Thursday, November 27, 2014

जोतीराव - विनम्र अभिवादन...

२८ नोव्हेंबर २०१४
महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन.

आज त्यांना आपल्यातून जाऊन १२४ वर्षे पूर्ण झाली नी १२५ वे वर्ष लागले. शतकोत्तर रौप्य वर्ष....
हा माणूस काळाच्या एव्हढा पुढे होता की एव्हढी वर्षे झाली तरी त्यांचे विचार कालबाह्य झाले नाहीत, आजही प्रस्तुत आहेत ते.
आयुष्य त्यांचे समर्पित होते, ज्ञानार्जन नी ज्ञाननिर्मिती व ज्ञानप्रसाराला...
हा माणूस झुंजला सार्‍यासार्‍या शोषित वंचितांसाठी....
सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना हे त्यांचे मिशन होते.
स्त्री-पुरूष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह या पंचसुत्रीतला कोणताही कार्यक्रम  बाद झाला नाही,
जसजसा काळ जातोय तसतसा हा माणूस अधिकाधिक समकालीन बनतोय.
विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment