Saturday, May 14, 2011

"दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण"...एक चर्चा...


हरी नरके सरांचा लेख

first  |  < previous  |  next >  |  last showing 1-9 of 9 
Jan 31

http://www.orkut.com/CommMsgs?start=1&tid=5568314422885749500&cmm=12792978&hl=en

 

Anonymous

हरी नरके सरांचा लेख

हरी नरके सरानी असे लिहिले आहे लोकप्रभामधे
"या देशात ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघा उच्चवर्णीयांनी धर्मसत्ता, ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता यांच्यावरील वर्चस्वासाठी आपसात अनेक लढाया केलेल्या आहेत. शेकडो वर्ष त्यांनी मुत्सद्दीपणे तह किंवा युती करून दलित, आदिवासी, भटके -विमुक्त, इतर मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना गुलामीत ठेवले आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा! "
http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm
हा लेख फक्त वाचावा, विचार करावा यावर टोकाच्या प्रतिक्रिया देउ नये हि विनंति
त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे
May 8 (6 days ago)

Anonymous

सुंदर लेख आहे
May 9 (5 days ago)

Anonymous

किती दिवस दलितांना शोशित म्हणून जगासमोर आणायचे...!!!

आज सर्वात जास्त सुविधा या दलित,इतर मागासवर्गीय यांनाच पुरविण्यात येत आहेत.
मराठा,ब्राह्मण उमेदवार हे जास्त योग्यतेचे असले तरी केवळ दलित म्हणून दुसर्या कमी योग्यतेच्या उमेदवाराला संधी दिली जाते. यामुळे मराठा युवकाची आजच्या स्पर्धेच्या युगात पीछेहाट केवळ या रिजर्वेशनमुळे झाली आहे.
त्यामूळे संभाजी ब्रिगेड जे काही करत आहे त्यातील काही कृती तरी एक ९६ कुळी मराठा युवक म्हणून मला समर्थनीय वाटतात.
May 10 (4 days ago)

Anonymous

Gaurav
++++++++++++

akdam sahamat
May 11 (3 days ago)

Anonymous

दलित हल्ली त्यांच्या पुज्य महापुरुषाला फक्त जयंती-पुण्यतिथी अशा ठरविक दिवशीच स्मरण करतात, बाकी फक्त सुविधा मिळवण्यासाठी त्यांच्या नामाचा उपयोग करताना दिसतात.

त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे कोणीच अनुयायी अनुकरण करताना दिसत नाही.
May 11 (3 days ago)

Anonymous

नविन वादाला तोंड फोडु नका..!!!
May 11 (3 days ago)

Anonymous

ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी आपापसात केलेल्या लढायांचे पुराणात काही संदर्भ शोधता येतात पण गेल्या हजार वर्षाच्या इतिहासात अश्या कोणत्या गोष्टी हरी नरके सरांना सापडल्या आहेत .

[ब्रिगेड बद्दल नरके सरांचे जे मत आहे ते तर बहुतांश मराठ्यांचेही आहे .पण नरके सरांना आधी हे माहित नव्हते का ? ( अर्थात आधी माहित असले तरी आता विचार बदलल्यावर भूमिका बदलता येते -त्यामुळे फक्त यावरून त्यांना शब्दात पकडायचे नाहीये )

साक्षेपी इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी १९९६ साली प्रकाशित केलेल्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या खंड १, भाग-१, च्या पृष्ठ क्रमांक ६०४ ते ६३८ वर अस्सल दस्तावेजांच्या आधारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल लिहिले आहे. मेहेंदळे यांची तटस्थता आणि संशोधननिष्ठा वादातीत आहे. मेहेंदळे मराठा नसूनही त्यांनी ही चिकित्सक मांडणी केलेली आहे.
आजवर दादोजी कोंडदेव हे ब्राह्मणांचे ‘आयडॉल’ नव्हते. पराक्रमी ब्रिगेडने द्वेषाच्या आधारे दादोजींना ब्राह्मणांचा ‘आयकॉन’ बनवण्याचे महत्कार्य केले आहे.


यातलीही शेवटची ओळ पटत नाही. आजवर पाठ्य पुस्तकात असलेले उल्लेख , लाल महालातील पुतळा , जेम्स ला अज्ञात इसमाने सांगितलेला जोक हे कशाचे प्रतिक आहे ?

मेहेन्दालेंनी अभ्यासपूर्ण मांडणी करूनही अजून सुध्दा दादोजी शिवाजींचे गुरु नव्हते या सत्याला नेट च्या माध्यमातून कसा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष विरोध केला जातो हे आपण पहात आहोतच . हा वाद चालू असताना मेहेन्दालेन्सारख्या अभ्यासकाने पुढाकार घेवून स्वताचे मत ,पुरावे जाहीर पणे मांडायला नकोत का ?

लेन भारतात आला तरच शिल्प बघू शकतो हा दावा चुकीचा वाटतो . जेम्स ने दिलेली माहिती त्या इसमाने (जेम्स च्या म्हणण्या प्रमाणे अज्ञात इसमाने ) सांगितलेल्या जोक वर आधारित आहे . मध्ये फेस बुक वरील एका परप्रांतीय व्यक्तीनेही तो फोटो देवून त्याखाली असे लिहिले होते .

निदान जेम्स प्रकरण झाल्यावर तरी पुतळा हलवायला हवा होता .
( जेम्स सारखा संशोधक अज्ञात इसमाने सांगितलेला जोक आपल्या पुस्तकात छापतो आणि छापण्य आधी इथल्या कुणाशीही चर्चा करत नाही हे कसे काय पटू शकते )
May 11 (3 days ago)

Anonymous

ब्रिगेड चे राजकारण अमराठ द्वेष या सूत्रावर आहे हे पटत नाही . ब्रिगेड मुळेच फुले आणि आंबेडकर यांच्याबद्दल सकारात्मक मत निर्माण झालेले मराठा पहिले आहेत .
शालिनी तीनच्या त्या विधानाला ब्रिगेडचा पाठिंबा कधीच नव्हता आणि ते विधान शालिनी ती यांनी केले हेही आत्ताच कळलेले अनेक लोक आहेत .(ते विधान कधी केले .याबद्दल कुणाला माहिती असल्यास सांगावे . हरी नरके सरांनी संदर्भ दिला आहे तेव्हा ते असेलच पण त्याचा बहुतेक इश्यू झाला नसावा त्यामुळे माहित नाही . )

‘‘जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा’’ अशी मांडणी उघडपणे केली गेली असा जो संदर्भ दिला आहे त्या घोषणा ब्रिगेड ने दिलेला आहे का ?

अहिंदू द्वेषावर आधारीत वाटचाल करणारा संघपरिवार आणि मराठा संघटन करीत अमराठा द्वेषावर उभा असलेला ‘मराठा सेवा संघ’ यांच्या कार्यपद्धतीत आणि विचारधारेत लक्षणीय साम्य आहे. संघपरिवाराचे साहित्य आणि मराठा सेवा संघाने प्रकाशित केलेल्या १००पेक्षा जास्त पुस्तिका यांचा तौलनिक अभ्यास केला असता असे दिसते की संघाने जेथे जेथे ‘मुस्लिम’ शब्द वापरला आहे तेथे तेथे सेवा संघाने ‘ब्राह्मण’ शब्द घातला आहे. बाकी सारे एकसारखेच आहे !
हा तुलनात्मक अभ्यास अधिक खोलात जाऊन व्हायला हवा असे वाटते
May 11 (3 days ago)

Anonymous

आरक्षणाला पाठिंबा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पाठिंबा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का ? एकाला विरोध करून दुसर्याचे समर्थन होऊ शकत नाही का ? याबद्दल इथल्या सदस्यांना काय वाटते ?

आज देशात सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी एक स्पेस तयार झालेली आहे. तिचे नेतृत्व हायजॅक करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाची आरोळी ठोकली जात आहे. यामागे संघपरिवाराची लांब पल्ल्याची व्यूहरचना आहे. समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोट, सुनिल जोशी, इंद्रेश कुमार, प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असिमानंद आदी प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे की मुस्लीम मूलतत्तववादी आणि हिंदुत्त्ववादी यांच्या कार्यपद्धतीत अनेक साम्यस्थळे आहेत. ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे.

ब्राह्मण द्वेषाची आरोळी हि संघाची व्यूहरचना आहे हे मान्य आणि ब्रिगेड ची विरोधी भूमिका मला संघाला दिलेले प्रत्युत्तर वाटते .ब्रिगेड चा ब्राह्मण द्वेष हा फक्त बुरखा वाटतो का ? सनातनी आणि कर्मठ विचारांविरुध्द एक स्पेस तयार झाली आहे .हिचे नेतृत्व करायला अनेक जन इच्छुक आहेत .ब्रिगेड किंवा अन्य लोक हि हे करू शकतात फक्त त्यांची सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी भूमिका आणि इच्छा प्रामाणिक पाहिजे . ब्रिगेड ची हि भूमिका प्रामाणिक नसेल तर त्यांना तो हक्क नक्कीच नसेल . सर्वच लोकांची भूमिका प्रामाणिक नसेल तर तुलना करून कमीत कमी अप्रामाणिक व्यक्ती / संस्था या नेतृत्वाला पत्र ठरतील .
first  |  < previous  |  next >  |  last

2 comments:

  1. aaply lekhane briged v khedekar kiti dutapi ahet he samjale.
    aapan ha lekh lehun kelele dhadsala salam.


    jevha vishisht jat samor theun kam karayache lok tharvatata tevha tyana jatiyvadi nay mhanayache tr aankhi kay mhanayache

    ReplyDelete
  2. hari narke sir namasakar kahi lokani barayac commenents kaleya ahet tayhi Anonymous(bahutek jey mandavayache ahe tya badal tyana bhit vat asavi athava knowlage nasav aso) tyanchya bhavanacha Adhar tevato pan jakahi lokancha prtikriya vachalyavar dalit babat che kay mat ahe he samjal dhanyavad ..........vait avdhac vatal ki haya lokana tumi ka utar dil nahi ...athva utar dyavayace nahi......hey samajala nahi..............

    ReplyDelete