? तुमची निवड बालवाडीसाठी करण्यात आलीय का विद्यापिठासाठी?"

त्यावर सर फक्त मधाळ हसले.

मी म्हटलं, "सर मग टारगट पोरांना रस्टीकेट का करीत नाही?"

सर म्हणाले, "त्यासाठीच तर पुर्वतयारी करतोय. आधी ही पोरं नापास आहेत, ती मला शिकवूच देत नाहीत, म्हणून तर मी विद्यापिठात येत नाही, बालवाडीत जातो, वातावरणनिर्मिती नको व्हायला?"
..........................................................................
[गुजराती बृहदकथा, खंड, 1 ला, कथा तिसरी, अहमदाबाद, 2016, पृ.क्र.12345 ]

No comments:

Post a Comment