Wednesday, July 30, 2014

आख्खे गाव दरड कोसळून गाडले गेले

निसर्गाचा प्रकोप: आख्खे गाव दरड कोसळून गाडले गेले
भिमाशंकरजवळील डोंगराच्या कुशीत वसलेले माळीण गाव दरड कोसळून होत्याचं नव्हतं झालं. आज सकाळी सात-साडेसात वाजता ही दुर्घटना झाली. डिंभे धरणाच्या उभारणीमुळे हे गाव डोंगराखाली नव्याने उभारण्यात आले होते. तोच डोंगर गावावर कोसळला आणि आख्खे गाव मातीखाली पुरले गेले.हा परिसर माझ्या डोळ्यासमोरचा आहे.
निसर्गाचा प्रकोप किती महाभयंकर असतो त्याचा हा आणखी एक पुरावा.
गावातील सुमारे ४४ घरं या ढिगार्‍याखाली अडकली असून सुमारे २०० लोक यात अडकलेले असावेत. गेले बारा तास बचावकार्य चालू असून त्यातले जे कोणी वाचतील तो चमत्कार असेल. आशा करूया की काही लोक नक्कीच वाचतील. मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा कडा कोसळलेला आहे. त्यांना दु:ख सोसण्याचे बळ मिळो... हा परिसर माझ्या डोळ्यासमोरचा आहे.
बघ्यांनी गर्दी न करता  नागरिकांनी बचाव कार्याला मदत करावी ही नम्र विनंती....


No comments:

Post a Comment