Tuesday, September 16, 2014

महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची यादी






लंडन मध्ये मी ब्रिटीश म्युझियम लायब्ररी या ग्रंथालयात बसून अभ्यास करीत असे. यु.के. {युनायटेड किंगडम} या देशात गेल्या दोन हजार वर्षात विविध क्षेत्रात होऊन गेलेल्या नामवंत लोकांचा कोश त्यांनी प्रकाशित केलेला आहे. {ओ‘क्सफर्ड डिक्शनरी   ओ‘फ नेशनल बायोग्राफी} शेती, व्यापार, उद्योग, साहित्य, शिक्षण, संगित, कला, राजकारण, समाजसेवा, विज्ञान, संशोधन आदी महत्वपूर्ण क्षेत्रात समाजाची उंची आणि श्रीमंती वाढवणार्‍या कर्तबगार लोकांची  माहिती या कोशात दिलेली आहे. या कोशाचे एकुण साठ खंड असून त्यात एक लाख वीस हजार कर्तबगार लोकांची माहिती दिलेली आहे.
असाच एक प्रयत्न आपल्याकडे बरोबर १०० वर्षांपुर्वी इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केला होता. त्यांचा हा लेख लोकशिक्षण या मासिकाच्या {भाद्रपद शके १८३५ च्या } अंकात प्रकाशित झाला होता.
राजवाड्यांनी "महाराष्ट्रातील कर्त्या लोकांची मोजदाद" करताना विशेष प्रसिद्ध असलेल्या, बुद्धीमान आणि कर्तबगार लोकांचा परिश्रमपुर्वक धांडोळा घेऊन १५० लोकांची यादी केली होती. प्रामुख्याने समाजासाठी वाहून घेतलेल्या, काळावर आपली मोहर उमटवणार्‍या  द्रष्ट्या, बुद्धीमान आणि कर्तबगार लोकांचा समावेश राजवाडे या यादीत करतात.
शतकापुर्वी आपल्याकडे प्रसिध्द असणार्‍या लोकांमध्ये संस्थानिक, शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य चळवळीतील नेते, समाज सुधारक, संपादक, लेखक, इतिहासकार, वैद्य, वक्ते, उद्योजक, मुर्तीकार, व्यापारी, गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, अबिनेते, गायक, वकील, ज्योतिष विद्देतील जाणकार, शिक्षणतज्ञ अशा नानाविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे.
यात एकूणच महिला खूप कमी आहेत. रमाबाई रानडे, डा.आनंदीबाई जोशी, पार्वतीबाई आठवले, बायजाबाई शिंदे, जमनाबाई गायकवाड,  एव्हढीच नावे त्यात आहेत. यात सावित्रीबाई फुले, पंडीता रमाबाई, ताराबाई शिंदे, तान्हुबाई बिर्जे, सावित्रीबाई रोडे आदी नावे असायला पाहिजे होती.
महर्षी वि.रा.शिंदे, गंगाराम भाऊ म्हस्के यांच्यासोबत या यादीत सयाजीराव गायकवाड, तुकोजीराव होळकर, जयाजीराव  शिंदे, आणि इतर अनेक संस्थानिकांना आवर्जून स्थान देण्यात आलेले आहे. {मात्र या यादीत छ.शाहू महाराज नाहीत.}
महर्षी कर्वे, न्या. म.गो.रानडे,सार्वजनिक काका, पैसाफंड काळे,  नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ हरी देशमुख, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, राजारामशास्त्री भागवत, गोपाळ कृष्ण देवधर, आदी सामाजिक सुधारक आणि सामाजिक विचारवंतांची या यादीत नोंद आहे. {या यादीत महात्मा फुले, वस्ताद लहुजी साळवे आदींना मात्र स्थान दिलेले नाही.}
या कर्तबगार लोकांमध्ये प्रामुख्याने अग्रस्थानी आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले.
नामवंत साहित्यिक आणि इतिहासकार म्हणून हरी नारायण आपटे, न.चिं. केळकर, कृ.प्र.खाडीलकर, शि.म.परांजपे, वि.गो.विजापूरकर, विनायक कोंडदेव ओक, म.मो.कुंटे, चिंतामणराव वैद्य, मोरो केशव दामले, म.शि.गोळे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, का.त्र्यं. तेलंग, वासुदेवशास्त्री खरे, द.ब.पारसनिस, भाऊ दाजी लाड, का.ना. साने, अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंदराव देवल, ल.रा.पांगारकर, शं.श्री.देव, रघुनाथशास्त्री गोडबोले, गो.स.सरदेसाई, शं. तु. शाळीग्राम, का.र. मित्र, आदींचा नामोल्लेख करण्यात आलेला आहे.
याशिवाय या यादीत अक्कलकोटकर स्वामी, नृसिंह सरस्वती, नारायण महाराज केडगावकर, अशा काही साधूंचाही समावेश आहे.
बालगंधर्व, गणपतराव जोशी, गोपाळराव दात्ये, भाऊराव कोल्हटकर, वि.दि.पलुस्कर, आदी कला क्षेत्रातील नामवंतांनाही उचित स्थान देण्यात आलेले आहे.
गणिततज्ञ रे‘न्गलर र.पु.परांजपे, केरो लक्ष्मण छत्रे, दि.आ.दळवी, नेते नाना शंकरशेठ, व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर, अशा विविध प्रतिभावंतांना आवर्जून जागा देण्यात आलेली आहे.
हि यादी अतिशय परिश्रमपुर्वक बनवण्यात आलेली आहे. त्या काळातील प्रसिद्धीचा झोत कोणावर होता हे कळायला यातून मदत होते. त्याकाळात फारसे प्रसिद्ध नसलेले किंवा उपेक्षित असलेले पण नंतर काळाच्या ओघात पुढे आलेले लोक समजून घ्यायला ही यादी उपयोगी पडते.
राजवाड्यांनी एकुण २३ शास्त्रांची यादी देऊन त्यातल्या १९ मध्ये समावेश करावा असा एकही माणूस महाराष्ट्रात असू नये या बद्दल खंत व्यक्त केलेली आहे.
कोणत्याही समाजाची उंची त्यातल्या प्रतिभावंतांवरून मोजायची असेल तर आपला समाज कोठे पुढे नी कोठे मागे होता हे समजून घ्यायला ही यादी मदत करते.

ही यादी फक्त इ.स.१८१५ ते १९१४ या शंभरच वर्षांची असल्याने त्यात त्या आधीची छ.शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर अशी नावे नाहीत. आणि नंतरचे डो‘.बाबासाहेब आंबेडकरही त्यात नाहीत.

राजवाड्यांच्या व्यक्तीगत आवडीनिवडी अतिशय सशक्त होत्या. त्यामुळे ते फुले, शाहू,सावित्रीबाई, पं.रमाबाई आदींना या यादीत जागा देत नाहीत हा मोठा दोष सोडला तर ही यादी खरोखरच शतकानंतरही मार्गदर्शक आहे.

आजच्या काळातील { इ.स.१९१५ ते २०१४ } यादी करायची झाली तर तुम्ही त्यात कोणती नावे समाविष्ट कराल?

{संदर्भासाठी पाहा : राजवाडे लेखसंग्रह भाग ३, संपादक- शं.ना.जोशी, भारत इतिहास संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला क्र.१४,चित्रशाळा प्रकाशन,पुणे , १९३५,किंमत २रूपये. }
.....................................................................
भाग २--- प्रा. हरी नरके

१९१५ ते २०१४ या शंभर वर्षातील सुप्रसिद्ध, कर्तबगार, प्रतिभावंत आणि बुद्धीमान महाराष्ट्रीयन लोकांमध्ये माझ्यामते पुढील व्यक्ती असतील... नमुन्यादाखल ही काही नावे ... कृपया ही यादी आणखी वाढवावी....
राजकारण : डो‘. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण, एस.ए.डांगे, एसेम जोशी, दादासाहेब गायकवाड, वसंतराव नाईक, स्वामी रामानंद तीर्थ, मा.स. गोळवलकर, बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे,
साहित्य: केशवसुत, लक्ष्मीबाई टिळक, अण्णाभाऊ साठे, नरहर कुरूंदकर, बहिणाबाई चौधरी, मालती बेडेकर, साने गुरूजी, आचार्य अत्रे, वि.स.खांडॆकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, जी.ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,
चित्रपट: दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, देवानंद, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, मधुबाला, गुरूदत्त, दिलीप कुमार, निळू फुले, स्मिता पाटील, अमिताभ बच्चन, अमिर खान,
संगित : किशोर कुमार, महमद रफी, भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोरी अमोणकर, आशा भोसले,
अर्थ : धनंजयराव गाडगीळ, वैकुंठलाल मेहता,
सहकार : विठ्ठलराव विखे, रावबहादूर नारायणराव बोरावके,
शिक्षण : कर्मवीर भाऊराव पाटील, बाबूराव घोलप,
उद्योग : जमशेदजी टाटा, जे.आर.डी.टाटा, शंतनूराव किर्लोस्कर, धीरूभाई अंबानी, रतन टाटा,
संशोधन : पांडुरंग वामन काणे, रा.ना.दांडेकर,
प्रबोधन : संत गाडगे बाबा, गोदावरी परूळेकर, हमीद दलवाई, नरेंद्र दाभोळकर,
विज्ञान : होमी भाभा, वसंतराव गोवारीकर, जयंत नारळीकर, विजय भटकर, रघुनाथराव माशेलकर,
क्रिडा : खाशाबा जाधव, सुनिल गावसकर, सचिन,
सामाजिक : विनोबा भावे, बाबा आमटे,
................................................

मी  फेसबुकवर १९१५ ते २०१४ याकाळातील महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची नमुना यादी टाकली होती. नावे सुचवण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझ्या फेसबुकवरील राजेंद्र गाडगीळ, गार्गी फुले-थत्ते, प्रसाद कुलकर्णी, विवेक धर्म आदी मित्रांनी पुढील नावे सुचवली आहेत....

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव चव्हाण, नाथ पै, केशव बळीराम हेडगेवार, राहुल बजाज, अण्णासाहेब चिरमुले, भाऊसाहेब फिरोदिया, शेठ वालचंद हिराचंद, श्रीराम लागू, प्रबोधनकार ठाकरे, बापुजी साळुंखे, तुकडोजी महाराज शाहीर अमर शेख, सलीम अली, य.दि.फडके, शिवाजीराव पटवर्धन, अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड शरद पाटील, बाबा आढाव, नानासाहेब परूळेकर , सी. रामचंद्र, शिल्पकार राम सुतार, बाबुराव पेंटर, पं. सत्यदेव दुबे, गिरिश कर्नाड, रतन थिय्याम, मणीरत्नम, बी.व्ही.कारंथ, पं. जितेंद्र अभिषेकी .....

तुम्हाला काय वाटते?


No comments:

Post a Comment