Sunday, December 29, 2013

२०१४ चे प्रास्ताविक








माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. तो अतिशय आशावादी आणि चिवटही आहे.जगण्याचा उत्सव साजरा करताना नववर्षाचे जल्लोशात स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. अशावेळी २०१३ च्या कडूगोड आठवणी जागवत २०१४ ला सामोरं जाताना ....
२०१३:
महापुरूष मंडेला गेले.
जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू झाला...
त्यासाठी डा. नरेंद्र दाभोलकरांना शहीद व्हावे लागले..
त्यांचे मारेकरी साडेचार महिने झाले तरी सापडलेले नाहीत.
तेलंगणाची घोषणा झाली.
"आदर्श" अहवाल आला...फेटाळला...फेरविचाराचा सल्ला मानला जाणार का?
महिला सुरक्षा कायदे कडक झाले.
लक्ष्मण माने अडकले की अडकवले गेले?
अरुषी हत्याकांड शिक्षा सुनावली गेली.
निर्भया केस दिल्लीचा निकाल आला.
गांगुली, तेजपाल यांच्यावर आरोप झाले.
मिडीया ट्रायल होऊन गेली...न्यायदानाची नवी पद्धत लागू झाली.
ओबीसी म्हणतात, दोनवर्षे झाली जातवार जनगणना सुरू होऊन..२०१४ ला तरी ती पुर्ण होणार का?
नरेंद्र मोदींचा अश्वमेध ५ राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभुमीवर सुसाट सुटणार असे संकेत मिळत आहेत.
दिल्लीत केजरीवालांचे सरकार आलेय. आता जादूची कांडी फिरणार.भ्रष्टाचार आता छूमंतर होणार. १२५ कोटी भारतीयांनी आता दिल्लीत राहायला जाऊया.पाणी,वीज मोफत. कुठेही राहा, सरकार घर बांधून देईल. कांदा मोफत.भाजीपाला मोफत.आणखी काय हवे?
हा देश म्हणजे परस्परविरोधी हितसंबंधाचे महागाठोडे आहे.
जात, वर्ग, धर्म, भाषा. प्रांत, लिंग अशा परस्परांना छेद देणार्‍या हितसंबंधाना सामोरं जाण्याऎवजी समस्यांचे सपाटीकरण {सुलभीकरण करा. देशात फक्त एकच प्रश्न आहे असे सांगत राहा.
केजरीवाल म्हणणार भ्रष्टाचार संपला की देशात रामराज्य येणार.
मोदी म्हणणार, कोंग्रेस संपली की नमोराज्य येणार.
मेटे आणि युवराज{छत्रपती} म्हणणार मराठा आरक्षण आले की देश सुखी होणार.
मेधा पाटकर म्हणणार, नर्मदा,लवासा यात सगळी कीड आहे.
अण्णा हजारे म्हणणार लोकपाल आले की अण्णाराज्य येणार.
.........
देशात आज दहशतवाद, प्रदुषण, भ्रष्टाचार,दलित-महिला-गरिबांवरचे अत्याचार, महागाई, शेतकरी आत्महत्त्या, बेकारी, वाढती गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या,परमेश्वराला पर्याय जागतिकीकरणाचे गारूड,...असे डोंगरभर प्रश्न आहेत.
२०१४ मध्ये त्यावर मंथन होणार? प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावले पडणार?
की निवडणुक वर्ष असल्याने अस्मिता, गर्जना, सपाटीकरण, मतदारांचे ध्रूवीकरण  होणार?
देशाचा पंतप्रधान मोदी ? राहूल गांधी ? शरद पवार ? की अन्य कोणी?
उत्तरे यथावकाश मिळतीलच.
तोवर शुद्धीत राहून मावळत्याला निरोप देऊया आणि उगवत्याचे स्वागत करूया.
बधीर होणे, बेहोश होणे टाळूया.
टीआरपीच्या सुनामीत वाहून जाण्याऎवजी विवेक जागा ठेवूया..
मध्यममार्ग स्विकारूया..
रंगनाथ पठारे सरांची नवी कादंबरी " एका आरंभाचे  प्रास्ताविक " नुकतीच वाचली.जबरदस्त आहे. समृद्ध अडगळीसह कसे जगायचे याची इनसाईट हा लेखक आपल्याला देतो.
२०१४ चे प्रास्ताविक करताना आपापली "पणती" जपून ठेऊया.....
चला नववर्षाचे स्वागत करूया...

Wednesday, December 25, 2013

आज २५ डिसेंबर:




आज २५ डिसेंबर:
१८७३ साली: जोतीराव सावित्रीबाईंनी या दिवशी पहिले सत्यशोधक लग्न लावले. त्यात त्यांनी हुंडा, डामडौल, अवाजवी खर्च, बालविवाह, भटजी यांना नकार दिला.वय,गुण,प्रेम व आवडीनिवडी बघून लग्न करावीत असा सल्ला दिला. स्त्रियांचे मानवी अधिकार स्थापन करण्यासाठी झटण्याची प्रतिज्ञा या लग्नात नवरा मुलगा जाहीरपणे करीत असे.
आज बहुजनांनी बडेजाव, अवाजवी खर्च, हुंडा आणि मानपानाद्वारे जोतीराव-सावित्रीबाईंचा सगळा पराभव करून टाकला आहे.तुम्हाला काय वाटते?
१९२७ साली: बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सुरबा नाना टिपणीस, पोलादखान पठाण हे त्यांच्या सोबत होते. तेव्हा मनुस्मृती हे भारतीय संविधान होते. आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय जाळले असते?
आजही मनुस्मृतीला आणि ब्राह्मणांना तोंडाने शिव्या देत पण ती डोक्यावर घेऊन स्वत:मध्ये उच्चनिचतावादीवृत्ती मुरवून कोण तिचे पालन करतायेत?अशाप्रकारे बहुजन आजही भारतीय संविधान पायदळी तुडवित असतील तर त्यांनी बाबासाहेबांचे नाव घ्यावे काय? तुम्हाला काय वाटते?

Sunday, December 8, 2013

फुले-आंबेडकर समकालीनच



पुढारी, रविवार, पुणे, दि.८ डिसेंबर, २०१३
Pudhari, Pune, 8 Dec.2013
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=416104&boxid=12442881&pgno=4&u_name=0

Friday, December 6, 2013

नेल्सन मंडेला

१९९०-९१ हे फुले स्मृतीशताब्धी आणि डा‘.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्धी वर्ष होते



. नेल्सन मंडेला भारतभेटीवर आलेले असताना आम्ही त्यांना भेटून या दोघांचे ग्रंथ भेट दिले. जोतीरावांनी १८७३ साली आपला गुलामगिरी हा ग्रंथ कृष्णवर्णियांच्या चळवळीला अर्पण केल्याचे बघून ते भारावून गेले. "आम्हाला भारताशी जोडणारा हा गांधीपुर्व दुवा आहे," असे ते म्हणाले.बाबासाहेबांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची उर्जा आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. मायदेशी गेल्यावर त्यांनी आमच्याकडून फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांच्या प्रत्येकी हजार प्रती खरेदी करून त्यांच्या देशातील सर्व ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापिठे यांना भेट दिल्या. "ला‘ग वा‘क टू फ्रिडम" "Long Walk To Freedom" लिहिणारा हा महामानव. ते या सहस्त्रकातले मानवी अधिकार चळवळीतले महान व्यक्तीमत्व होते....विनम्र आदरांजली.

Thursday, November 28, 2013

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच





http://ncp.org.in/stories/initiative/262....

'पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच - प्रा. हरि नरके'
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेने {सिनेटने} सर्वानुमते विद्यापिठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे हा निर्णय पाठवून त्याला मान्यता मिळाली की, सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून प्रस्ताव आल्यास सरकार त्याबाबत जरूर विचार करेल, असे आश्वासन दिले होते. यावरून नामविस्ताराची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे दिसते. ही आनंदाची बाब आहे.

दोन विरोधी सूर निघाले, हे खरे आहे, मात्र हे दोघेही विद्यापीठाबाहेरचे असल्याने आणि ती त्यांची व्यक्तिगत मते असल्याने त्याला लोकांचा पाठिंबा नाही. एकाचे म्हणणे असे होते की, विद्यापीठाची गुणवत्ता नामविस्ताराने वाढणार नाही किंवा भ्रष्टाचारही संपणार नाही, त्यामुळे नामांतराची गरज नाही. हा युक्तीवाद मुख्य विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरी कडे वेधणारा आहे. त्यात फारसे तथ्य नाही. नामविस्ताराशी गुणवत्तेची सांगड घालून विरोध करणे, योग्य नाही.

नामविस्तार करताना विद्यापीठाच्या नावामध्ये पुणे शब्द नको, कारण पुण्याला पेशव्यांचा जातीयवादी इतिहास आहे. असा आक्षेप घेतला गेला आहे. तो अतिशय बालिश आणि तथ्यहीन आहे. पुणे शहर हे जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय, थोरले बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टिळक, आगरकर, रानडे, कर्वे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापासून जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, अनिल अवचट, बाबा आढाव अशा गुणवंतांचे आहे. पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान, उद्योग आणि व्यापार यांचे माहेरघर आहे. महात्मा गांधी यांनी पुण्याला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. हा वारसा पाहता पुणे या नावाला विरोध करणे आयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लोकसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशी नामविस्ताराची गेल्या २० वर्षांची परंपरा आहे. तिला अनुसरूनच पुणे हा शब्द ठेवणे उचित होईल.

सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी १५० वर्षांपूर्वी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण ते दाम्पत्य डगमगले नाही. सावित्रीबाई जोतिरावांकडे आधुनिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बघणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची आमुलाग्र फेररचना करणे, तंत्रशिक्षण आणि शेतीशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, शैक्षणिक गळतीची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रौढ साक्षरता अभियान सुरू करणे, महिला व दलितांच्या शिक्षणासोबतच अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे, याबाबतचे सावित्रीबाई-जोतिरावांचे कार्य अतुलनीय आहे.

महिला आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंच्या नावामुळे महिलांच्या मानवी अधिकारांच्या चळवळीला फार मोठी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास वाटतो. हा नामविस्तार अतिशय सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचा आनंद आहे. मी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे अभिनंदन करतो.

'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

http://ncp.org.in/stories/ourachievers/260
'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ (Shivcharitra) लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ



















कुमार केतकर, शारदा साठे, छगन भुजबळ, हरी नरके, कृष्णकांत कुदळे व इतर मान्यवर
......................
महात्मा फुले पुण्यतिथी -- फोटो - समता भूमी . . . .फोटो-- महेश जांभुळकर - 98600 88820
.......................................


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ- कुमार केतकर
पुणे: दि.२८ नोव्हें. "डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात.त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते. त्यांच्या साहित्यातील हा वैचारिक भाग एकत्र करून त्याची मांडणी करण्याचे काम नव्या पिढीतील अभ्यासकांनी हाती घ्यावे" असे प्रतिपादन दिव्यमराठीचे प्रमुख संपादक कुमार केतकर यांनी आज येथे केले. अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात आलेला "महात्मा फुले समता पुरस्कार" स्विकारताना ते बोलत होते. राज्याचे सार्व. बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या शारदा साठे,खासदार समीर भुजबळ, आमदार गिरीष बापट, जयदेव गायकवाड, उल्हास पवार, जयंत जाधव, दिप्ती चवधरी, महापौर चंचला कोद्रे, कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, महिला अध्यक्ष पार्वती शिरसाठ,सुधीर गाडगीळ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून समतासैनिक प्रचंड मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.
केतकर पुढे म्हणाले, "अमेरिकन यादवी युद्धात अब्राहम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचकाळात जोतीरावांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या चळवळीला अर्पण करून जागतिक दृष्टीचा प्रत्यय दिला.विचारांचे असे जागतिकीकरण करणारे जोतीराव जातीनिर्मुलनाची चळवळ रुजवून गेले. आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो.माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते."
रुपये एक लक्ष, फुलेपगडी.मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे आणि फुले समग्र वाड्मय यांचा पुरस्कारात समावेश होता.
यावेळी शारदा साठे, छगन भुजबळ यांची भाषणे झाली. कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रीतेश गवळींनी आभार मानले. सुत्रसंचालन विजय लडकत यांनी केले.
कार्यक्रमाला समता परिषदेचे राज्य पदाधिकारी, बापू भुजबळ, डा. कैलास कमोद, डा.संजय गव्हाणे, जयराम साळुंखे, सुशील जाधव, अंबादास गाडेकर, दत्ता घाटगे, मकरंद सावे, बाळासाहेब माळी, आबा खोत, सुभाष राऊत, राजेश मनोरे, पत्रकार अरूण खोरे, संजय शिंदे, अद्वैत मेहता, शैलेंद्र परांजपे उपस्थित होते.


........................................................................................

Wednesday, November 27, 2013

महात्मा फुले समता पुरस्कार मानपत्र

ज्येष्ट विचारवंत आणि संपादक श्री. कुमार केतकर-"महात्मा फुले समता पुरस्कार मानपत्र"







Monday, November 25, 2013

पेपरबॅक : उत्कंठावर्धक व प्रेरणादायी

LOKSATTA,saturday,23 Nov 2013,edit page
http://www.loksatta.com/sampadkiya-news/yes-i-am-the-malala-malala-yousafzai-272664/






विशेष लेखपद्माकर कांबळे - padmakar_kamble@rediffmail.com
Published: Saturday, November 23, 2013
मलाला युसुफझाई आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. एवढय़ा लहान वयात शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालेली ही पहिलीच मुलगी. तिचं 'आय अ‍ॅम मलाला' हे पुस्तक वाचकांना तिच्या अनुभवांचं, तिनं पाहिलेल्या स्वप्नांचं सरळ सोप्या भाषेत ओळख करून देतं. 
एका कुमारवयीन मुलीचं हे आत्मकथन म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबरीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका 'कार्यकर्ती'चे अनुभव आहेत.  पाकिस्तानी तालिबान्यांनी तिला 'लक्ष्य' का केलं, त्यामागील कारणही सर्वाना माहीत आहे. तो सर्व तपशील या पुस्तकात येतोच. पण त्याहीपेक्षा स्वात खोऱ्यासारख्या दुर्गम भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धार्मिक मूलतत्त्ववाद अन् जहालपणा व त्यातून होणारी हिंसा यांच्या कचाटय़ात सापडूनसुद्धा आपल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्या एका जिद्दी मुलीची कहाणी आहे.
मलाला जे सांगू पाहतेय ते गेल्या दशकभरातलं पाकिस्तानचं वास्तव आहे. जोडीला पाकिस्तानच्या इतिहासातील काही घटनांची उजळणी आहे. पण मलालाची पाश्र्वभूमी पाहता परंपरावादी-धार्मिक पगडा असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली एक मुलगी या सर्व घटनांकडे कशी पाहते, त्याचा काय अर्थ लावते, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. मलाला-स्वात-पाकिस्तान असा हा त्रिकोण आहे.
मलालाची कहाणी तिच्या जन्मापासून सुरू होते. हा कालखंड फारच अलीकडचा म्हणजे सोळा वर्षांपूर्वीचा.. स्वात खोऱ्यातील 'पश्तुन' कुटुंबात तिचा जन्म झाला. मुलीचा जन्म ही 'साजरी' करण्यासाखी घटना नाही अशी 'पश्तुनी' परंपरा. पण वडील झियाउद्दीन या परंपरेला फाटा देत आपल्या अपत्याच्या जन्माचं स्वागत करतात. कारण ही मुलगी भविष्यात वेगळं काहीतरी करेल असा त्यांना आशावाद असतो. पुढे हेच वडील तिचं प्रेरणास्थान बनतात. पश्तुन परंपरेत मानाचं स्थान असलेल्या शूर 'मलालाई' या स्त्रीवरून झियाउद्दीन आपल्या कन्येचं नाव मलाला ठेवतात. परंतु गावातल्या मौलानाला ते आवडत नाही. तो म्हणतो, या नावाचा अर्थ वाईट आहे. म्हणजे 'दु:खाने ग्रासलेली'. इथं मलालाच्या बरोबरीनं तिच्या वडिलांचा भूतकाळ अन् स्वातचा इतिहास समोर येतो. 
मलालाला स्वात खोऱ्याविषयी भरपूर प्रेम आहे. 'मी पहिली 'स्वाती', नंतर 'पश्तुनी' व शेवटी पाकिस्तानी आहे' असं ती म्हणते. निसर्गसंपन्न स्वात खोरे, हिमशिखरे, प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा अन् शांतता हा स्वातचा हजारो वर्षांचा वारसा आहे. लहान मलालाचं हेच जग आहे. त्यापलीकडील पाकिस्तान तिला माहीत नाही.
मलाला चार वर्षांची असताना अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त होतात अन् सगळेच भू-राजकीय संदर्भ झपाटय़ानं बदलतात. जगाच्या नकाशावर न्यूयॉर्क-अमेरिका नेमके कुठे आहेत हे कळण्याचं मलालाचं वय नव्हतं, पण तिचे वडील या घडामोडींनी चिंताग्रस्त होतात. अखेर अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करते व मोठय़ा प्रमाणावर तालिबानी दहशतवादी 'सुरक्षित' आसऱ्यासाठी अफगाण-पाकिस्तानच्या सीमेकडील प्रदेशांकडे आपला मोर्चा वळवतात. हा स्वायत्त प्रदेश आहे व पाकिस्तान सरकारचं यावर 'दुरून'च नियंत्रण आहे, पण ते सांगण्यापुरतं वा नावापुरतंच आहे. 
मलालाची शाळा, शाळेतील तिची खास मैत्रीण मोनिबा, मलालाच्या आवडत्या शिक्षिका मरयम अन् स्वातची शांतता हे सर्व मलालापासून लवकरच हिरावून घेतलं जाणार याची लहान मलालाला कल्पना नाही. अखेर स्वातच्या खोऱ्यात तालिबान्यांचा वावर दिसू लागतो. धार्मिक मूलतत्त्ववादाच्या कचाटय़ात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन आव्हान उभं राहतं. उजवा पाय पोलिओग्रस्त असलेला मुल्ला फझलुल्लाह हा त्यांचा म्होरक्या. स्वातमध्ये तो अनधिकृत एफएम रेडिओ केंद्र स्थापन करतो व त्यावरून जहाल भाषणं करू लागतो. थोडय़ाच काळात 'रेडिओ मुल्ला' या नावानं ओळखला जाऊ लागतो. या रेडिओ मुल्लावर या आत्मकथनात एक स्वतंत्र प्रकरण आहे. यानंच पहिल्यांदा स्वात खोऱ्यातील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली. पुढे यानंच मलालाच्या हत्येची 'सुपारी' दिली.
मलालाचा टी.व्ही, त्यावरील तिचे आवडते बॉलीवूडचे कार्यक्रम बंदीच्या वावटळीत सापडतात. पण शेवटी तिच्या शाळेवरच बंदीची वेळ येते, त्या वेळी मात्र ती गप्प बसत नाही. 'स्वात'मधील वास्तव परिस्थिती बाहेरील जगाला कळावी म्हणून अखेर मलाला वडिलांच्या पत्रकार मित्राच्या मदतीनं 'गुल मकाई' या टोपणनावानं बीबीसी उर्दूच्या संकेतस्थळासाठी लिखाण करू लागते. परंतु शेवटी 'शाळा' बंद पडतेच, पण लष्करी कारवाईमुळे 'स्वात'पण मलाला व तिच्या कुटुंबाला सोडावं लागतं. तीन महिने मायदेशातच 'देशांतर्गत निर्वासित' म्हणून राहण्याची वेळ येते. स्वात तालिबानमुक्त केल्याची घोषणा लष्करानं केल्यानंतर तीन महिन्यांनंतर मलाला परतते, तेव्हा ती 'रक्ताळलेले' स्वात पहिल्यांदाच पाहते. 
'थांबणं' मलालाला पटत नाही. स्वातमध्ये परतल्यानंतर 'शाळा' पुन्हा सुरू होते. मलालाच्या जन्माआगोदर तिच्या वडिलांनी एक छोटी भाडय़ाची इमारत, सहा शिक्षक व जवळपास शंभर मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेचा विस्तार आता तीन इमारती, हजार मुलं-मुली, सत्तर शिक्षक-शिक्षिकांपर्यंत विस्तारतो. साहजिकच पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या पाकिस्तानी तालिबान्यांकडून मलालाच्या वडिलांना धमक्या येऊ लागतात. 'मुलींना शिक्षण देणं थांबवा!' पण मलालाला ते 'लक्ष्य' करतील असं वडिलांना मात्र वाटत नाही. 
मलाला, तिचे वडील, तिची आई या तिघांचाही 'इस्लामवर गाढ विश्वास' आहे. आपण जे काम करतोय ते इस्लामच्या विरोधात नाही यावर मलाला व तिचे वडील ठाम आहेत.
या आत्मकथनातला वाचनीय भाग म्हणजे ९\११ नंतरचं मलालाचं आयुष्य.. स्वात ते बर्मिगहॅम रुग्णालयापर्यंतचा तिचा प्रवास.. या सगळ्यात एक 'नाटय़' आहे. म्हणूनच ते अधिक उत्कंठावर्धक आहे. 
आय अ‍ॅम मलाला : मलाला युसुफझाई
प्रकाशक : वेडेनफेल्ड अँड निकोलसन
पाने : २७६, किंमत : ३९९ रुपये.




मानवी जगण्याची समर्थ भाष्यकार

LOKSATTA, Saturday, 2013,Edit Page
http://www.loksatta.com/sampadkiya-news/capable-of-living-human-annotator-272668/...

विशेष लेखमीना वैशंपायन -meenaulhas@gmail.com
Published: Saturday, November 23, 2013
नुकत्याच निधन पावलेल्या डोरिस लेसिंग या नोबेल विजेत्या ब्रिटिश लेखिकेला दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील वर्ष, पहिल्या महायुद्धाचं तांडव आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं वाटे. एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणाऱ्या लेसिंग मानवी जीवनाबद्दल आस्थेनं आणि सकारात्मकतेनं लिहीत.
'लेखन हा माझा श्वास आहे आणि त्यामुळे त्याशिवाय जगणं मला अशक्य आहे,' असं एकीकडे गंभीरपणे म्हणत दुसरीकडे 'लेखनाची माझी ही जित्याची खोड मेल्यावरही जाणार नाही, माझ्या थडग्यावरही मी काही तरी खरडेन' अशी मिस्कील पुस्ती जोडत जाणाऱ्या नोबेलविजेत्या ब्रिटिश लेखिका डोरिस लेसिंग यांचं १७ नोव्हेंबर रोजी निधन झालं. जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या लेखिकेच्या निधनानं हळहळ तर वाटली असेलच, पण तिनं वाचकांसाठी मागे ठेवलेल्या दर्जेदार साहित्याची सोबत आहे असं समाधानही असेल. लेसिंग यांच्या कारकिर्दीत त्यांच्या नावावर साठेक पुस्तकं आणि विविध पुरस्कार असूनही तिला नोबेल मात्र वयाच्या ८८व्या वर्षी मिळालं. तेव्हा लेसिंग यांच्या काहीशा वळणावळणाच्या, टीका, चर्चा यांनी युक्त अशा जीवनप्रवासाशी ही बाब सुसंगत आहे असं त्यांच्या हितचिंतकांचं म्हणणं होतं.
लेसिंग आणि 'गोल्डन नोटबुक' असं समीकरण वाचकांच्या मनात इतकं पक्कं आहे की, त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा याच पुस्तकाचा निर्देश नोबेल समितीनं केला. १९६२ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला पन्नास र्वष झाली तरी तिची वाचकप्रियता इतकी आहे की प्रत्येक पिढीला ती आपलीच गोष्ट वाटते. समकालीन लेखनात लेसिंगचं सामथ्र्य यात प्रकर्षांनं जाणवतं. वाचकाशी नाळ जोडणारं असं वास्तववादी लेखन करणाऱ्या लेसिंगनं स्वयंशिक्षणातूनच आपलं वाङ्मयीन व्यक्तित्व घडवलं. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकून अभिजात साहित्याच्या मदतीनं तिनं आपल्या मनाची मशागत केली. दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील र्वष, पहिल्या महायुद्धाच्या तांडवाचा आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं तिला वाटे. ऱ्होडेशियातील ब्रिटिश वसाहतींमध्ये दिसणाऱ्या वसाहतवादी जीवनाचा, वर्णभेदमूलक तीव्र संघर्षांचा व जाणवणाऱ्या आर्थिक दरीचा विलक्षण परिणाम तिच्या मनावर झाला. त्यामुळेच वयाच्या ९४ वर्षांपैकी ६४ र्वष ब्रिटनमध्ये घालवूनही तिच्या मनोविश्वाचं केंद्रस्थान ती पहिली तीस वर्षेच राहिली आणि विविध प्रकारे तिच्या लेखनातून त्या अनुभवांचा आविष्कार होत राहिला.
स्वानुभवातून चुका सुधारत राहण्यानं, स्वयंशिक्षण, स्वयंमार्गदर्शन करत राहिल्यानं तिची किती तरी मतं वेगळी, वैशिष्टय़पूर्ण ठरली. स्वतंत्र विचार व वृत्ती, परखड भाष्य आणि जीवनाबद्दलचं लसलसतं, जिवंत कुतूहल यामुळे तिचं लेखन आगळं, ताजं, उत्स्फूर्त वाटत राहिलं.
लहानपणी आपल्यात कोणतीच क्षमता नसल्याची जाणीव इतरेजन करून देत राहिल्यानं आपण वैफल्यग्रस्त झालो आणि म्हणून लेखनाकडे वळलो असं ती म्हणत असली तरी वाचन व लेखन यांची उपजतच आवड तिला होती असं तिच्या आत्मचरित्रात्मक आठवणींमधून लक्षात येतं. लेखक होण्यासाठीच आपला जन्म आहे असं मनोमन वाटत असल्यानं तिनं १८ व्या वर्षांपासूनच कादंबरीलेखनाला आरंभ केला. दोन-चार सुमार दर्जाच्या कादंबऱ्या लिहिल्यावर २६-२७ व्या वर्षी 'द ग्रास इज सिंगिंग' (१९५०) या कादंबरीपासून तिला सूर गवसला. या पहिल्याच प्रकाशित कादंबरीतील कथानक, पात्रचित्रण, भाषा यांचा प्रभाव वाचक, समीक्षक यांच्यावर पडला. गोरी ब्रिटिश तरुणी आणि कृष्णवर्णीय शेतमजूर यांच्यातील असफल प्रेमकहाणी व तिचा शोकपूर्ण शेवट दाखवतानाच लेसिंग स्त्रीचं भावनिक परावलंबन आणि कृष्णवर्णीयांच्या गुलामी मनोवृत्तीत घडत जाणारा बदल यांचा वेध घेताना दिसते.
त्यानंतर कथा-कादंबरी या वाङ्मय प्रकारांत तिचं बहुतेक लेखन मोडत असलं तरी आरंभी तिनं काही कविता केल्या होत्या. 'फोर्टीन पोएम्स' (१९५९) हा कवितासंग्रह, काही एकांकिका, नाटुकली आणि 'इच हिज ओन वाइल्डरनेस', 'प्ले विथ अ टायगर' अशी नाटकंही तिच्या नावावर आहेत. याशिवाय 'अंडर माय स्किन' (१९९५) व 'वॉकिंग इन शेड' (१९९८) हे तिच्या आत्मचरित्राचे दोन खंड प्रकाशित झाले. त्यात १९६२ पर्यंतचाच जीवनप्रवास चित्रित झाला. याशिवाय 'आफ्रिकन लाफ्टर' व 'लंडन ऑब्झव्‍‌र्हर' हे ललितसंग्रह, काही समीक्षापर व डॉक्युमेंटरीवजा लेखन यांचाही समावेश आहे.
१९५० मधील पहिल्या कादंबरीपासूनच तिच्या लेखनाची वैशिष्टय़ं कधी स्पष्टपणे, तर कधी अस्पष्टपणे दिसून येतात. तिच्या वैचारिक प्रवासाचे टप्पेही दिसतात. लेसिंगच्या वाङ्मयाचे आशयानुसार स्थूलमानानं चार भाग करता येतात- समकालीन समाजवास्तवाशी निगडित कथा-कादंबऱ्या, अवकाशविज्ञानावर आधारित कादंबऱ्या, गूढ-अध्यात्मदर्शी लेखन आणि इतर संकीर्ण लेखन. हे पाहिलं की लेखिका म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही तिचं मन किती तरी वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रमण करत होतं आणि आपल्या लेखनातून त्या अनुभवांचा धांडोळा घेत, त्यांचा अन्वयार्थ लावत ती समाजवास्तवाची विविध परिमाणं वाचकांपुढे मांडत होती. तिच्या कादंबऱ्यांमध्ये परस्परसंबंधित सूत्रं आहेत तशीच पुढच्या कादंबऱ्यांची सूचना आहे. चित्रपटांचे सीक्वेल हा प्रकार तिनं चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच आपल्या लेखनात वापरला होता. 'गोल्डन नोटबुक'मधून मुक्त स्त्रीचं तपशीलवार वर्णन दाखवताना एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीचं चित्रण ती 'अ‍ॅना वुल्फ' या नायिकेच्या रूपानं करते आहे असं दिसतं. (जाता जाता १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत संततिनियमन साधनं व त्यामुळे स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य यांचं चित्रण आहे. १९६३ मध्ये त्यासंबंधीची सोपी साधनं बाजारात आली आहेत.) तिच्या लेखनातील अशी भविष्यवेध घेण्याची क्षमता अपूर्व आहे.
'चिल्ड्रेन ऑफ व्हायोलन्स' या पाच कादंबऱ्यांतील तिच्या काही व्यक्तिरेखा समान आहेत, पण कथानकात त्या त्या व्यक्तिरेखांचा विकास झाला असावा याचं भान तिनं ठेवलं आहे. मानवी जीवन व समाज सतत परिवर्तनशील असतो. तो स्थितिप्रिय आहे असं म्हटलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, घटनांचा परिणाम समाजात झिरपत राहतो. माणसं बदलतात असं तिचं सूत्र आहे. ही कादंबरी मालिका वीस वर्षांच्या काळात लिहिली गेली. मध्ये मध्ये इतर कादंबऱ्याही तिनं लिहिल्या, पण मार्था क्वेस्ट या नायिकेमध्ये पहिल्या कादंबरीपासून शेवटच्या 'द फोर गेटेड सिटी'पर्यंत कसा बदल होत गेला ते तिनं दाखवलं आहे. त्याच वेळी त्या वीस वर्षांत घडलेले सामाजिक बदल, घटना यांचाही ताजा संदर्भ आहे. 'द फोर गेटेड सिटी'मधून गूढवादाची सूचना मिळते आणि पुढे 'ब्रिफिंग फॉर अ डिसेंट इनटू हेल' या अंतर्मनाच्या अवकाशाचा शोध घेणाऱ्या कादंबरीची निर्मिती होते.
आपल्या लेखनाबद्दलची केलेली योजनानिश्चिती आणि वाचकांना काय सांगायचं आहे याची स्पष्ट कल्पना देण्यात लेसिंग यशस्वी होते. जीवनातील कुरूपतेकडे ती पाठ फिरवत नाही तसेच विचारप्रणालीचा स्वीकार केल्यानंतर जर भ्रमनिरास झाला, तर त्याबद्दल स्पष्टपणे सांगण्यासही ती कचरत नाही. तिचा स्वत:चा कम्युनिझम ते सुफीझम असा झालेला वैचारिक प्रवास, आधुनिक जगातील नव्या जीवनशैलीमुळे वाढणारे मानसिक गुंते ('द गोल्डन नोटबुक', 'द गुड टेररिस्ट') आणि उभ्या राहणाऱ्या शारीरिक समस्या ('द फिफ्थ चाइल्ड', 'बेन कम्स टू द वर्ल्ड') यांनी ती अस्वस्थ होई आणि त्यावरील खात्रीशीर उपाय सांगणं शक्य नसलं तरी त्यांची जाणीव करून देणं शक्य आहे, ते आपण करावं अशी तळमळ तिच्या मनात असे.
'कॅनॉपस इन अ‍ॅरगॉस - अर्काइव्हज' ही पाच कादंबऱ्यांची मालिका तिच्या अफाट कल्पनाशक्तीचा प्रत्यय देते. मानवी समाजाच्या आरंभापासूनचा इतिहास सांगत, रूपकांच्या आश्रयानं व्यवस्थेवर उपहासात्मक शैलीत ताशेरे झोडणाऱ्या मालिकेनं आणि तिच्या सखोल, परिश्रमपूर्वक संपादनानं वाचक चकित झाले. 
मानवी नातेसंबंध, त्यातही स्त्री-पुरुष संबंध, त्यांचे वर्तनविषयक प्रश्न, याविषयी लिहिताना तिची मिस्कील पण स्पष्ट शैली आणि आकृतिबंधातली प्रयोगशीलता वेधक ठरते. लेसिंगच्या अशा विपुल ग्रंथसंपदेची व वैशिष्टय़ांची झलक देणंच शक्य आहे.
एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणारी लेसिंग मानवी जीवनाबद्दल ज्या आस्थेनं लिहिते आणि जो सकारात्मक दृष्टिकोन दाखवते तो पाहून या प्रतिभाशालिनीबद्दल आदरच वाटतो. ब्रिटिशांनी तिला देऊ केलेला 'डेम' हा किताब (त्यांच्या वसाहतवादी वृत्तीचा निषेध म्हणून) नाकारताना 'आता एम्पायर आहेच कुठे मी 'डेम' व्हायला?' असे म्हणणाऱ्या लेसिंगचा हाही पैलू तिच्या कादंबऱ्यांएवढाच मनाला भावतो.



Saturday, November 23, 2013

कुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी



कुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी
ख्यातनाम विचारवंत, संपादक आणि वक्ते कुमार केतकर यांना यावर्षीचा महात्मा फुले समता परिषदेचा "महात्मा फुले समता पुरस्कार" घोषित करण्यात आला आहे. पुरस्कारात रुपये एक लाख, मानपत्र, फुले पगडी आणि  स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. निवड समितीचे निमंत्रक प्रा. हरी नरके आणि कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
केतकर यांनी गेल्या ४० वर्षात आपल्या निर्भीड आणि व्यासंगी लेखणीद्वारे व प्रखर वक्तृत्वाद्वारे केलेल्या समाजजागृतीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. देशातील लोकशाही आणि समता,स्वातंत्र्य,बंधुता,सामाजिक न्याय,धर्मनिरपेक्षता यांच्या बाजूने प्रभावीपणे जागरण करण्यात केतकर अग्रभागी आहेत. त्यांचे ग्रंथ आणि वृतपत्रीय लेखन यातील त्यांचे सर्व प्रतिपादन या मुल्यांच्या रक्षणासाठी आग्रही भुमिका घेणारे आणि आक्रमक असते.त्यातील जागतिक संदर्भ आणि समकालीनता यासाठी अपार व्यासंग, युक्तीवाद आणि कमिटमेंट यांच्याद्वारे केतकर  व्यक्त होत असतात.
फुले-आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यात केतकरांचा फार मोठा वाटा आहे. लोकसत्ता,लोकमत आणि म.टा.यांचे प्रमुख संपादक राहिलेले केतकर सध्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक आहेत. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यांना पद्मश्री सन्मान मिळालेला आहे.
यापुर्वी रावसाहेब कसबे, आ.ह.साळुखे,बाबा आढाव,भालचंद्र मुणगेकर,प्रा.हरी नरके आणि विरप्पा मोईली यांना हा पुरस्कार देण्यात अलेला आहे. येत्या २८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुण्यात म.फुलेवाड्यावर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

Friday, November 22, 2013

"संयत, स्फोटक नी श्रेष्ट आत्मचरित्र : गाणाराचे पोर"

एक अविस्मरणीय प्रकाशन समारंभ
"संयत, स्फोटक नी श्रेष्ट आत्मचरित्र : गाणाराचे पोर"
- मेघना पेठे
मी आजवर पुस्तकांचे असंख्य प्रकाशन समारंभ पाहिले, परंतु यासम हाच! एखाद्या मैफिलीसारखा २ तास उमलत,फुलत गेलेला समारंभ आज मी पुण्यात नुक्ताच पाहिला.लेखक, समिक्षक आणि प्रमुख पाहुणे यांचे तिघांचेही  गोळीबंद विचार, अभ्यासपूर्ण भाषणे आणि आत्मचरित्राचे उत्स्फुर्त आस्वादन असलेला सुरेल मैफिलीचा हा अनुभव खरंच फार वेगळा होता.
एस.एम.जोशी फौंडेशन सभागृहात आज सायंकाळी ६.१५ ते ८.१५ मुंबईच्या येशू पाटील यांच्या शब्द पब्लिकेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाला तमस या हिंदी कादंबरीचे लेखक भीष्म सहानी तब्बेत बरी नसल्याने येऊ शकले नाहीत. भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र जोशी यांच्या" गाणाराचे पोर" या आत्मचरित्राचे प्रकाशन ओसंडून वाहणार्‍या भरगच्च उपस्थितीत पार पडले.जागतिक किर्तीचे पं. भीमाण्णा जोशी यांच्या पहिल्या उपेक्षित पत्नीच्या मुलाची ही कैफियत आहे.  यावेळी ख्यातनाम कथा नी कादंबरीकार मेघना पेठे यांचे झालेले भाषण अप्रतिम होते, त्या म्हणाल्या, " हे पुस्तक विलक्षण वाचनीय आहे. असे संयत,स्फोटक नी श्रेष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल मला लेखकाची असूया वाटते. इतके चांगले मी नाही लिहू शकणार.भारतीय विवाह संस्थेने गर्भाशयाचे आरक्षण करण्यासाठी लग्नाची पद्धत निर्माण केली.आज कर्तबगार स्त्री एकटी राहू शकते,पण पुरूष नाही एकटा राहू शकत.जुन्या काळात स्त्रियांना पतीशिवाय पर्यायच नसायचा. कालचा तो जेव्हा दुसरीकडे जायचा तेव्हा पहिल्या पत्नीच्या व तिच्या मुलांच्या वाट्याला नेमके काय यायचे याचे एका धॄव बाळाचे विलक्षण जखमा करणारे चित्रण या पुस्तकात आहे."
मेघना पेठे लिहितात छानच पण बोलतातही अप्रतिम. त्यांचे सगळे भाषण हा एक अनुभव होता. ह‘टस ओफ मेघना पेठे. यावेळी लेखकाने केलेले प्रास्ताविक भारावून टाकणारे होते. त्यांनी पुस्तक लेखनामागची पार्श्वभुमी मांडली.कोणतीही कटूता नसलेले हे भाषण चटका लावणारे होते.
प्रसिद्ध समिक्षक प्रा. हरिचंद्र थोरात यांनी या ग्रंथाचा करून दिलेला प्रदीर्घ परिचय अभ्यासपूर्ण आस्वादक भाषणाचा उत्कृष्ट नमुना होता. आता हे पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही.
संयोजक-प्रकाशक येशू पाटील यांनी स्वागत केले. विनिता आपटे यांनी सुत्रसंचालन केले आणि आभार मानले.कार्यक्रमाला शंकर सारडा, मुकुंद टांकसाळे, गिताली विम, ज्ञानदा देशपांडे आणि इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते. 

खोडा घालण्यासाठी अतिरेकी पवित्रा

"



ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ"
खोडा घालण्यासाठी अतिरेकी पवित्रा

पुणे विद्यापिठाचा नामविस्तार "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ" असा सुरळीतपणे होणार हे बघून ज्यांची माथी भडकली आहेत, ते त्यात खोडा कसा घालता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आता नवी खेळी सुरू केली आहे. आपण सावित्रीबाईंच्या बाजूचे आहोत असे दाखवणार्‍या बेदखल लोकांना हाताशी धरून हे उद्योग सुरू झाले आहेत. विद्यापिठाच्या नावात "पुणे" शब्दच नको अशी अतिरेकी भुमिका सावित्रीबाईंच्या प्रेमातून आलेली नसून असा अतिरेकी पवित्रा घेतला की होणारे नामकरण आपोआप रोखले जाईल असे डावपेच यामागे आहेत. हे षड्यंत्र ओळखून या भडकाऊ आणि विरोधकांना सामील असणार्‍या शक्तींपासून आपण दूर राहणे उचित होईल.तुम्हाला काय वाटते?

Monday, November 18, 2013

कोहम महोक यांचा कुत्सितपणा



कोहम महोक यांच्या फेसबुकवर त्यांनी जातीवर्चस्व-जात्याभिमान आणि वर्णश्रेष्ठत्वाचा उग्र पुरस्कार करणारी एक पोस्ट टाकलेली आहे. त्यात सावित्रीबाईंचे कार्य शालेय शिक्षणात होते म्हणून  त्यांचे नाव एखाद्या शाळेला द्यावे असे अत्यंत कुत्सितपणे सुचवले आहे. ही सावित्रीबाईंची प्रच्छन्न टवाळी आहे. त्यांचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्या चर्चेतील काही अंश माहितीस्तव खाली देत आहे. श्री.राजन दांडेकर, श्री.मयुरेश कुलकर्णी आदींनी कोहमना सडेतोड उत्तरे दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
Koham Mahok
November 12
सध्या एक जातीयवादी वाद जोर धरू पाहतो आहे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे की जिजाबाई भोसले यांचे नाव द्यावे. सर्वसाधारणपणे मराठा आणि माळी/ इतरेजन असे ह्या वादाचे स्वरूप आहे. ह्या वादात माझ्या माहितीतील सर्व ब्राम्हणांनी सावित्रीबाई फुल्यांच्या बाजूने मत दिलेले आहे. उस्फुर्त चर्चेत सुद्धा ब्राम्हण युवक आणि इतर, सावित्रिबाइंच्या नावाला पाठींबा देत आहेत. ही घटना ब्राम्हण समाजाच्या विद्यादानाच्या क्षेत्रातील आणि पुणे विद्यापीठातील कमी होत चाललेल्या इंफ्ल्यूयन्सचे द्योतक आहे.
ह्यामागे लक्ष्यात घेण्याच्या काही गोष्टी आहेत:
१. जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही. मला वाटते सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?
२. सावित्रीबाई ह्या म. फुल्यांचा ब्राम्हणद्वेषाच्या बाजूने होत्या की विरुद्ध ह्याचा खुलासा/ संशोधन होणे जरुरीचे आहे. म. फुले हे ब्राम्हणद्वेषाच्या बाबतीत तत्कालीन संभाजी बिग्रेड स्टायल (अहिंसक जहाल विरोधी) होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे.
३. जिजाबाई ह्या नक्कीच ब्राम्हणद्वेषी नव्हत्या, मग ब्राम्हण समाजाने जिजाबाईच्या नावामागे का बरे उभे राहू नये?
सारांश, हा वाद निरर्थक आहे, आणि कोहमला स्वतःला शिक्षणाच्या घसरत चाललेल्या दर्जाच्या (ब्राम्हणांची कमी होत चाललेली संख्या हे घसरणाऱ्या दर्जाचे कारण आहे का?) संस्थेमागे कोणाचे नाव लागते ह्याची आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव लागत नाही ह्याचे बिलकुल वैषम्य नाही. किंबहुना झाशीच्या राणीचे नाव असल्या दर्जाहीन विद्यापीठाला नकोच, हे मात्र खरे.
पण सामाजिक वादात ही एक नवी "संधी" ब्राम्हण समाजाच्या बाजूला भविष्यात असणार आहे. ह्या असल्या आपापसात होणार्या वादात ब्राम्हण समाजाने एकजुटीने किंगमेकर होण्याची गरज आहे. तटस्थपणे नाना फडणवीसाला स्मरून किंगमेकर व्हा हा ह्या आधुनिक नामांतराचा धडा आहे.

बाकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा जिजाबाई भोसले पुणे विद्यापीठ ह्या वादात आपले मत कुणाला?
- कोहम
Rajan Dandekar स्त्री आणि अन्याय विधवा आणि अन्याय ह्यात अग्रेसर हा शतकानुशतके ब्राह्मण समाज होता...... आणि नाना फडनविस चा वारसा चालवणे म्हणजे व्यभिचाराचा वारसा चालवणे.....!!!!!! फुले आणि मराठा सेवा संघ यांत मुलभूत फरक आहे. फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा.... सावित्रीबाई अश्या काळात प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले जेव्हा स्त्रिया आणि शुद्र यांना न्यानबंदी होती.... भटाळलेले पुणे विद्यापीठ कितीही घाणेरडे आणि बामणी जात्यांधांचा अड्डा असले तरी या निर्णयाचे स्वागत करायला हवे. जुलमी पेशवाई आणि सदाशिव पेठी मक्तेदारीला मिळालेली ही चपराक आहे....!!!!!!
November 13 at 2:41pm · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - मी आपल्या मताचे किंबहुना मतभेदाचे स्वागतच करतो. आपल्याकडे महापुरुषांना देवत्व बहाल केले जाते आणि तसे झाले की त्या महापुरुषाची कोणतीच गोष्ट चुकीची असूच शकत नाही. बहुजनांना ज्ञानबंदी होती ह्या विधानाला माझा आक्षेप आहे. अगदी शिवकालापासून बहुजन हे शिकत होतेच फक्त सामाजिक रचनेमुळे त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. अगदी आज २० १३ साली सुद्धा बहुजन समाज शिक्षणाबाबत उदासीनच दिसतो. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी सुद्धा हीच स्थिती आहे आणि ह्याला जबाबदार कोण? ब्राम्हण?
[फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा]
जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते. सर्व समाजरचनेला ब्राम्हण समाजाला दोष देणे हेच मुली मला मान्य नाही. हजारो वर्षांपूर्वी जी सिस्टीम प्रथा ज्या कोणी पडली होती त्याला सध्याच्या ब्राम्हण समाजाला जबाबदार धरणे हेच मुळी चुकीचे आहे. म. फुलेंच्या कार्यात अनेक चांगल्या गोष्टी असतील पण ते ज्या रीतीने ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकायचा प्रयत्न करायचे ते मात्र चुकीचेच आहे. अर्थात म. फुलेंना देवत्व बहाल करणाऱ्यांना त्यांचे माणूस असणे आणि त्या न्यायाने एखादी भूमिका चुकीचे असणेच जर मान्य नसेल तर बोलणेच खुंटले.
खुलासा: आपण म्हणता की मसेस व्यक्ती म्हणून द्वेष करतात आणि फुले भटशाहीचा विरोध करतात. दोन्हीही विरोध माझ्या दृष्टीने चुकीचेच. आणि मी आधी म्हणाल्याप्रमाणे म. फुले हे आद्य ब्राम्हणद्वेषी होते. त्यांचा ब्राम्हणद्वेष हा सध्याच्या लिंगपिसाट खेडेकर, मेश्राम आदी लोकांपेक्षा भले मवाळ असेल, पण ह्या खोडकर द्वेषाची सुरुवात म. फुल्यांनी केली होती ही गोष्ट मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो.
म. फुले आणि त्यांचे जातीनिर्मुलन/ शिक्षणामधले कार्य ह्या विषयी किंचितही दुरादार न दाखवता मी हे आपल्या समोर आणु इच्छितो, कारण मी म. फुल्यांना माणूस मानतो, देव नव्हे. - कोहम
Rajan Dandekar बुद्धासकट सर्वांना देवत्व बहाल करून संपवण्याचा वैदिक धंधा हा ब्राह्मणांच्या पिढीजात वारसाहक्काचे द्योतक.... त्यामुळे आम्ही नास्तिक देवत्व बहाल करण्याच्या भानगडीत कशाला पडू....????? (सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?) कुत्सित पणा आणि (जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही.) जात्याभिमान व वर्णश्रेष्ठत्व दिसून आले.....!!!!!!
Koham Mahok Rajan -
राजन - वर्णाभिमान? जसे आपण मान्य कराल की ब्राम्हण इतर कोणत्याही जतिपेक्षा श्रेष्ठ नाहीत, तसेच मी मानतो की ब्राम्हण हे इतर कोणत्याही जतिपेक्षा कनिष्ठपण नाहीत. आपण ही भूमिका मान्य कराल का?
वर्णव्यवस्थेला मी ब्राम्हण म्हणून एकटाच जबाबदार नाहीये, आणि ही सत्य भूमिका आपल्याला अवघड आहे. मुद्दा आहे ब्राम्हणद्वेषाचा, आणि ब्राम्हणद्वेष म. फुल्यांच्या काळात पण चुकीचा होता आणि आज पण आहे.
आपण निरीश्वरवाडी असाल पण आपण म. फुल्यांना ईश्वरासमान मानत असे माझे मत आहे.
November 13 at 3:58pm · Like · 3

Rajan Dandekar ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?????
Rajan Dandekar Ketan Mahajani या बाबत माझी भूमिका तुम्ही कोहमांना विचारा ते सांगती..... मराठा सरंजामी जात्यंधाविरोधात कायमच आक्रमक भूमिका आम्ही घेतलेली आहे,
Rajan Dandekar कोहम पेशवाईचा सामाजिक इतिहास जरा तपासून पहा...... महात्मा फुले यांची प्रतिक्रिया आणि क्रिया ही कालानुरूप होती, यात शंकाच नाही. आणि हजारो वर्ष राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि जुलमी धार्मिक अबाधित सत्ता अगदी मोगलाइतहि ज्या ब्राह्मण वर्गाने इतर समाज घटकांना ओरबाडून उपभोगली त्या समाजाने खर तर इथल्या सामंजस आणि अतिरेकविहीन समाज धारणेचे ऋणी असले पाहिजे..... आणि सरंजामी शक्तींच्या विरोधात दलित श्रमिक आदिवासी महिला आणि प्रगतिशील शक्तीन्सोबत उभे ठाकले पाहिजे..... सामुराई जातीने जपान मध्ये जसे सर्व अधिकार राष्टउनातीसाठी सोडले व आपले अस्तित्व जपानी नागरिक म्हणून ठेवले तसे..... पण हिटलरची पूजा करून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली चातुर्वर्ण्य पुन्हाः प्रस्थापित करण्याची हुकुमशाही स्वप्ने पाहणे यात नामशेष होण्याचा पुढे धोका आहे......!!!!!! गोडसे ने केलेले राजकीय नुकसान याबाबत विचार करा......
November 14 at 8:57am · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम
Mayur Kulkarni "जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते"

_/\_
Gabbar Singh bichara daku prathecha bali hota.
November 13 at 3:24pm · Like · 1

Koham Mahok Mayur Kulkarni -
डाकू ही काय जात आहे काय? आपल्याला मला काय म्हणायचे तेच समजलेले नाही.
November 13 at 3:27pm · Like

Mayur Kulkarni Chngalach samajlay.

Oppressors are oppressors, they can't be the victims of that same oppression.
We can make tomorrow better by accepting the shortcomings of the past.
Truth is we (brahmin's) were oppressors, we treated dalit people with lesser status than animals. We were the people who threw faeces at them.. We still do by our words.
November 13 at 3:32pm · Like · 1
Koham Mahok Mayur Kulkarni - that is ridiculous, I koham, has never done that, neither I consider any other caste any lower, nor oppress anyone, much less threw feces at any one. Most of the bramhins are like that, and are being blamed for eternity. How about the second layer of the caste system? If anyone was violent against dalits (even today's day and age), that was this second layer of caste based model? I don't see M. Phule criticizing marathas for any of the atrocities. This selective outrage is what I want to point out and condemn. If you want to worship M. Phule as a God, that is your choice. - koham
November 13 at 3:39pm · Like · 1
Mayur Kulkarni I am atheist & don't worship anyone as god. Someone saving different views than you doesn't he is idolizing people.
Brahmin were the highest echelons & most prominent beneficiaries of the caste system.

I agree, that today we are not the most aggressive of oppressors, maratha have overtook us. But we once hold power even over maratha king Shivaji maharaj. He had to prove that he wasn't a Shudra & had ties with Sisodiya clan to prove his Kshatriya status.
This says a lot.

I am happy most of us don't think same wy today. The reason I support to name change is she was a first woman teacher in first woman's school of India.
Her husband being Brahmin hater or not is other issue, we can't take her work away from her. We are talking about naming a university, her works regarding that field should be consider like a rational mind. Not her husband's communal views, that is just plain stupid or far fetched in order to oppose her name.
Koham Mahok Mayur - I may agree with the last paragraph of what you have said. But you are guessing, do we know or has anyone researched Shrimati Savitribaai's disposition about bramhins? Thanks for agreeing that bramhins are not the aggressors, this is a beginning . Mahatma Phule was the seed of organizations like Sambhaji B-grade and BAMSEF by their own admission. I disagree that bramhins were the only beneficiaries of caste system, kshatriyas were equally benefited by the caste system. - koham
Koham Mahok Rajan - [ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?]
माझा ब्राम्हण म्हणून द्वेष न करण्याबद्दल धन्यावाद.
जर का कोणीही मी ब्राम्हण जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ आहे असे म्हणत असेल तर त्याला माझा पण विरोध राहील.
माझी भूमिका एकाच आहे - ब्राम्हण म्हणून कोणीही श्रेष्ठ नाही तसेच ब्राम्हण म्हणून कोणीही कनिष्ठ नाही. हजारोवर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टींना "फक्त" ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकू नका. इथे म. फुले चुकले असे मी खेदाने नमूद करतो, कारण खोडसाळ ब्राम्हणद्वेषाची सुरुवात तेव्हापासूनच झाली.
Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम

https://www.facebook.com/koham.mahok