Friday, July 11, 2014

जगातील पहिल्या २०० विद्यापिठांचे निकष काय?


जगातील पहिल्या २०० विद्यापिठात एकही भारतीय विद्यापिठ नसावे आणि ५०० मध्ये आय.आय.टी, पवई आणि बंगलुरूची सायन्स इन्स्टीट्यूट या दोनच संस्था आहेत असे सांगितले जाते. त्याची भारतीयांना खंतही वाटते. प्रश्न हा आहे की, जागतिक क्रमवारी लावते कोण? त्यांचे निकष काय असतात?
 इंग्रजी भाषेतून अध्यापन करणे, संस्थेत जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी असणे, आरक्षणाला विरोध, चकचकीत इमारती,भपका आणि डामडौल हवा, यासारखे निकष लावले जात असतील तर ते आपल्यासारख्या बहुविविधता असलेल्या गरिब देशासाठी अन्यायकारक नाहीत काय?
असे असेल तर मग गरिब कष्टकरी बहुजन, दलित-आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, महिला, इतर मागास वर्ग अशांना शिक्षण देणार्‍या आपल्या संस्था भले जगातील पहिल्या २०० किंवा ५०० मध्ये नसल्या तरी काही बिघडत नाही, कारण शिक्षणातून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे महत्वाचे आहे, असे म्हणायचे की नाही? तुम्हाला काय वाटते?

No comments:

Post a Comment