Tuesday, January 26, 2016

पिफ - मानवी भावभावनांचे श्रेष्ठ दर्शन --2.



1. Immortal, Iran, Hadi Mohaghegh -
 गेल्या वर्षात जगभरात तयार करण्यात आलेल्या बहुतेक सर्व दर्जेदार चित्रपटांमधून मानवी भावभावनांचे सखोल दर्शन पाहायला मिळाले.
’सुख जवापाडे, दु:ख पर्वताएव्हढे” असे संत तुकाराम सांगून गेलेत. जगणे म्हणजे अपार दु:खाचा प्रवास असतो असे सांगणारा Iran चा Hadi Mohaghegh यांचा Immortal हा चित्रपट अगदी थेट होता. चित्रपटाची सुरूवात होते ती, डोंगराची तीव्र चढण असलेला कठीण रस्ता आणि त्यावरून बंद पडलेली मोटर सायकल ढकलत चाललेला नायक इब्राहिम, यादृश्याने. त्याचे आजोबा अयाझ अपराधभावाने ग्रस्त आहेत. ते बस चालक आहेत. त्यांच्या हातून नातेवाईकांच्या लग्नाहून परतताना झालेल्या अपघातात कुटुंबातील सगळे लोक ठार झालेत. ही बोच इतकी जबरदस्त आहे की अयाझची जगण्याची इच्छाच मेलीय. सगळी कार्यप्रेरणा नष्ट झाल्याने तो पुन्हापुन्हा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इब्राहिम झटतोय. दरम्यान अयाझला झालेला पायाचा आजार, त्याच्या अपार वेदना यांच्या खिळऊन टाकणार्‍या थेट चित्रणाने हा चित्रपट अंगावर येतो.

2. Enclave, Serbia, Gorana Radovanovica -
ताजा विषय. अप्रतिम मांडणी, नेत्रदिपक छायाचित्रण, गोळीबंद पटकथा, तगडा अभिनय आणि कलात्मक दिग्दर्शन यांचा श्रेष्ठ अविष्कार म्हणजे Enclave हा चित्रपट होय.
सर्बियामधील कोसोवातील मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील वैर सर्वदूर परिचित आहे. पहाडी मुलखात, सैन्याच्या निगराणीखाली राहणारे एक ख्रिश्चन कुटुंब असते.शेती करणारे वडील आणि मरनासन्न अवस्थेत असलेले आजोबा. त्यातला दहा वर्षाचा लहान मुलगा नेनाद हा शाळेत शिकतोय. मिलीट्रीच्या संरक्षणात त्यांच्या वाहनातून दररोज त्याला शाळेत यावेजावे लागते. वर्गात तो एकटाच शिकतोय. त्याच्या वर्गशिक्षिकेला अचानक गाव सोडावे लागते. आजोबांचा मृत्य़ू झालाय. त्यांच्या अंत्यविधीसाठी धर्मगुरूंना बोलवायला गेलेला नेनाद त्याचे काही मुस्लीम मित्र आणि विरोधक यांच्या कच्याटात सापडतो. त्यातून उद्भवलेल्या संकटात त्याचा जीव धोक्यात सापडतो. इकडे वडीलांना स्वसंरक्षणार्थ बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून पोलीस पकडतात. नेनादची आत्या तिच्या मुलीसह तिच्या वडीलांना भेटायला आलीये. वडीलांचे प्रेत बघून ती अंत्यविधीसाठी जिवाच्या कराराने धडपडतेय. इकडे मुस्लीम मुलाने भितीपोटी  घरच्यांना खोटे सांगितल्याने मुस्लीम समुदाय सूडाने पेटून ख्रिश्चन स्मशान उद्ध्वस्त करून टाकतो. त्या जाळपोळीत नेनादचा जीव आणखीन धोक्यात येतो. श्वास रोखून धरायला लावणारी कथा अनेक वळणे घेत पुढे सरकते. शेवटी नेनाद वाचतो की मरतो? त्याच्या आजोबांचा दफनविधी होतो की नाही? धार्मिक शत्रुत्व, नैसर्गिक मैत्री आणि कोवळी माणुसकी यांच्या संघर्शातून अखेर काय जिंकते? काळजाची पकड घेणारी महान कथा. मनाचा कोपरा कायमचा व्यापून टाकणारी एक श्रेष्ठ निर्मिती.

3. Absolution, Finland, Petri Kotwica -
मुळात सज्जन असलेली माणसे जेव्हा नैतिक पेचात सापडतात तेव्हा त्यांचे वर्तन कसे असते याची विलक्षण कहाणी म्हणजे हा जागतिक दर्जाचा श्रेष्ठ चित्रपट होय.
अस्सल कथा, नैसर्गिक अभिनय, महान सादरीकरण आणि नितांतसुंदर दिग्दर्शन यातून किती थोर कलाकृती जन्माला येते त्याचा वस्तुपाठ म्हणजे फिनलंडचा Petri Kotwica यांचा
Absolution हा चित्रपट होय.
किया ही 34 आठवड्यांची गरोदर महिला रात्रीच्या घनघोर अंधारात कार चालवताना तिला अचानक कळा सुरू होतात. तिला जीवघेणी कळ येते आणि तिच्या कारची धडक कशाला तरी बसते. ती तिच्या धर्मगुरू असलेल्या पतीला, लौरीला कोण जखमी झाले ते बघून यायला सांगते. त्याच्या पत्नीचा आधीच्या वेळी तीन वर्षांपुर्वी अकाली गर्भपात झालेला असल्याने पत्नीला अतितात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी तो बहुधा तिच्याशी खोटे बोलतो. कोणी माणूस जखमी झालेला नसून ते बहुधा हरीण असावे असे तो तिला सांगतो. दवाखान्यात पोचल्यावर किया एका गोंडस बाळाला जन्म देते. दवाखान्यातून घरी येताना तिची हनाशी भेट होते. हनाचा नवरा अपघातात जखमी होऊन कोमात गेलेला असतो. कियाच्या लक्षात येते की बहुधा तिनेच धडक दिल्याने हनाचा नवरा जखमी झालेला असावा. ती हनाला परोपरीने मदत करायचा प्रयत्न करते. हना तिला देवदूत समजत असते. पोलीस तपासातून हनाच्या हे लक्षात येतेकी कियाच्या नवर्‍याने धडक दिल्यानेच तिचा नवरा आज मरणासन्न अवस्थेत आहे. खूप प्रयत्न करूनही तिचा नवरा वाचत नाही. पुढे थंड डोक्याने ती कट रचते आणि कियाच्या नवर्‍याचा  लौरीचा सूड घेते का? कसा?  किया मात्र अतिशय धीरोदात्तपणे या सार्‍या संकटाला कशी सामोरी जाते? अपार करूणा, अपराधभाव, सत्याची चाड, नैसर्गिक पेच आणि दुसरीकडे सूडबुद्धीची कठोर कृती यातून रंगणारे विलक्षण मनोहारी नाट्य यांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट अतिशय श्रेष्ठ चित्रपट होय.
क्रमश:
...............

Monday, January 25, 2016

दर्जेदार जागतिक चित्रपटांची मेजवानी PIFF,



Pune International Film Festival, 14-21 Jan. 2016 (PIFF)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 14-21 जाने. 2016
Pune Film Foundation आणि Government of Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या PIFF मध्ये यावर्षी
104 देशांतून आलेल्या 986 चित्रपटांमधून निवडलेले जागतिक वैशिष्ट्ये असलेले 14 चित्रपट जागतिक स्पर्धा विभागात दाखवण्यात आले. या आठ दिवसात याशिवाय आणखीही सुमारे
280 चित्रपटांचे 350 शो आयोजित करण्यात आले.
 City Pride Kothrud,3 थिएटर्स, City Pride Satara road, 2 थिएटर्स, City Pride RDeccan, Mangala multiplex,2 थिएटर्स, INOX Camp, 2 थिएटर्स, National Films Archives of India (Law college road), अशा अकरा थिएटर्समधून हे 350 शो दाखवण्यात आले. सुमारे दहा हजार रसिकांनी PIFF चा आनंद घेतला. या अकरा ठिकाणी एकावेळी
2902 आसनांची व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी पायर्‍यांवर खाली बसून चित्रपट पाहिले. प्रत्येकाने सरासरी 25 ते 30 चित्रपट पाहिल्याचे लक्षात घेता सुमारे 2 लाख 50 हजार प्रेक्षकांनी हा महोत्सव अनुभवला असेही म्हणता येईल.
यावर्षी जागतिक स्पर्धा विभागातील प्रथम पुरस्कार इराणच्या Immortal ने पटकावला. हा चित्रपट Hadi Mohaghegh यांनी दिग्दर्शित केला होता.
खरं तर याच तोडीचे बरेच चित्रपट या महोत्सवात होते.
 उद्घाटनात दाखवण्यात आलेला मेक्शिकोच्या [ Mexico] केल्सो आर. गार्सिया [Celso R. Garsia] दिग्दर्शित "दि थीन यलो लाईन " [The Thin  Yellow Line ] हा चित्रपट नितांतसुंदर होता.
** Immortal, Iran, Hadi Mohaghegh
1. Enclave, Serbia, Gorana Radovanovica,
2. Absolution, Finland, Petri Kotwica,
3. Dearest, China, Peter Ho-Sun Chan,
4. Don't Tell Me The Boy Was Mad, France, Robert Guediguian,
5. Perfect Obedience, Mexico, Luis Urquiza,
6. Money Buddies, Italy, Daniel Cipri,
7. Thithi, USA, Ram Reddy हा भारतीय तरूण दिग्दर्शकाने केलेला कन्नड चित्रपट,
हे आठही चित्रपट अतिशय दर्जेदार होते. पुरस्कारासाठी एकाची निवड करताना परिक्षकांचा फार कस लागला असणार.
जागतिक स्पर्धा विभागातील ---
1. Picadero,Spain, Ben Sharrock,
2. Bopem, Kazakhstan,Zhannalssab ayeva,
हे चित्रपटही उल्लेखनीय होते.
Global Cinema या विभागात दाखवण्यात आलेले पुढील चित्रपट अव्वल दर्ज्याचे होते.
1.Taxi, Iran, Jafar Panahi,
2. Embrace of the Serpent, Colombia,Ciro Guerra,
3. My Mother, France, Nanni Moretti,
4. Theeb, UAE, Naji  Abu Nowar,
5. Journey to Rome, Poland, Tomasz Mielnik,
6. Sivas, Turkey, Kaan Mujdeci,
7.Mountains May Depart, China, Jiazhangke,
8. Risk of Acid Rain, Iran, Behtash Sanaeeha,
आणखीही काही उत्तम चित्रपटांची नोंद घेणे गरजेचे आहे.
क्रमश:
.............................

Thursday, January 21, 2016

Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke

http://www.dnaindia.com/mumbai/report-morally-improper-to-call-rajaram-s-descendants-as-mahatma-phule-s-prof-hari-narke-2167460
DNA,Online, 21 Jan.2016
Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3.
Researcher on Mahatma Phule's life and works prof Hari Narke has said it is not morally proper to project the Rajaram Phule's descendants as those of Mahatma Phule as the latter gave importance to ideological inclination than biological lineage. Narke pointed out that Mahatma Phule himself had disowned his elder brother Rajaram by registering his will.
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3. Narke said the report headline said three members of the Phule family, who are descendants of Mahatma Phule, had attended the event, which is far from reality as, Narke said, they are in no way descendants of Mahatma Phule.
He added that Mahatma Phule and his wife Savitribai had adopted the son of a Brahmin widow, who went on to become a doctor. While adopting the boy, Phule had put the condition that if the boy did not adhere to Satyashodhak Samaj principles, his wife should look for another one to adopt, Narke said, reiterating the fact that Mahatma Phule gave importance to ideological inclination rather than biological lineage.
The professor also said that Mahatma Phule's will had clearly mentioned that neither his elder brother Rajaram nor his son Ganpat could have any share in his property. "So when Mahatma Phule himself had disowned his brother, how can his brother's descendants claim to be Mahatma Phule's?" he asked.
................
Morally Improper To Call Rajaram's Descendants As Mahatma Phule's: Prof Hari Narke...
.............



Monday, January 18, 2016

RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच



http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11284626
ऑनलाइन लोकमत, सोमवार, दि.18 जानेवारी, 2016.First Published: 18-January-2016 : 13:25:00
Last Updated at: 18-January-2016 : 13:54:11
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.
..................

Tuesday, January 12, 2016

ते फुल्यांचे वारस नव्हेत!....







1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डाक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डा.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. . जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.